शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

एकनाथ शिंदेंवर अशा पद्धतीने बंड करण्याची वेळ का आली? नारायण राणेंनी स्पष्ट सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 20:24 IST

एकनाथ शिंदे यांच्यावर अशा पद्धतीने शिवसेना सोडण्याची वेळ का आली? असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. यासंदर्भात नारायण राणे यांनी थेट भाष्य केले आहे.

 विधान परिषदेच्या निकालानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण जबरदस्त ढवळून निघाले आहे. यामुळे शिवसेनेतील नाराजीही आता उघड झाली आहे. यातच, एकनाथ शिंदे यांच्यावर अशा पद्धतीने शिवसेना सोडण्याची वेळ का आली? असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. यासंदर्भात नारायण राणे यांनी थेट भाष्य केले आहे.

राणे म्हणाले, "अपमानित करणे, तुला मुख्यमंत्री बनवतो, असे दहा वेळा सांगून त्यांना निवडणुकीत, तसेच काही इतर घटनांमध्ये खर्च करायला सांगायचे आणि नंतर आपणच मुख्यमंत्री व्हायचे, फसवणूक करायची, असे अनेक वेळा एकनाथ शिंदेंबद्दल घडले आहे. यातून शेवटी त्यांचा स्वाभिमान जागृत झाला आणि म्हणून त्यांनी हे बंड पुकारले असेल, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे. ते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. 

अता महाराष्ट्रात आघाडी सरकार राहिलेले नाही -अता महाराष्ट्रात आघाडी सरकार राहिलेले नाही. अस्तित्वात नाही. ही मराराष्ट्राच्या दृष्टीने चांगली गोष्ट झाली आहे. अडीच वर्षात कोणत्याही स्वरुपाचा विकास नाही. सुडाच्या भावणेतून कारवाया करायच्या, विरोधकांना अपशब्द बोलायचे, मुख्यमंत्री पदाचा जो मान होता, जी शान होती तीही घालवली. त्यामुळे जे होते ते चांगल्यासाठीच होते. असेच म्हणावे लागेल. आता यानंतर महाराष्ट्रात काय घडते ते आपण बघुया, असेही राणे म्हणाले.

राऊत खरे किती बोलणार, खोटेच बोलणार ते - संजय राऊतांबद्दल बोलताना राणे म्हणाले, “संजय राऊत खरे किती बोलणार, खोटेच बोलणार ते. आता आवाज बसलाय, खाली गेलाय. उद्यापर्यंत तो आवाज बंद होईल. ते काहीही बोलतात. काय किडनॅपस ते वावरताना दिसत आहेत आणि शिवसेनेला कोणीही घाबरत नाही,” असंही राणे म्हणाले.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणेeknath khadseएकनाथ खडसेUddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊत