शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

धनंजय मुंडेंविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार गप्प का? भाजपामधून विचारला जातोय सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 06:11 IST

भाजपला दोष दिला, तरी सुरेश धस यांनी केलेले आरोप खोटे कसे ठरतील?

लोकमत न्यूज नेटवर्क , मुंबई : अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांच्यावरून राज्यभर प्रचंड गदारोळ सुरू असताना त्यांच्याच पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या विषयावर कोणतीही स्पष्ट भूमिका घ्यायला का तयार नाहीत? असा सवाल भाजपमधून उपस्थित केला जात आहे.

पुण्यात पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, ‘मुंडे यांच्यावर आरोप केले जात आहेत. मात्र, कोणीही कसलेही आरोप केले, तरी लगेच संबंधिताला दोषी म्हणता येणार नाही. आरोप करणाऱ्यांनी पुरावे समोर आणावेत. पक्षीय राजकारण न आणता कोणी कितीही मोठा असला तरी कारवाई केली जाईल,’ असे विधान केले आहे. त्याबाबत भाजपचे एक ज्येष्ठ नेते म्हणाले, अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्यात आरोप झाले. तेव्हा त्यांनी तडकाफडकी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. चौकशी पूर्ण झाल्यानंतरच मी मंत्रिमंडळात सहभागी होईल, अशी भूमिका घेतली. धरणातील कमी पाणीसाठ्याबद्दल त्यांच्याकडून विपरीत विधान झाले, तेव्हा त्यांनी प्रीतिसंगमावर जाऊन आत्मक्लेश केला. तो बाणेदारपणा आता कुठे गेला? असा सवाल उपस्थित करून भाजपचे नेते म्हणाले, मुख्यमंत्री जरी आमच्या पक्षाचे असले तरी हे महायुतीचे सरकार आहे. सहयोगी पक्षातील मंत्र्यांविषयी जर आरोप होत असतील तर त्याविषयी कठोर भूमिका आधी त्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी घेतली पाहिजे.

पुण्यात मुंडे यांची शंभर कोटींची मालमत्ता असल्याचा आरोप झाला. वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या पत्नीची एका कंपनीत भागीदारी असल्याचे समोर आले. कृषिमंत्री असताना त्यांच्या काळात सरकारी जमिनीवर विमा काढल्याचे प्रकरणही समोर आले. या सर्व प्रकरणावर धनंजय मुंडे काहीही बोलत नाहीत. अजित पवार या आरोपांवर कसलेही स्पष्टीकरण देत नाहीत. उलट मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस हेच सुरेश धस यांना पाठीशी घालत असल्याचा आक्षेप राष्ट्रवादीचे नेते घेतात. यामुळे धस यांनी केलेले गंभीर आरोप खोटे कसे ठरतील? असा सवालही भाजपच्या नेत्यांनी केला आहे.  

...तर मंत्रिमंडळातून बडतर्फ करा

अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा. जर चौकशीत ते निर्दोष असल्याचे सिद्ध झाले तर त्यांना सन्मानाने मंत्रिमंडळात घ्यावे. हा बाणेदारपणा अजित पवार यांनी दाखवला नाही तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंडे यांना राजीनामा द्यायला सांगावे किंवा त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे, असा सूर आता भाजपच्या अनेक नेत्यांमधून येत आहे.

एवढी जवळीक कशासाठी?

धनंजय मुंडे यांचा राजीनामा दादांनी घेतला पाहिजे असे अनेक नेते खासगीत सांगतात. मात्र, मुंडे यांच्याविषयी अजित पवार यांची एवढी जवळीक कशासाठी? याचे कोडे आम्हालाही उलगडत नाही, असे राष्ट्रवादीचेच नेते बोलून दाखवत आहेत.

विधानसभा निवडणुकीत परळीत २०१ बूथवर हल्ले; धनंजय मुंडेंकडे आव्हाडांचे बोट

लोकमत न्यूज नेटवर्क , मुंबई : विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघात २०१ बूथवर हल्ले झाले, तर १०१ बूथ ताब्यात घेऊन मतदान करण्यात आले, असा दावा शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. मतदारांच्या बोटाला शाई लावायची आणि त्यांना मतदान न करता बाहेर पाठवायचे. मतदान केंद्रात एक गँग बटण दाबण्याचे काम करायची, असा आरोप करत आव्हाड यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे बोट दाखवले आहे.

आव्हाड म्हणाले की, परळीमध्ये बूथ कॅप्चर करताना गोट्या गितेचा व्हिडीओ आम्ही निवडणूक आयोगाकडे दिला आहे. आयोगाने याची गांभीर्याने नोंद घ्यावी, संबंधित अधिकाऱ्यांचे लेखी जबाब जनतेसमोर घ्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणAjit Pawarअजित पवारDhananjay Mundeधनंजय मुंडेBJPभाजपा