शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
5
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
6
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
7
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
8
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
9
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
10
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
11
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
12
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
13
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
14
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
15
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
16
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
17
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
18
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
19
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
20
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा

भाजपाबरोबर आता राहिलेय कोण? राऊतांचे 'धोका कोणी दिला' वर शहांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2023 11:09 IST

निकाल हाती येताच उद्धव ठाकरेंनी धोका दिला असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नांदेडच्या सभेमध्ये केला होता.

निकाल हाती येताच उद्धव ठाकरेंनी धोका दिला असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नांदेडच्या सभेमध्ये केला होता. याला आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेना गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्यूत्तर दिले आहे. ठाकरेंच्या शब्दावर विश्वास ठेवतो. आजही साडे अकरा कोटी जनतेचा ठाकरेंच्या शब्दावर विश्वास आहे. बाहेरच्यांवर नाही, असे राऊत म्हणाले. 

भाजपाबरोबर आता राहिलेय कोण? त्यांच्यासोबत त्यांच्याशी निष्ठावान असलेले अकाली दल, शिवसेना राहिलेले नाही. आता त्यांना २०२४ मध्ये कळेल, कोण होते म्हणून जिंकले होते. वाघाचे कातडे घालून कोल्हे-लांडगे फिरत आहेत. खरा वाघ समोर आला की त्यांची काय अवस्था होईल हे दिसेल, असे राऊत म्हणाले.  

धोका कोणी दिला, का दिला याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे आजचे सरकार आहे. तुम्हीच काही वर्षांपूर्वी शिवसेनेला मुख्यमंत्री पद दिले नव्हते ना, आता त्याच शिवसेनेच्या फुटलेल्या गटाला मुख्यमंत्री करून मिरवताय. आम्हाला धोका दिला त्याची कबुलीच तुम्ही देताय, अशी टीका राऊत यांनी शहा यांच्या आरोपांवर केली. 

राष्ट्रवादी हा स्वतंत्र पक्ष आहे. काल त्यांचा वर्धापन दिन झाला. यावेळी शरद पवारांनी पुर्नमांडणी केली. असे बदल होत असतात काळानुसार बदल करावे लागतात. तुम्ही त्याला भाकरी फिरविली असे म्हणू शकता. शरद पवार हे राष्ट्रीय नेते आहेत. त्यामुळे त्यांनी योग्य निर्णय घेतला असेल. अजित पवार हे राज्यातील नेते आहेत. त्यांचे महाराष्ट्रातील स्थान कायम आहे असे मला वाटते. सुप्रिया सुळे पक्षाच्या कार्याध्यक्ष झाल्यात याचा आनंद आहे, असे राऊत म्हणाले. 

अमित शहांनी देशाची कायदा सुव्यवस्था यावर बोलावे. गुजरातचे लोहपुरुष आहेत ना मग मणिपूरची हिंसा का नाही रोखता आली. तिथे आज काय चालू आहे, असा सवाल राऊत यांनी केला. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतAmit Shahअमित शाह