शहरं
Join us  
Trending Stories
1
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
2
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
3
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
4
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
5
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
6
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
7
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
8
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
9
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
10
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
11
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
12
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
13
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
14
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
15
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
16
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
17
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
18
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
19
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
20
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता

… यामुळे आव्हाड भाजपला मूर्ख म्हणाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 14:56 IST

सुरवातीलाच ठाकरेंवर मानसिक दबाव कसा आणला जाईल यासाठी भाजप प्रयत्न करत आहेत.

मुंबई: नागपुरात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात भाजपच्या आमदारांनी विविध प्रश्नांवरून आक्रमक भूमिका घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर याच मुद्यावरून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. महाराष्ट्र आपल्या आक्रमकतेला साथ देईल असे भाजपला वाटत असेल तर ते मूर्ख आहेत, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.

हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी सुद्धा विरोधकांनी शेतकरी प्रश्न व इतर मुद्यांवरून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली. तर काही वेळापूर्वी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या आमदारांसहित सभात्याग केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या भाषणात राज्यासाठी कोणतीही ठोस आश्वासने नसल्यामुळे सभात्याग करीत असल्याचे ते म्हणाले.

तर जितेंद्र आव्हाड यांनी याच मुद्यावरून भाजपवर जोरदार टीका केली आहे. अवघ्या तिसऱ्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर भाजपकडून हल्ला करण्यात आला. सुरवातीलाच ठाकरेंवर मानसिक दबाव कसा आणला जाईल यासाठी भाजप प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांनी सुद्धा लाखोच्या सभा घेतल्या आहेत. त्यामुळे असे काही केल्याने ठाकरेंवर दबाव येणार नसल्याचे आव्हाड म्हणाले.

तसेच जगातील लोकशाहीमध्ये हा नियम आहे की, कोणतेही नवीन सरकार स्थापन झाल्यास त्यांना किमान सहा महिने कामकाज समजण्यासाठी वेळ दिला जात असतो. त्यांनतर विरोधकांनी त्यांच्यावर हल्ला केला पाहिजे. विरोधकांनी विरोध करू नयेत असे माझे म्हणणे नाही, मात्र लोकशाहीचे काही अलिखित नियम असतात ते सुद्धा पाळले गेली पाहिजे असेही आव्हाड म्हणाले.