शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

CoronaVirus News: लाखो परप्रांतिय कामगारांच्या परतीचा खर्च कोण करणार? राज्य सरकारसमोर प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 19:12 IST

CoronaVirus Marathi News महाराष्ट्रातील मुंबई, पुण्यासह राज्यभरात रोजगारासाठी उत्तर प्रदेश, बिहारमधून लाखो लोक आलेले आहेत. त्यांच्यापैकी बऱ्याचजणांना स्वगृही जायचे आहे. या सर्वांचा घरवापसीचा खर्च त्या त्या राज्यांनी करावा, असा विचार महाराष्ट्र सरकार करत आहे.

मुंबई : कोरोना महामारीमुळे उद्योगधंदे ठप्प झाल्याने राज्य सरकारांचेही कंबरडे मोडलेले आहे. त्यातच बुधवारी केंद्र सरकारने लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजूर, विद्यार्थी, पर्यटकांना आपापल्या राज्यात जाण्यासाठी नियमावली जारी करत राज्यांवरच जबाबदारी टाकण्यात आली आहे. यामुळे या सर्वांच्या घरवापसीचा खर्च कोण उचलणार हा मोठा प्रश्न राज्यांसमोर उपस्थित झाला आहे. 

महाराष्ट्रातील मुंबई, पुण्यासह राज्यभरात रोजगारासाठी उत्तर प्रदेश, बिहारमधून लाखो लोक आलेले आहेत. त्यांच्यापैकी बऱ्याचजणांना स्वगृही जायचे आहे. या सर्वांचा घरवापसीचा खर्च त्या त्या राज्यांनी करावा, असा विचार महाराष्ट्र सरकार करत आहे. यावर आज रात्रीपर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, महाराष्ट्रात १२ ते १३ लाख प्रवासी आहेत, त्यापैकी १० लाख त्यांच्या राज्यात जाण्यासाठी इच्छुक आहेत. जर महाराष्ट्र सरकारने या सर्वांचा खर्च उचलला तर त्याचा खूप मोठा आर्थिक बोजा राज्य सरकारच्या तिजोरीवर पडणार आहे. 

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही पंजाब मॉडेल तपासत आहोत. नांदेडमध्ये अडकलेल्या त्यांच्या पर्यटकांना पंजाब सरकारने त्यांच्या खर्चाने व्यवस्था करून नेले होते. आम्हीही महाराष्ट्र परिवाहनच्या बसेस अन्य राज्यांमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी पाठविल्या आहेत. यामुळे अन्य राज्यांनीही त्यांच्या नागरिकांना नेण्यासाठी स्वत:ची सोय करावी. 

उद्धव ठाकरे अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलणारयाशिवाय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी याबाबत बोलणार असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले. सर्व राज्यांना या प्रवाशांची माहिती आणि नेमका आकडा असलेला मसुदा तयार करावा लागणार आहे. कारण हे प्रवासी राज्यभरात पसरलेले आहेत. 

काय आहेत प्रस्ताव?पहिल्या प्रस्तावामध्ये महाराष्ट्र सरकार एसटी बसद्वारे त्या त्या राज्यांच्या प्रवाशांना त्या राज्यांच्या सीमेवर सोडणार आहे. मात्र, हा प्रस्ताव खूप जोखमीचा ठरल्याने बाजुला करण्यात आला आहे. संबंधित राज्यांच्या बसेसना महाराष्ट्रात येऊ द्यावे. त्या बसमधून ते प्रवासी त्यांच्या राज्यात जातील. मात्र, असे करणेही खूप जिकीरीचे ठरणार आहे. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावर बसेस आल्या तर धोक्याचे ठरणार आहे. आता अंतिम निर्णय सरकारलाच घ्यावा लागणार आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याUddhav Thackerayउद्धव ठाकरेCentral Governmentकेंद्र सरकार