शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

मनसेचा नमो निर्माण पक्ष का झाला? संजय राऊतांचा राज ठाकरेंना खोचक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 11:09 IST

Sanjay Raut : भाजपाने राज ठाकरे यांची अशी कोणती फाईल उघडली की, त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण हा पक्ष नमो निर्माण पक्ष झाला? असा खोचक सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

मुंबई : देशाला चांगल्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे, असे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी दादरमधील शिवाजी पार्क येथे आयोजित गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. भाजपाने राज ठाकरे यांची अशी कोणती फाईल उघडली की, त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण हा पक्ष नमो निर्माण पक्ष झाला? असा खोचक सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

गेल्या काही काळापासून महाराष्ट्राची अक्षरश: लूट सुरू आहे, खोक्याचं अत्यंत घाणेरडं राजकारण सुरू आहे. त्याचे सूत्रधार नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे आहेत. राज्यातून उद्योग पळवला जातोय, मुंबई तोडण्याचा, मुंबई विकलांग करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा वेळी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी निर्माण झालेला जो पक्ष आहे, तोच महाराष्ट्राच्या शत्रूंना पाठिंबा देत असेल तर लोकांच्या मनात शंका उत्पन होतात. त्याचीच उत्तर त्यांना (राज ठाकरे)  द्यावी लागतील. असं काय घडलं की तुम्ही राज्याच्या शत्रूंना पाठिंबा देत आहात, असा प्रश्न लोकं त्यांना विचारतील. तुमचा जो 'नवनिर्माण पक्ष' आहे, त्याचा 'नमो निर्माण पक्ष' का झाला? त्याची का गरज पडली? हे राज ठाकरे यांनी सांगितले पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.

याचबरोबर, आम्ही महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, स्वाभिमानासाठी लढत आहोत. समोर नरेंद्र मोदी असोत की अमित शाह,आम्ही शरणगती पत्करणार नाही. आम्ही कधीही स्वार्थासाठी भाजपासोबत राहिलो नाही. हिंदुत्ववादी मतांचं विभाजन होऊ नये म्हणून बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी, प्रमोद महाजन या सगळ्यांनी त्या काळात ही युती केली होती. ती २५ वर्ष चालली. पण भाजपाने जेव्हा त्यांचे खरे दात दाखवायला सुरूवात केली, तेव्हा आम्ही तो जबडा फाडून बाहेर आलो आणि आमची स्वतंत्र भूमिका घेतली, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

राजकारणातून ओवाळून टाकलेले नेते भाजपाने आपल्याकडे घेतले आहे. त्यातील हे एक हे महाशय (राज ठाकरे) आहेत का नमो निर्माण वाले? पण राज्यातले सगळे ओवाळून टाकलेले भ्रष्टाचारी, व्यभिचारी, गुंड यांना आपल्या पक्षात वॉशिंगमशीन मध्ये घेऊन साफ करण हा व्यभिचार नाही का? त्याच व्यासपीठावर पाय ठेवला असेल तर राज ठाकरेंना लोकांना उत्तर द्याव लागेल, असे संजय राऊत म्हणाले. तसेच, अजित पवार ,हसन मुश्रीफ अशी अनेक नावे आहेत, ज्यांनी बिनशर्त भाजपासोबत जायचं मान्य केले. ते का गेले कोणाच्या दबावामुळे गेले हे सर्वांना माहीत आहे. मला असं वाटत नाही त्यांचं (राज ठाकरे) असं झालं असेल. पण शरणागती त्यांनी यासाठी पत्करली की त्यांच्या अनेक फाइली उघडल्या गेल्या, धमक्या दिल्या. त्यामुळे असं वाटतं व्यभिचार हा भाजपाचा जगजाहीर आहे, असे संजय राऊत म्हणाले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेSanjay Rautसंजय राऊतMumbaiमुंबईlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४MNSमनसेMNS Gudi Padwa Rallyमनसे गुढीपाडवा मेळावा