शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

"नॅरेटिव्ह वॉरमध्ये नुकसान कोणाचं होणार?; माध्यमांचे धुव्रीकरण झालं नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 11:22 IST

Lokmat National Media Conclave: १९७५ च्या काळात माध्यमांनी ठरवून बातमी छापणे आणि न छापणे हे सहज शक्य होते. आज तुम्ही कुठलीही बातमी लपवू शकत नाही असं राहुल पांडे यांनी सांगितले.

नागपूर - समाज एका स्थित्यंतरातून चालला आहे. विकसिनशील देशाकडून विकसित देशाकडे जाणारी आपली वाटचाल आहे. त्यात माध्यमांची भूमिका सकारात्मक असली पाहिजे का? देशाच्या दृष्टीने निश्चित असली पाहिजे. या नॅरेटिव्हच्या वॉरमध्ये नुकसान कोणाचं होणार आहे? आधीच्या काळात नक्षलवाद्यांना पाठबळ बाहेरून मिळाले. २००८ पर्यंत ८ लाख कोटींचे प्रस्ताव आले ते सुरू होऊ शकले नाहीत. त्यातून कुणाचा फायदा झाला हा प्रश्न माध्यमांचं धुव्रीकरण झालंय असं म्हणणाऱ्यांकडून घेतलं पाहिजे असं मत राज्याचे माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी मांडले. 

नागपूर येथील लोकमत नॅशनल मीडिया कॉन्क्लेव्हमध्ये राहुल पांडे म्हणाले की, समाज किर्तनानं सुधारला नाही आणि तमाशाने बिघडला नाही ही आपल्याकडे म्हण आहे. माध्यमांचे धुव्रीकरण आपण बोलतोय पण समाजाचं धुव्रीकरण झाले असेल तर त्याचे प्रतिबिंब माध्यमांमध्ये दिसते. माध्यमे हा समाजाचा आरसा आहेत. बोटचेपी धोरण, गोलमेज भाषा वापरायची का हा प्रश्न आहे. भारतीय पत्रकारिता अतिशय उज्ज्वल आहे. या देशाचा स्वातंत्र्य लढा माध्यमांनीही लढला आहे. त्याही काळात इंग्रजांची तळी उचलणारे माध्यमे होती. ज्यांनी इंग्रजांचे राज्य दैवी वरदान आहे असं म्हटलं होतं. १९४७ ते आज आपण स्वातंत्र्याचं ७५ वं अमृत महोत्सव साजरा करतोय. या कालावधीत माध्यमात धुव्रीकरण राहणारच आहेत. समाजात राजकीय, आर्थिक, सामाजिक या विषयांवर वेगवेगळे विचार असणार आहेत. विचारांची लढाई हा लोकशाहीचा सर्वात मोठा कणा आहे असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत पत्रकारांना दोन्ही बाजूने वाजवणारे लोकं आहेत. १९७५ च्या काळात माध्यमांनी ठरवून बातमी छापणे आणि न छापणे हे सहज शक्य होते. आज तुम्ही कुठलीही बातमी लपवू शकत नाही. माझी पहिली बातमी छापायला २८ दिवस लागले परंतु आज २८ मिनिटेही बातमी रोखू शकत नाही. माध्यमांचा वेग वाढला आहे. मीडिया म्हटलं की फक्त टेलिव्हिजन, पारंपारिक वृत्तपत्र नाही तर त्याच्या पलीकडे डिजिटल मीडिया आहे. ज्याचा रिच खूप जास्त आहे. त्यात तुम्हाला समर्थन करणारे आणि विरोध करणारे तितक्याच मोठ्या संख्येने असतात. इतकेच नाही तर तुम्ही ज्या विचारांना सर्च कराल त्याच बातम्या तुमच्यासमोर येत असतात. हा प्रकार डेटा कंपन्यांनी नॅरेटिव्ह सेट केलेला प्रकार आहे त्याने भारतीय समाज खरेच विभाजित झालंय का? अशी चिंता माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी व्यक्त केली. 

दरम्यान, २०१४ नंतर देशात फारच परिस्थिती बदलली किंवा फारच परिस्थिती ढासळली आहे असा गैरसमज पसरवला जातो. आजही माध्यमांमधून जे प्रश्न लोकांचे उपस्थित केले जातात त्याला दुसरा तरी कुठला पर्याय नाही. आज माध्यम म्हटलं तर ज्याच्यावर समाजाचा, कायद्याचा अंकुश आहे आणि ज्याच्यावर कुणाचाही अंकुश नाही अशांकडे पाहतो. समाजात असलेली दुही ही समाजमाध्यमांमध्ये दिसते तेव्हा तुमचा विचार त्यात दिसतो. त्यामुळे धुव्रीकरण माध्यम करतंय का तसे विचार करणारे व्यक्ती करतायेत? माध्यमांचे धुव्रीकरण झालंय असं म्हणणाऱ्यांनी गेल्या ८-१० वर्षात समाजहिताच्या कुठले मुद्दे दुर्लक्षित केलेत? याचे उदाहरण देण्यात अपयशी ठरतात. विरोधी पक्षाने मुद्दे उचलले की तर ते पुढे नेण्याचं काम माध्यमांचे आहे. माध्यमे कुठे कमी पडली हे न सांगता माध्यमांचे धुव्रीकरण चाललंय आणि एकांगी बातमी दिल्या जातायेत असं म्हटलं जाते. देश म्हणजे मोदी नाही. हा देश मोदींच्या आधी होता आणि नंतरही राहणार आहे. देशाच्या विविध भागांमधल्या आज गडचिरोलीतील दुर्मिळ भागात मागील ८०-१०० वर्षात त्यांच्याकडे न पोहचलेला विकास त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. माध्यमांचा व्यक्तींच्या जीवनावर प्रभावही राहिला नाही हे सत्य आहे असंही राहुल पांडे यांनी स्पष्टपणे सांगितले.