शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
2
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
3
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
4
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
5
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
6
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
7
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
8
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
9
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
10
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
11
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
12
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
13
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
14
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
15
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
16
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
17
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
18
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
19
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
20
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...

भाजपाबरोबर आता राहिलेय कोण? राऊतांचे 'धोका कोणी दिला' वर शहांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2023 11:09 IST

निकाल हाती येताच उद्धव ठाकरेंनी धोका दिला असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नांदेडच्या सभेमध्ये केला होता.

निकाल हाती येताच उद्धव ठाकरेंनी धोका दिला असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नांदेडच्या सभेमध्ये केला होता. याला आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेना गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्यूत्तर दिले आहे. ठाकरेंच्या शब्दावर विश्वास ठेवतो. आजही साडे अकरा कोटी जनतेचा ठाकरेंच्या शब्दावर विश्वास आहे. बाहेरच्यांवर नाही, असे राऊत म्हणाले. 

भाजपाबरोबर आता राहिलेय कोण? त्यांच्यासोबत त्यांच्याशी निष्ठावान असलेले अकाली दल, शिवसेना राहिलेले नाही. आता त्यांना २०२४ मध्ये कळेल, कोण होते म्हणून जिंकले होते. वाघाचे कातडे घालून कोल्हे-लांडगे फिरत आहेत. खरा वाघ समोर आला की त्यांची काय अवस्था होईल हे दिसेल, असे राऊत म्हणाले.  

धोका कोणी दिला, का दिला याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे आजचे सरकार आहे. तुम्हीच काही वर्षांपूर्वी शिवसेनेला मुख्यमंत्री पद दिले नव्हते ना, आता त्याच शिवसेनेच्या फुटलेल्या गटाला मुख्यमंत्री करून मिरवताय. आम्हाला धोका दिला त्याची कबुलीच तुम्ही देताय, अशी टीका राऊत यांनी शहा यांच्या आरोपांवर केली. 

राष्ट्रवादी हा स्वतंत्र पक्ष आहे. काल त्यांचा वर्धापन दिन झाला. यावेळी शरद पवारांनी पुर्नमांडणी केली. असे बदल होत असतात काळानुसार बदल करावे लागतात. तुम्ही त्याला भाकरी फिरविली असे म्हणू शकता. शरद पवार हे राष्ट्रीय नेते आहेत. त्यामुळे त्यांनी योग्य निर्णय घेतला असेल. अजित पवार हे राज्यातील नेते आहेत. त्यांचे महाराष्ट्रातील स्थान कायम आहे असे मला वाटते. सुप्रिया सुळे पक्षाच्या कार्याध्यक्ष झाल्यात याचा आनंद आहे, असे राऊत म्हणाले. 

अमित शहांनी देशाची कायदा सुव्यवस्था यावर बोलावे. गुजरातचे लोहपुरुष आहेत ना मग मणिपूरची हिंसा का नाही रोखता आली. तिथे आज काय चालू आहे, असा सवाल राऊत यांनी केला. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतAmit Shahअमित शाह