शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

पुरेसे बहुमत असताना अजितदादांना सोबत का घेतलं? RSS ने भाजपला सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 13:00 IST

लोकसभेच्या निकालानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर मासिकातून महाराष्ट्रातल्या अनावश्यक राजकारणाबाबत भाष्य करण्यात आलंय.

RSS Organiser : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नवीन सरकार स्थापन झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असला तरी भाजपच्या अपयशची चर्चा अद्याप सुरु आहे. ४०० पारची घोषणा देणाऱ्या भाजपला केवळ २४० जागा जिंकता आल्या आहेत. या निवडणुकीत भाजपची कामगिरी गेल्या वेळेपेक्षा वाईट आहे. भाजपाची मातृसंघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत भाजपला यांनी कानपिचक्या दिल्या होत्या. निवडणूक प्रचारात जो अतिरेक झाला त्यापासून दूर होत समस्यांवर चर्चा व्हायला हवी, असे मोहन भागवत यांनी म्हटलं होतं. आता संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर मासिकामध्ये भाजपच्या लोकसभा निवडणुकीतील कामगिरीबाबत एक लेख प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये आता महाराष्ट्रातील भाजपच्या कामगिरीवर भाष्य करण्यात आलंय.

ऑर्गनायझर मासिकाच्या अंकात संघाचे आजीव स्वयंसेवक असलेल्या रतन शारदा यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये अतिआत्मविश्वास असलेल्या भाजप नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आरसा दाखवला आहे. या लेखात लेखात महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर महत्त्वपूर्ण भाष्य करण्यात आले आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या अजित पवारांशी केलेली हातमिळवणी आणि काँग्रेसच्या नेत्यांना पक्षप्रवेशामुळे भाजपला धक्का बसल्याचे म्हटलं आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झालं होतं. त्यानंतर काही महिन्यांमध्ये राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडली. त्यानंतर अजित पवार देखील महायुतीमध्ये आल्यानंतर उपमुख्यमंत्री झाले. या सगळ्या बाबत आता राष्ट्राय स्वयंसेवक संघाच्या मासिकामध्ये उल्लेख करण्यात आलाय.

"महाराष्ट्र हे अनावश्यक राजकारण टाळता येण्याचे तसेच हेराफेरीचं उत्तम उदाहरण आहे. महाराष्ट्रात जे घडलं ते टाळता आलं असते. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा गट भाजपमध्ये सामील झाला. भाजपा आणि शिवसेना (शिंदे गटाला) सहज बहुमत मिळालं असतं. शरद पवार दोन-तीन वर्षांत गायब झाले असते कारण चुलत भावांच्या भांडणात राष्ट्रवादीची ताकद संपली असती. हे चुकीचे पाऊल का उचलले गेले? ज्या काँग्रेसी विचारसरणीविरोधात वर्षानुवर्षे लढलो त्यांच्या संघावर टीका करणाऱ्या काँग्रेस नेत्याला पायघड्या घालण्यात आल्याने भाजपा समर्थक दुखावले गेले. एका फटक्यात भाजपने आपली ब्रँड व्हॅल्यू कमी केली. महाराष्ट्रात नंबर वन होण्यासाठी अनेक वर्षांच्या संघर्षानंतर, कोणताही संघर्ष न करता तो आणखी एक राजकीय पक्ष बनला," असे ऑर्गनायझरमध्ये म्हटलं आहे.

उमेदवाराची निवड करताना चूक?

"नरेंद्र मोदी सर्व  ५४३ जागांवर लढत आहेत हा समज मर्यादित मूल्याचा ठरला. उमेदवार बदलल्यावर ही कल्पना आत्मघातकी ठरली. पक्षांतर करणाऱ्यांना अधिक महत्त्व दिले गेले. बाहेरुन येणाऱ्यांना सामावून घेण्यासाठी चांगली कामगिरी करणाऱ्या खासदारांचाही बळी देणे हानिकारक ठरले. असा अंदाज आहे की सुमारे २५ टक्के उमेदवार हे दुसऱ्या पक्षातून आले होते. त्यामुळे स्थानिक समस्या आणि उमेदवाराचा ट्रॅक रेकॉर्ड महत्त्वाचा असल्याचे दिसून येते. स्थानिक भाजप कार्यकर्त्यांची उदासीनताही याच कारणामुळे होती," असाही उल्लेख ऑर्गनायझरमध्ये करण्यात आलाय. 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघAjit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदे