शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
4
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
5
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
6
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
7
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
8
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
9
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
10
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
11
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
12
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
13
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
14
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
15
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
16
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
17
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
18
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
19
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
20
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर

नाना पटोलेंना विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा कोणी द्यायला लावला? पृथ्वीराज चव्हाणांनी ठेवले 'बोट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 11:39 IST

पृथ्वीराज चव्हाण यांनी 'लोकमत'ला प्रदीर्घ मुलाखत दिली. यावेळी त्यांनी राज्यातील सत्ता संघर्षावरही भाष्य केले आहे.

महाविकास आघाडीत जाण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण आग्रही होते. शिवसेनेसोबत जाण्यास विरोध करतील असे वाटले होते. परंतू तेच महाविकास आघाडीत जाण्यासाठी प्रयत्न करत होते, यावर देखील पृथ्वीराज यांनी खुलासा केला आहे. २०१४ मध्ये देखील अशी परिस्थिती निर्माण झाली होती परंतू आम्ही तेव्हा विचार केला नव्हता. मग २०१९ ला का केला? याचे उत्तर पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले. याचबरोबर त्यांनी महाविकास आघाडीतील निर्णय प्रक्रियेवरही नाराजी व्यक्त केली आहे.  

अजून तरी ती पातळी भाजपाने गाठलेली नाही; राहुल गांधींवरून पृथ्वीराज चव्हाणांनी व्यक्त केली शंका

पृथ्वीराज चव्हाण यांनी 'लोकमत'ला प्रदीर्घ मुलाखत दिली. यावेळी त्यांनी राज्यातील सत्ता संघर्षावरही भाष्य केले आहे. २०१४ मध्ये देखील अशी परिस्थिती निर्माण झाली होती परंतू आम्ही तेव्हा विचार केला नव्हता. मग आम्ही २०१९ ला का केला? याचे कारण ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीसांनी पाच वर्षे भाजपचे सरकार चालविले आणि भाजपाने विरोधकांना संपवून टाकण्याचा प्रयत्न केला, देशात विरोधी पक्ष संपवून टाका, असे वक्तव्य अमित शहांकडून झाले त्यामुळे हा विचार केला. अल्पसंख्यांक नेत्यांनीही आम्हाला महाविकास आघाडीत जाण्यास सांगितले. य़ामुळे मी पुढाकार घेतला. दिल्लीत सोनिया गांधींचे मन वळविण्यात आम्ही यशस्वी ठरलो. काही घटना घडल्या त्यामुळे सरकार पडले, अशी खंत चव्हाण यांनी व्यक्त केली.

राज्यातील सरकार प़डले त्यात आमचीही काही चूक होती. काही गोष्टी घडायला नको होत्या. अध्यक्षपद खूप महत्वाचे होते. त्यामुळे आमच्यातल्यांचा गोंधळ काही बरोबर नव्हता, असे म्हटले. यावर नाना पटोलेंनी राजीनामा दिला आणि दुसऱ्याच दिवशी त्यांना प्रदेशाध्यक्षपद दिले गेले, या मुद्द्यावर छेडले असता यावरही पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केले. 

नाना पटोलेंना राजीनामा का द्यायला लावला, या प्रश्नावर पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांना राजीनामा प्रदेशाध्यक्षपदासाठी द्यायला लावला हे स्पष्ट होते. त्यांना कोणी द्यायला लावला, या राजकारणावर मला बोलता येणार नाही, परंतू यामुळे दोन्ही मित्रपक्ष दुखावले गेले. इतक्या मोठ्या पदावर निर्णय घेताना सर्वांनी मिळून निर्णय घ्यायला हवा होता. एकतर्फी निर्णय घेता नये. त्यामुळे पुढचे राजकारण घ़डले, असे चव्हाण म्हणाले. 

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला नको होता. मी स्पष्ट बोललो होतो. त्यांनी फ्लोअर टेस्टला सामोरे जायला हवे होते. मी त्या प्रक्रियेमध्ये होतो, परंतू मला कोणी विचारले नाही, यामुळे सल्ला देण्याचा प्रश्न आला नाही. आता जे घडले तो इतिहास झालाय, पुढच्या निवडणुका तिन्ही पक्षांनी एकत्र लढवाव्यात. जागा वाटपात कुरबुरी होईल, परंतू महाराष्ट्राच्या हितासाठी विषारी विचारांच्या प्रवृत्तीला दूर ठेवले पाहिजे, यासाठी आम्ही एकत्र येऊ, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणNana Patoleनाना पटोलेUddhav Thackerayउद्धव ठाकरेcongressकाँग्रेस