शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

महाराष्ट्रात आज निवडणुका झाल्यास कोण जिंकणार? शिंदे-भाजपा की मविआ, समोर आली धक्कादायक आकडेवारी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 19:02 IST

Maharashtra Politics: महाराष्ट्रात आज निवडणुका झाल्यास कुणाचा विजय होईल, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. एका सर्व्हेमधून याबाबतचं उत्तर समोर आलं आहे. 

गेल्या वर्षभरातील राजकीय घडामोडी आणि उलथापालथीमुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात झालेल्या बंडामुळे शिवसेनेत फूट पडून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळलं होतं. तसेच एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिंदे गट आणि भाजपानं सरकार स्थापन केलं होतं. त्यावरून अनेक आरोप प्रत्यारोप आणि कोर्टकचेरी झाली. अखेर सुप्रिम कोर्टाच्या निकालातून हे सरकार तरलं. मात्र आता जनतेच्या कोर्टात या सरकारचा पराभव होईल, असा दावा केला जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आज निवडणुका झाल्यास कुणाचा विजय होईल, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. एका सर्व्हेमधून याबाबतचं उत्तर समोर आलं आहे. 

महाराष्ट्रात जर आज निवडणुका झाल्या तर शिंदे-फडणवीस सरकारच्या अडणची वाढू शकतात. राज्यात आज निवडणुका झाल्यास काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षांच्या समावेश असलेल्या महाविकास आघाडीला तब्बल ४७.७ टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. या सर्व्हेनुसार महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येईल. काँग्रेसला १९.९ टक्के, राष्ट्रवादी काँग्रेसला १५,३ टक्के आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला १२.५ टक्के मतं मिळू शकतील. त्याशिवाय वंचित बहुजन आघाडीला २.९ टक्के, स्वाभिमानी शेतकरी पक्षाला ०.७ टक्के एमआयएमला ०.६ टक्के बीआरएस पक्षाला ०.५ टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. सकाळ वृत्तपत्र समुहाने हा सर्व्हे केला आहे.

सर्व्हेमध्ये महाविकास आघाडीला सर्वाधिक मतं मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली असली तरी राज्यात सर्वात  मोठा पक्ष भाजपाच ठरणार आहे. या सर्व्हेनुसार भारपाला महाराष्ट्रामध्ये ३३.८ टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या शिंदे गटाच्या शिवसेनेला ५.५ टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षांना  मिळून ३९.८ टक्के मतं मिळतील. ही मतं महाविकास आघाडीला मिळणाऱ्या मतांपेक्षा तब्बल आठ टक्क्यांनी कमी आहेत.

या सर्व्हेमध्ये वर्तवलेल्या अंदाजानुसारा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाची चिंता वाढण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ४० हून अधिक आमदार आणि १२ हून अधिक खासदारांनी उद्धव ठाकरेंविरोधात बंड करून आपला वेगळा गट स्ठापन केला होता. तसेच आपला गट हीच खरी शिवसेना असल्याचा दावा केला होता. तसेच भाजपाशी हातमिळवणी करून सरकार स्थापन केलं होतं. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रBJPभाजपाShiv SenaशिवसेनाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी