शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

पुरेसे बहुमत असताना अजितदादांना सोबत का घेतलं? RSS ने भाजपला सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 13:00 IST

लोकसभेच्या निकालानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर मासिकातून महाराष्ट्रातल्या अनावश्यक राजकारणाबाबत भाष्य करण्यात आलंय.

RSS Organiser : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नवीन सरकार स्थापन झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असला तरी भाजपच्या अपयशची चर्चा अद्याप सुरु आहे. ४०० पारची घोषणा देणाऱ्या भाजपला केवळ २४० जागा जिंकता आल्या आहेत. या निवडणुकीत भाजपची कामगिरी गेल्या वेळेपेक्षा वाईट आहे. भाजपाची मातृसंघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत भाजपला यांनी कानपिचक्या दिल्या होत्या. निवडणूक प्रचारात जो अतिरेक झाला त्यापासून दूर होत समस्यांवर चर्चा व्हायला हवी, असे मोहन भागवत यांनी म्हटलं होतं. आता संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर मासिकामध्ये भाजपच्या लोकसभा निवडणुकीतील कामगिरीबाबत एक लेख प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये आता महाराष्ट्रातील भाजपच्या कामगिरीवर भाष्य करण्यात आलंय.

ऑर्गनायझर मासिकाच्या अंकात संघाचे आजीव स्वयंसेवक असलेल्या रतन शारदा यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये अतिआत्मविश्वास असलेल्या भाजप नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आरसा दाखवला आहे. या लेखात लेखात महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर महत्त्वपूर्ण भाष्य करण्यात आले आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या अजित पवारांशी केलेली हातमिळवणी आणि काँग्रेसच्या नेत्यांना पक्षप्रवेशामुळे भाजपला धक्का बसल्याचे म्हटलं आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झालं होतं. त्यानंतर काही महिन्यांमध्ये राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडली. त्यानंतर अजित पवार देखील महायुतीमध्ये आल्यानंतर उपमुख्यमंत्री झाले. या सगळ्या बाबत आता राष्ट्राय स्वयंसेवक संघाच्या मासिकामध्ये उल्लेख करण्यात आलाय.

"महाराष्ट्र हे अनावश्यक राजकारण टाळता येण्याचे तसेच हेराफेरीचं उत्तम उदाहरण आहे. महाराष्ट्रात जे घडलं ते टाळता आलं असते. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा गट भाजपमध्ये सामील झाला. भाजपा आणि शिवसेना (शिंदे गटाला) सहज बहुमत मिळालं असतं. शरद पवार दोन-तीन वर्षांत गायब झाले असते कारण चुलत भावांच्या भांडणात राष्ट्रवादीची ताकद संपली असती. हे चुकीचे पाऊल का उचलले गेले? ज्या काँग्रेसी विचारसरणीविरोधात वर्षानुवर्षे लढलो त्यांच्या संघावर टीका करणाऱ्या काँग्रेस नेत्याला पायघड्या घालण्यात आल्याने भाजपा समर्थक दुखावले गेले. एका फटक्यात भाजपने आपली ब्रँड व्हॅल्यू कमी केली. महाराष्ट्रात नंबर वन होण्यासाठी अनेक वर्षांच्या संघर्षानंतर, कोणताही संघर्ष न करता तो आणखी एक राजकीय पक्ष बनला," असे ऑर्गनायझरमध्ये म्हटलं आहे.

उमेदवाराची निवड करताना चूक?

"नरेंद्र मोदी सर्व  ५४३ जागांवर लढत आहेत हा समज मर्यादित मूल्याचा ठरला. उमेदवार बदलल्यावर ही कल्पना आत्मघातकी ठरली. पक्षांतर करणाऱ्यांना अधिक महत्त्व दिले गेले. बाहेरुन येणाऱ्यांना सामावून घेण्यासाठी चांगली कामगिरी करणाऱ्या खासदारांचाही बळी देणे हानिकारक ठरले. असा अंदाज आहे की सुमारे २५ टक्के उमेदवार हे दुसऱ्या पक्षातून आले होते. त्यामुळे स्थानिक समस्या आणि उमेदवाराचा ट्रॅक रेकॉर्ड महत्त्वाचा असल्याचे दिसून येते. स्थानिक भाजप कार्यकर्त्यांची उदासीनताही याच कारणामुळे होती," असाही उल्लेख ऑर्गनायझरमध्ये करण्यात आलाय. 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघAjit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदे