शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

एकनाथ शिंदेंवर अशा पद्धतीने बंड करण्याची वेळ का आली? नारायण राणेंनी स्पष्ट सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 20:24 IST

एकनाथ शिंदे यांच्यावर अशा पद्धतीने शिवसेना सोडण्याची वेळ का आली? असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. यासंदर्भात नारायण राणे यांनी थेट भाष्य केले आहे.

 विधान परिषदेच्या निकालानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण जबरदस्त ढवळून निघाले आहे. यामुळे शिवसेनेतील नाराजीही आता उघड झाली आहे. यातच, एकनाथ शिंदे यांच्यावर अशा पद्धतीने शिवसेना सोडण्याची वेळ का आली? असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. यासंदर्भात नारायण राणे यांनी थेट भाष्य केले आहे.

राणे म्हणाले, "अपमानित करणे, तुला मुख्यमंत्री बनवतो, असे दहा वेळा सांगून त्यांना निवडणुकीत, तसेच काही इतर घटनांमध्ये खर्च करायला सांगायचे आणि नंतर आपणच मुख्यमंत्री व्हायचे, फसवणूक करायची, असे अनेक वेळा एकनाथ शिंदेंबद्दल घडले आहे. यातून शेवटी त्यांचा स्वाभिमान जागृत झाला आणि म्हणून त्यांनी हे बंड पुकारले असेल, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे. ते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. 

अता महाराष्ट्रात आघाडी सरकार राहिलेले नाही -अता महाराष्ट्रात आघाडी सरकार राहिलेले नाही. अस्तित्वात नाही. ही मराराष्ट्राच्या दृष्टीने चांगली गोष्ट झाली आहे. अडीच वर्षात कोणत्याही स्वरुपाचा विकास नाही. सुडाच्या भावणेतून कारवाया करायच्या, विरोधकांना अपशब्द बोलायचे, मुख्यमंत्री पदाचा जो मान होता, जी शान होती तीही घालवली. त्यामुळे जे होते ते चांगल्यासाठीच होते. असेच म्हणावे लागेल. आता यानंतर महाराष्ट्रात काय घडते ते आपण बघुया, असेही राणे म्हणाले.

राऊत खरे किती बोलणार, खोटेच बोलणार ते - संजय राऊतांबद्दल बोलताना राणे म्हणाले, “संजय राऊत खरे किती बोलणार, खोटेच बोलणार ते. आता आवाज बसलाय, खाली गेलाय. उद्यापर्यंत तो आवाज बंद होईल. ते काहीही बोलतात. काय किडनॅपस ते वावरताना दिसत आहेत आणि शिवसेनेला कोणीही घाबरत नाही,” असंही राणे म्हणाले.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणेeknath khadseएकनाथ खडसेUddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊत