शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पुरेसे बहुमत असताना अजितदादांना सोबत का घेतलं? RSS ने भाजपला सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 13:00 IST

लोकसभेच्या निकालानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर मासिकातून महाराष्ट्रातल्या अनावश्यक राजकारणाबाबत भाष्य करण्यात आलंय.

RSS Organiser : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नवीन सरकार स्थापन झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असला तरी भाजपच्या अपयशची चर्चा अद्याप सुरु आहे. ४०० पारची घोषणा देणाऱ्या भाजपला केवळ २४० जागा जिंकता आल्या आहेत. या निवडणुकीत भाजपची कामगिरी गेल्या वेळेपेक्षा वाईट आहे. भाजपाची मातृसंघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत भाजपला यांनी कानपिचक्या दिल्या होत्या. निवडणूक प्रचारात जो अतिरेक झाला त्यापासून दूर होत समस्यांवर चर्चा व्हायला हवी, असे मोहन भागवत यांनी म्हटलं होतं. आता संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर मासिकामध्ये भाजपच्या लोकसभा निवडणुकीतील कामगिरीबाबत एक लेख प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये आता महाराष्ट्रातील भाजपच्या कामगिरीवर भाष्य करण्यात आलंय.

ऑर्गनायझर मासिकाच्या अंकात संघाचे आजीव स्वयंसेवक असलेल्या रतन शारदा यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये अतिआत्मविश्वास असलेल्या भाजप नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आरसा दाखवला आहे. या लेखात लेखात महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर महत्त्वपूर्ण भाष्य करण्यात आले आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या अजित पवारांशी केलेली हातमिळवणी आणि काँग्रेसच्या नेत्यांना पक्षप्रवेशामुळे भाजपला धक्का बसल्याचे म्हटलं आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झालं होतं. त्यानंतर काही महिन्यांमध्ये राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडली. त्यानंतर अजित पवार देखील महायुतीमध्ये आल्यानंतर उपमुख्यमंत्री झाले. या सगळ्या बाबत आता राष्ट्राय स्वयंसेवक संघाच्या मासिकामध्ये उल्लेख करण्यात आलाय.

"महाराष्ट्र हे अनावश्यक राजकारण टाळता येण्याचे तसेच हेराफेरीचं उत्तम उदाहरण आहे. महाराष्ट्रात जे घडलं ते टाळता आलं असते. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा गट भाजपमध्ये सामील झाला. भाजपा आणि शिवसेना (शिंदे गटाला) सहज बहुमत मिळालं असतं. शरद पवार दोन-तीन वर्षांत गायब झाले असते कारण चुलत भावांच्या भांडणात राष्ट्रवादीची ताकद संपली असती. हे चुकीचे पाऊल का उचलले गेले? ज्या काँग्रेसी विचारसरणीविरोधात वर्षानुवर्षे लढलो त्यांच्या संघावर टीका करणाऱ्या काँग्रेस नेत्याला पायघड्या घालण्यात आल्याने भाजपा समर्थक दुखावले गेले. एका फटक्यात भाजपने आपली ब्रँड व्हॅल्यू कमी केली. महाराष्ट्रात नंबर वन होण्यासाठी अनेक वर्षांच्या संघर्षानंतर, कोणताही संघर्ष न करता तो आणखी एक राजकीय पक्ष बनला," असे ऑर्गनायझरमध्ये म्हटलं आहे.

उमेदवाराची निवड करताना चूक?

"नरेंद्र मोदी सर्व  ५४३ जागांवर लढत आहेत हा समज मर्यादित मूल्याचा ठरला. उमेदवार बदलल्यावर ही कल्पना आत्मघातकी ठरली. पक्षांतर करणाऱ्यांना अधिक महत्त्व दिले गेले. बाहेरुन येणाऱ्यांना सामावून घेण्यासाठी चांगली कामगिरी करणाऱ्या खासदारांचाही बळी देणे हानिकारक ठरले. असा अंदाज आहे की सुमारे २५ टक्के उमेदवार हे दुसऱ्या पक्षातून आले होते. त्यामुळे स्थानिक समस्या आणि उमेदवाराचा ट्रॅक रेकॉर्ड महत्त्वाचा असल्याचे दिसून येते. स्थानिक भाजप कार्यकर्त्यांची उदासीनताही याच कारणामुळे होती," असाही उल्लेख ऑर्गनायझरमध्ये करण्यात आलाय. 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघAjit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदे