शहरं
Join us  
Trending Stories
1
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
2
आजचे राशीभविष्य- ७ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस शुभ फलदायी, 'या' राशींची होणार भरभराट!
3
सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 
4
कोणत्या नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी कोणते आरक्षण; सोडत निकाल वाचा एका क्लिकवर... 
5
वांगचूक यांना अटक; केंद्र सरकार, लडाखला नोटीस; तत्काळ सुटका करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी 
6
बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल   
7
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा 
8
२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव 
9
ब्रुनको, रॅम्सडेल व साकागुची यांना मेडिसिनचे नोबेल; टी-पेशींचा शोध, कर्करोग आणि मधुमेहावर उपयुक्त
10
७ कोटींच्या घरांना ग्राहक मिळाले नाहीत, तर म्हाडा घरे भाड्याने देणार
11
लादेनच्या डोक्यात अमेरिकी नेव्ही सीलनेच गोळी झाडली होती, हे इतिहास विसरणार नाही : ट्रम्प
12
तरुणाई ठरवणार बिहारचा मुख्यमंत्री?
13
विशेष न्यायालयाचा दोघांची सुटका करण्यास नकार; बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण, सरकारी वकिलांची माहिती  
14
अपहरण केले, पण चांगले खायला दिले; दिलीप खेडकरचा असाही बचावात्मक पवित्रा
15
परप्लेक्सिटीचा तांत्रिक बिघाड सोडवला, १ कोटीची नोकरी मिळाली; पालघर जिल्ह्यातल्या जितेंद्रची झाली निवड
16
पालकांचा सांभाळ मुलांनी केलाच पाहिजे; बक्षिसपत्राविषयी उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
17
अतिवृष्टीचे निकष बदलून शेतकऱ्यांना करणार मदत; बुजलेल्या विहिरींनाही मदतीचा प्रस्ताव
18
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
19
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
20
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...

शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 17:10 IST

पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या मंडळींनी दूरदृष्टीचा विचार करणे गरजेचे आहे. कुणापासून नुकसान आहे, कुणापासून फायदा आहे हे पाहायला हवे असं गोगावले यांनी म्हटलं.

मुंबई - बाळासाहेब ठाकरे यांच्या कामाची जी पद्धत होती तशी उद्धव ठाकरेंची नव्हती. बाळासाहेब आपुलकीने वागवत होते. मात्र त्यांच्यानंतर जो काही कारभार सुरू झाला तो आम्हाला पटला नाही. महिलांनी किती हस्तक्षेप करायचा याला मर्यादा असतात. जर आघाडीवेळी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर फार वेगळे चित्र असते. त्यात आदित्य ठाकरेंना मंत्रिपद दिले हे कुठल्याच शिवसैनिकाला पटले नाही. एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदे यांना मंत्रिपद देऊ शकले असते परंतु त्यांनी प्रतापराव जाधवांना ते पद दिले. याला मोठेपणा म्हणतात. शिवसेनेत असताना ज्या काही घडामोडी घडत होत्या, त्यात वहिनी आणि त्यांच्या नातेवाईकांचा हस्तक्षेप असायचा. त्यात बऱ्याचदा इच्छा असतानाही उद्धव ठाकरेंना निर्णय घेता येत नव्हते असा खळबळजनक दावा मंत्री भरत गोगावले यांनी करत शिवसेना फुटीमागे रश्मी ठाकरेंचा हात असल्याचं थेट बोलले आहेत. 

मंत्री भरत गोगावले म्हणाले की, त्या काळात जो काही प्रकार सुरू होता त्यावर आमचा आक्षेप होता. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात उठाव करून आम्ही ही भूमिका घेतली. पडद्यामागे वहिनींचा हस्तक्षेप बराच होता. उद्धव ठाकरेंच्या मनात काही गोष्टी असायच्या त्यात बदल व्हायचे. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी होत नव्हत्या. वर्षावरून आम्हाला माघारी परतावं लागायचे. शिवसेना फुटीची अनेक कारणे आहेत. नेतृत्वाने सगळ्यांना सोबत घेऊन जायचे असते. कानात चुकीचे सांगणाऱ्यांना जवळ केल्याने हे प्रकार घडतात. संघटनेसाठी प्रामाणिक काम करणाऱ्याला फाट्यावर मारले तर हे घडते असं त्यांनी म्हटलं.

तसेच जेव्हा आम्ही मातोश्रीवर चर्चेला जायचो तेव्हा एकदा चर्चेवेळी नारायण राणे पुन्हा येत असतील तर त्यांना घ्यावे असं मत ठरले होते. राणेंच्या मित्रांसोबत काही चर्चा सुरू होत्या. राणेंचे कोकणात वलय होते. त्यांना मानणारा वर्ग आहे. परंतु कुठे माशी शिंकली माहिती नाही. त्यानंतर उद्धव ठाकरे आजारी असताना राज ठाकरे स्वत: हॉस्पिटलला गेले, तिथून मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना आणले. त्यावेळी दोन्ही भाऊ एकत्र यावेत असे आम्हाला वाटत होते. तेव्हाही त्या दोघांचे जुळून दिले नाही. त्या ज्या काही खटाटोपी सुरु होत्या त्यातून बाळासाहेबांची शिवसेना राहावी म्हणून आम्ही शिंदेंसोबत एकत्र आलो. आम्ही पक्ष सोडला नाही. दुसऱ्या पक्षात गेलो नाही. आम्ही धनुष्यबाण, शिवसेना नाव घेऊनच महाराष्ट्रात फिरतोय असंही मंत्री भरत गोगावले यांनी सांगितले.

दरम्यान, पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या मंडळींनी दूरदृष्टीचा विचार करणे गरजेचे आहे. कुणापासून नुकसान आहे, कुणापासून फायदा आहे हे पाहायला हवे. नारायण राणे, छगन भुजबळ हे परत येत होते तेव्हा घ्यायला हवे होते.  राजकारणात कधी कुठे वळण घेईल सांगता येत नाही. कधी जिंकणारा संघही हरतो आणि हरणारा संघही जिंकतो. हिंदुत्व सोडायचे नाही हे बाळासाहेबांनी सांगितले होते. आमचा भरवसा एकनाथ शिंदेंवर ठेवला आहे. पक्षाच्या हितासाठी ते जे काही ठरवतील त्यासोबत आम्ही आहोत असं गोगावले यांनी सांगत ठाकरे बंधू एकत्र येण्यावर भाष्य केले. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरे