शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

जनतेशी ठगबाजी करणाऱ्या सरकारचा चहा कशाला प्यायचा, विरोधकांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2018 17:01 IST

जनतेशी ठगबाजी करणाऱ्या, शेतकऱ्यांच्या जीवनात माती काळवणाऱ्या सरकारचा चहा कशाला प्यायचा, असा सवाल करत विरोधी पक्षांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बोलावलेल्या चहापानावर बहिष्कार टाकला आहे.

मुंबई - जनतेशी ठगबाजी करणाऱ्या, शेतकऱ्यांच्या जीवनात माती काळवणाऱ्या सरकारचा चहा कशाला प्यायचा, असा सवाल करत विरोधी पक्षांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बोलावलेल्या चहापानावर बहिष्कार टाकला आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना,  युवकांना, जनतेला फसवले आहे. म्हणून या सरकारचा उल्लेख आम्ही ठग ऑफ महाराष्ट्र असा केला आहे, अशी बोचरी टीका विरोधकांनी राज्य करकारवर केली आहे. सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी सरकारला घेरण्यासाठी रणनीती बनवण्यासाठी विरोधी पक्षाच्या गटनेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज झाली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांना संबोधित करताना विरोधी पक्ष नेते रधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारवर घणाघाती टीका केली. "राज्यात दुष्काळाची घोषणा होऊन 21 दिवस झाले, पण सरकारकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. हे सरकार दुष्काळाबाबत गंभीर नाही. मुख्यमंत्री दुष्काळापेक्षा आपल्या महत्त्वाकांक्षी योजनांचा आढावा घेण्यातच धन्यता मानत आहे. राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रतिहेक्टर आणि फळबागांना एक लाख रुपये प्रतिहेक्टर मदत द्या, अन्यथा कामकाज चालू देणार नाही'', अशी घोषणाही विखे-पाटील यांनी केली. या सरकारने शेतकऱ्यांना,  युवकांना, जनतेला फसवले आहे. म्हणून या सरकारचा उल्लेख आम्ही ठग ऑफ महाराष्ट्र असा केला आहेत, असेही विखे-पाटील म्हणाले. तसेच भाजपा आणि शिवसेनेला आता वनवासात जाण्याची वेळ आली म्हणून त्यांना राम आठवत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.  मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यायला 1 डिसेंबर चा मुहूर्त कशाला ? उद्याच अहवाल ठेवा आणि आरक्षण द्या, तसेच  धनगर आरक्षणाबाबत टीस चा अहवाल पटलावर ठेवा आणि मुस्लिम आरक्षणाबाबत भूमीका जाहीर करा, अशी मागणीही विखे-पाटील यांनी केली. तर राज्यात दुष्काळासह अनेक महत्वाचे  प्रश्न असताना सरकारने अधिवेशनाचा कालावधी कमी करून पळपुटेपणा केला आहे, असा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी सरकारला घेरण्यासाठी रणनीती बनवण्यासाठी विरोधी पक्षाच्या गटनेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज झाली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या या बैठकीला  राधाकृष्ण विखे पाटील, धनंजय मुंडे, पृथ्वीराज चव्हाण, अजितदादा पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गणपतराव देशमुख, शेकापचे जयंत पाटील, अबू आसिम आझमी, बसवराज पाटील, हेमंत टकले, जिवा पांडू गावित, कपिल पाटील, भाई जगताप, जितेंद्र आव्हाड, विद्याताई चव्हाण आदी नेते उपस्थित होते.    

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारणRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार