शहरं
Join us  
Trending Stories
1
विकणाऱ्याला अटक, मग विकत घेणाऱ्याला का नाही?, अंबादास दानवेंचा पार्थ पवारांना अडचणीत आणणारा सवाल
2
मदीनाहून १८० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या इंडिगो विमानाला बॉम्बची धमकी, अहमदाबादमध्ये आपत्कालीन लँडिंग
3
रशियातील सर्वात श्रीमंत महिला! मातृत्व रजेवर असताना सुचली कल्पना, आज अब्जावधींचं साम्राज्य
4
UPI कॅशबॅक : रोजच्या पेमेंटमधून पैसे वाचवण्याची 'स्मार्ट' ट्रिक! 'या' मार्गांनी करा अधिक कमाई
5
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 2477 तर सोने 459 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या लेटेस्ट रेट
6
सरवणकरांची सून झाली तेजस्विनी लोणारी! शिवसेना युवा नेते समाधान सरवणकर यांच्यासोबत बांधली लग्नगाठ
7
Rinku Singh : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी विघ्न की, लग्न? रिंकू टीम इंडियातून आउट होण्यामागचं कारण काय?
8
Vladimir Putin India Visit : उशिरापर्यंत जागरण, दोन तास स्वीमिंग, दारूला स्पर्शही नाही; ७३ वर्षीय पुतिन यांची लाईफस्टाईल! लाल डायरीला खास महत्त्व
9
Mumbai: "हे आपलं घर..." मुलाचं आई- वडिलांना 'बिग सरप्राईज'; दारावर नावाची पाटी पाहून भावूक
10
'आम्हीदेखील देशाचे प्रतिनिधित्व करतो, पण..', पुतिन यांची भेट नाकारल्याने राहुल गांधी संतापले
11
"लोकशाहीचे वस्त्रहरण, १७ ईव्हीएम मशिनचे सील तोडून पुन्हा मतदान पण अद्याप गुन्हा दाखल नाही"
12
पाकिस्तानसाठी हेरगिरीचा आरोप, ब्रह्मोस माजी इंजिनियरची तब्बल सात वर्षानंतर निर्दोष मुक्तता
13
डिजिटल बँकिंगचे नवे नियम १ तारखेपासून लागू होणार; तुमच्यासाठी काय बदलणार, जाणून घ्या महत्त्वाची माहिती
14
पश्चिम बंगालमध्ये बाबरी बांधण्याची घोषणा केलेली; ममता बॅनर्जींनी आमदाराला पक्षातून निलंबित केले
15
थायलंड फिरायला गेले, पण मृत्यूनं गाठलं; दोन्ही मित्र स्विमिंग पूलमध्ये मृतावस्थेत! नेमकं काय झालं?
16
itel Rhythm Echo TWS Earbuds: बॅटरी लाईफही हवी, आजुबाजुचा गोंगाट घालविणारा इअरबड हवा, मग...;  हा बजेटमधील इअरबड कसा आहे...?
17
हायवेवरील ट्रकला कारने दिली जोरदार धडक; ४ डॉक्टरांचा जागीच मृत्यू, आई वडिलांचं स्वप्न भंगलं
18
'मागेल तेवढ्या पगाराची नोकरी', स्वतःच्या स्वप्नांसाठी दुसऱ्यांच्या स्वप्नाची राखरांगोळी 
19
एखाद्या ‘सुंदरी’चा फोटो तीन मिनिटांत करू शकतो तुमचे बँक खाते रिकामे, ऑनलाइन व्यवहार करताना सावध रहा
20
High Tide Mumbai: चार दिवस समुद्राला मोठी भरती; साडेचार मीटरपेक्षा अधिक उंच लाटा
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 17:10 IST

पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या मंडळींनी दूरदृष्टीचा विचार करणे गरजेचे आहे. कुणापासून नुकसान आहे, कुणापासून फायदा आहे हे पाहायला हवे असं गोगावले यांनी म्हटलं.

मुंबई - बाळासाहेब ठाकरे यांच्या कामाची जी पद्धत होती तशी उद्धव ठाकरेंची नव्हती. बाळासाहेब आपुलकीने वागवत होते. मात्र त्यांच्यानंतर जो काही कारभार सुरू झाला तो आम्हाला पटला नाही. महिलांनी किती हस्तक्षेप करायचा याला मर्यादा असतात. जर आघाडीवेळी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर फार वेगळे चित्र असते. त्यात आदित्य ठाकरेंना मंत्रिपद दिले हे कुठल्याच शिवसैनिकाला पटले नाही. एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदे यांना मंत्रिपद देऊ शकले असते परंतु त्यांनी प्रतापराव जाधवांना ते पद दिले. याला मोठेपणा म्हणतात. शिवसेनेत असताना ज्या काही घडामोडी घडत होत्या, त्यात वहिनी आणि त्यांच्या नातेवाईकांचा हस्तक्षेप असायचा. त्यात बऱ्याचदा इच्छा असतानाही उद्धव ठाकरेंना निर्णय घेता येत नव्हते असा खळबळजनक दावा मंत्री भरत गोगावले यांनी करत शिवसेना फुटीमागे रश्मी ठाकरेंचा हात असल्याचं थेट बोलले आहेत. 

मंत्री भरत गोगावले म्हणाले की, त्या काळात जो काही प्रकार सुरू होता त्यावर आमचा आक्षेप होता. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात उठाव करून आम्ही ही भूमिका घेतली. पडद्यामागे वहिनींचा हस्तक्षेप बराच होता. उद्धव ठाकरेंच्या मनात काही गोष्टी असायच्या त्यात बदल व्हायचे. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी होत नव्हत्या. वर्षावरून आम्हाला माघारी परतावं लागायचे. शिवसेना फुटीची अनेक कारणे आहेत. नेतृत्वाने सगळ्यांना सोबत घेऊन जायचे असते. कानात चुकीचे सांगणाऱ्यांना जवळ केल्याने हे प्रकार घडतात. संघटनेसाठी प्रामाणिक काम करणाऱ्याला फाट्यावर मारले तर हे घडते असं त्यांनी म्हटलं.

तसेच जेव्हा आम्ही मातोश्रीवर चर्चेला जायचो तेव्हा एकदा चर्चेवेळी नारायण राणे पुन्हा येत असतील तर त्यांना घ्यावे असं मत ठरले होते. राणेंच्या मित्रांसोबत काही चर्चा सुरू होत्या. राणेंचे कोकणात वलय होते. त्यांना मानणारा वर्ग आहे. परंतु कुठे माशी शिंकली माहिती नाही. त्यानंतर उद्धव ठाकरे आजारी असताना राज ठाकरे स्वत: हॉस्पिटलला गेले, तिथून मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना आणले. त्यावेळी दोन्ही भाऊ एकत्र यावेत असे आम्हाला वाटत होते. तेव्हाही त्या दोघांचे जुळून दिले नाही. त्या ज्या काही खटाटोपी सुरु होत्या त्यातून बाळासाहेबांची शिवसेना राहावी म्हणून आम्ही शिंदेंसोबत एकत्र आलो. आम्ही पक्ष सोडला नाही. दुसऱ्या पक्षात गेलो नाही. आम्ही धनुष्यबाण, शिवसेना नाव घेऊनच महाराष्ट्रात फिरतोय असंही मंत्री भरत गोगावले यांनी सांगितले.

दरम्यान, पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या मंडळींनी दूरदृष्टीचा विचार करणे गरजेचे आहे. कुणापासून नुकसान आहे, कुणापासून फायदा आहे हे पाहायला हवे. नारायण राणे, छगन भुजबळ हे परत येत होते तेव्हा घ्यायला हवे होते.  राजकारणात कधी कुठे वळण घेईल सांगता येत नाही. कधी जिंकणारा संघही हरतो आणि हरणारा संघही जिंकतो. हिंदुत्व सोडायचे नाही हे बाळासाहेबांनी सांगितले होते. आमचा भरवसा एकनाथ शिंदेंवर ठेवला आहे. पक्षाच्या हितासाठी ते जे काही ठरवतील त्यासोबत आम्ही आहोत असं गोगावले यांनी सांगत ठाकरे बंधू एकत्र येण्यावर भाष्य केले. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरे