शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
2
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
3
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
4
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
5
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
6
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
7
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
8
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
9
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
10
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
11
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
12
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
13
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
14
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
15
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
16
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
17
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
18
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
19
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
20
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य

पुरेसे बहुमत असताना अजितदादांना सोबत का घेतलं? RSS ने भाजपला सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 13:00 IST

लोकसभेच्या निकालानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर मासिकातून महाराष्ट्रातल्या अनावश्यक राजकारणाबाबत भाष्य करण्यात आलंय.

RSS Organiser : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नवीन सरकार स्थापन झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असला तरी भाजपच्या अपयशची चर्चा अद्याप सुरु आहे. ४०० पारची घोषणा देणाऱ्या भाजपला केवळ २४० जागा जिंकता आल्या आहेत. या निवडणुकीत भाजपची कामगिरी गेल्या वेळेपेक्षा वाईट आहे. भाजपाची मातृसंघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत भाजपला यांनी कानपिचक्या दिल्या होत्या. निवडणूक प्रचारात जो अतिरेक झाला त्यापासून दूर होत समस्यांवर चर्चा व्हायला हवी, असे मोहन भागवत यांनी म्हटलं होतं. आता संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर मासिकामध्ये भाजपच्या लोकसभा निवडणुकीतील कामगिरीबाबत एक लेख प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये आता महाराष्ट्रातील भाजपच्या कामगिरीवर भाष्य करण्यात आलंय.

ऑर्गनायझर मासिकाच्या अंकात संघाचे आजीव स्वयंसेवक असलेल्या रतन शारदा यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये अतिआत्मविश्वास असलेल्या भाजप नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आरसा दाखवला आहे. या लेखात लेखात महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर महत्त्वपूर्ण भाष्य करण्यात आले आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या अजित पवारांशी केलेली हातमिळवणी आणि काँग्रेसच्या नेत्यांना पक्षप्रवेशामुळे भाजपला धक्का बसल्याचे म्हटलं आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झालं होतं. त्यानंतर काही महिन्यांमध्ये राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडली. त्यानंतर अजित पवार देखील महायुतीमध्ये आल्यानंतर उपमुख्यमंत्री झाले. या सगळ्या बाबत आता राष्ट्राय स्वयंसेवक संघाच्या मासिकामध्ये उल्लेख करण्यात आलाय.

"महाराष्ट्र हे अनावश्यक राजकारण टाळता येण्याचे तसेच हेराफेरीचं उत्तम उदाहरण आहे. महाराष्ट्रात जे घडलं ते टाळता आलं असते. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा गट भाजपमध्ये सामील झाला. भाजपा आणि शिवसेना (शिंदे गटाला) सहज बहुमत मिळालं असतं. शरद पवार दोन-तीन वर्षांत गायब झाले असते कारण चुलत भावांच्या भांडणात राष्ट्रवादीची ताकद संपली असती. हे चुकीचे पाऊल का उचलले गेले? ज्या काँग्रेसी विचारसरणीविरोधात वर्षानुवर्षे लढलो त्यांच्या संघावर टीका करणाऱ्या काँग्रेस नेत्याला पायघड्या घालण्यात आल्याने भाजपा समर्थक दुखावले गेले. एका फटक्यात भाजपने आपली ब्रँड व्हॅल्यू कमी केली. महाराष्ट्रात नंबर वन होण्यासाठी अनेक वर्षांच्या संघर्षानंतर, कोणताही संघर्ष न करता तो आणखी एक राजकीय पक्ष बनला," असे ऑर्गनायझरमध्ये म्हटलं आहे.

उमेदवाराची निवड करताना चूक?

"नरेंद्र मोदी सर्व  ५४३ जागांवर लढत आहेत हा समज मर्यादित मूल्याचा ठरला. उमेदवार बदलल्यावर ही कल्पना आत्मघातकी ठरली. पक्षांतर करणाऱ्यांना अधिक महत्त्व दिले गेले. बाहेरुन येणाऱ्यांना सामावून घेण्यासाठी चांगली कामगिरी करणाऱ्या खासदारांचाही बळी देणे हानिकारक ठरले. असा अंदाज आहे की सुमारे २५ टक्के उमेदवार हे दुसऱ्या पक्षातून आले होते. त्यामुळे स्थानिक समस्या आणि उमेदवाराचा ट्रॅक रेकॉर्ड महत्त्वाचा असल्याचे दिसून येते. स्थानिक भाजप कार्यकर्त्यांची उदासीनताही याच कारणामुळे होती," असाही उल्लेख ऑर्गनायझरमध्ये करण्यात आलाय. 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघAjit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदे