शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: लाखो परप्रांतिय कामगारांच्या परतीचा खर्च कोण करणार? राज्य सरकारसमोर प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 19:12 IST

CoronaVirus Marathi News महाराष्ट्रातील मुंबई, पुण्यासह राज्यभरात रोजगारासाठी उत्तर प्रदेश, बिहारमधून लाखो लोक आलेले आहेत. त्यांच्यापैकी बऱ्याचजणांना स्वगृही जायचे आहे. या सर्वांचा घरवापसीचा खर्च त्या त्या राज्यांनी करावा, असा विचार महाराष्ट्र सरकार करत आहे.

मुंबई : कोरोना महामारीमुळे उद्योगधंदे ठप्प झाल्याने राज्य सरकारांचेही कंबरडे मोडलेले आहे. त्यातच बुधवारी केंद्र सरकारने लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजूर, विद्यार्थी, पर्यटकांना आपापल्या राज्यात जाण्यासाठी नियमावली जारी करत राज्यांवरच जबाबदारी टाकण्यात आली आहे. यामुळे या सर्वांच्या घरवापसीचा खर्च कोण उचलणार हा मोठा प्रश्न राज्यांसमोर उपस्थित झाला आहे. 

महाराष्ट्रातील मुंबई, पुण्यासह राज्यभरात रोजगारासाठी उत्तर प्रदेश, बिहारमधून लाखो लोक आलेले आहेत. त्यांच्यापैकी बऱ्याचजणांना स्वगृही जायचे आहे. या सर्वांचा घरवापसीचा खर्च त्या त्या राज्यांनी करावा, असा विचार महाराष्ट्र सरकार करत आहे. यावर आज रात्रीपर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, महाराष्ट्रात १२ ते १३ लाख प्रवासी आहेत, त्यापैकी १० लाख त्यांच्या राज्यात जाण्यासाठी इच्छुक आहेत. जर महाराष्ट्र सरकारने या सर्वांचा खर्च उचलला तर त्याचा खूप मोठा आर्थिक बोजा राज्य सरकारच्या तिजोरीवर पडणार आहे. 

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही पंजाब मॉडेल तपासत आहोत. नांदेडमध्ये अडकलेल्या त्यांच्या पर्यटकांना पंजाब सरकारने त्यांच्या खर्चाने व्यवस्था करून नेले होते. आम्हीही महाराष्ट्र परिवाहनच्या बसेस अन्य राज्यांमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी पाठविल्या आहेत. यामुळे अन्य राज्यांनीही त्यांच्या नागरिकांना नेण्यासाठी स्वत:ची सोय करावी. 

उद्धव ठाकरे अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलणारयाशिवाय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी याबाबत बोलणार असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले. सर्व राज्यांना या प्रवाशांची माहिती आणि नेमका आकडा असलेला मसुदा तयार करावा लागणार आहे. कारण हे प्रवासी राज्यभरात पसरलेले आहेत. 

काय आहेत प्रस्ताव?पहिल्या प्रस्तावामध्ये महाराष्ट्र सरकार एसटी बसद्वारे त्या त्या राज्यांच्या प्रवाशांना त्या राज्यांच्या सीमेवर सोडणार आहे. मात्र, हा प्रस्ताव खूप जोखमीचा ठरल्याने बाजुला करण्यात आला आहे. संबंधित राज्यांच्या बसेसना महाराष्ट्रात येऊ द्यावे. त्या बसमधून ते प्रवासी त्यांच्या राज्यात जातील. मात्र, असे करणेही खूप जिकीरीचे ठरणार आहे. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावर बसेस आल्या तर धोक्याचे ठरणार आहे. आता अंतिम निर्णय सरकारलाच घ्यावा लागणार आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याUddhav Thackerayउद्धव ठाकरेCentral Governmentकेंद्र सरकार