शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

जनतेशी ठगबाजी करणाऱ्या सरकारचा चहा कशाला प्यायचा, विरोधकांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2018 17:01 IST

जनतेशी ठगबाजी करणाऱ्या, शेतकऱ्यांच्या जीवनात माती काळवणाऱ्या सरकारचा चहा कशाला प्यायचा, असा सवाल करत विरोधी पक्षांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बोलावलेल्या चहापानावर बहिष्कार टाकला आहे.

मुंबई - जनतेशी ठगबाजी करणाऱ्या, शेतकऱ्यांच्या जीवनात माती काळवणाऱ्या सरकारचा चहा कशाला प्यायचा, असा सवाल करत विरोधी पक्षांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बोलावलेल्या चहापानावर बहिष्कार टाकला आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना,  युवकांना, जनतेला फसवले आहे. म्हणून या सरकारचा उल्लेख आम्ही ठग ऑफ महाराष्ट्र असा केला आहे, अशी बोचरी टीका विरोधकांनी राज्य करकारवर केली आहे. सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी सरकारला घेरण्यासाठी रणनीती बनवण्यासाठी विरोधी पक्षाच्या गटनेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज झाली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांना संबोधित करताना विरोधी पक्ष नेते रधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारवर घणाघाती टीका केली. "राज्यात दुष्काळाची घोषणा होऊन 21 दिवस झाले, पण सरकारकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. हे सरकार दुष्काळाबाबत गंभीर नाही. मुख्यमंत्री दुष्काळापेक्षा आपल्या महत्त्वाकांक्षी योजनांचा आढावा घेण्यातच धन्यता मानत आहे. राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रतिहेक्टर आणि फळबागांना एक लाख रुपये प्रतिहेक्टर मदत द्या, अन्यथा कामकाज चालू देणार नाही'', अशी घोषणाही विखे-पाटील यांनी केली. या सरकारने शेतकऱ्यांना,  युवकांना, जनतेला फसवले आहे. म्हणून या सरकारचा उल्लेख आम्ही ठग ऑफ महाराष्ट्र असा केला आहेत, असेही विखे-पाटील म्हणाले. तसेच भाजपा आणि शिवसेनेला आता वनवासात जाण्याची वेळ आली म्हणून त्यांना राम आठवत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.  मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यायला 1 डिसेंबर चा मुहूर्त कशाला ? उद्याच अहवाल ठेवा आणि आरक्षण द्या, तसेच  धनगर आरक्षणाबाबत टीस चा अहवाल पटलावर ठेवा आणि मुस्लिम आरक्षणाबाबत भूमीका जाहीर करा, अशी मागणीही विखे-पाटील यांनी केली. तर राज्यात दुष्काळासह अनेक महत्वाचे  प्रश्न असताना सरकारने अधिवेशनाचा कालावधी कमी करून पळपुटेपणा केला आहे, असा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी सरकारला घेरण्यासाठी रणनीती बनवण्यासाठी विरोधी पक्षाच्या गटनेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज झाली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या या बैठकीला  राधाकृष्ण विखे पाटील, धनंजय मुंडे, पृथ्वीराज चव्हाण, अजितदादा पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गणपतराव देशमुख, शेकापचे जयंत पाटील, अबू आसिम आझमी, बसवराज पाटील, हेमंत टकले, जिवा पांडू गावित, कपिल पाटील, भाई जगताप, जितेंद्र आव्हाड, विद्याताई चव्हाण आदी नेते उपस्थित होते.    

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारणRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार