शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

… यामुळे आव्हाड भाजपला मूर्ख म्हणाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 14:56 IST

सुरवातीलाच ठाकरेंवर मानसिक दबाव कसा आणला जाईल यासाठी भाजप प्रयत्न करत आहेत.

मुंबई: नागपुरात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात भाजपच्या आमदारांनी विविध प्रश्नांवरून आक्रमक भूमिका घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर याच मुद्यावरून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. महाराष्ट्र आपल्या आक्रमकतेला साथ देईल असे भाजपला वाटत असेल तर ते मूर्ख आहेत, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.

हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी सुद्धा विरोधकांनी शेतकरी प्रश्न व इतर मुद्यांवरून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली. तर काही वेळापूर्वी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या आमदारांसहित सभात्याग केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या भाषणात राज्यासाठी कोणतीही ठोस आश्वासने नसल्यामुळे सभात्याग करीत असल्याचे ते म्हणाले.

तर जितेंद्र आव्हाड यांनी याच मुद्यावरून भाजपवर जोरदार टीका केली आहे. अवघ्या तिसऱ्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर भाजपकडून हल्ला करण्यात आला. सुरवातीलाच ठाकरेंवर मानसिक दबाव कसा आणला जाईल यासाठी भाजप प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांनी सुद्धा लाखोच्या सभा घेतल्या आहेत. त्यामुळे असे काही केल्याने ठाकरेंवर दबाव येणार नसल्याचे आव्हाड म्हणाले.

तसेच जगातील लोकशाहीमध्ये हा नियम आहे की, कोणतेही नवीन सरकार स्थापन झाल्यास त्यांना किमान सहा महिने कामकाज समजण्यासाठी वेळ दिला जात असतो. त्यांनतर विरोधकांनी त्यांच्यावर हल्ला केला पाहिजे. विरोधकांनी विरोध करू नयेत असे माझे म्हणणे नाही, मात्र लोकशाहीचे काही अलिखित नियम असतात ते सुद्धा पाळले गेली पाहिजे असेही आव्हाड म्हणाले.