शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सुनेत्रा पवारांना तिकीट देण्याचा निर्णय कुणी घेतला?; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2024 17:50 IST

माझ्या त्या विधानाचा जास्त कुणी विचार करू नका. कौटुंबिक दृष्टीने मी ते विधान केले होते असं अजित पवारांनी सांगितले. 

मुंबई - पत्नी सुनेत्रा पवार हिला बारामतीतून उभं करायला नव्हतं पाहिजे. निकालानंतर मी विचार केला ते कुटुंबाच्या दृष्टीने चुकीचे होते असं सांगत आमच्या संसदीय समितीने सुनेत्रा पवारला तिकीट देण्याचा निर्णय घेतला होता असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केले आहे. ANI ला दिलेल्या विशेष मुलाखतीत अजित पवारांनी हे भाष्य केले. 

अजित पवार म्हणाले की, जे मनात असतं ते मी बोलून टाकतो हा माझा स्वभाव आहे. निवडणूक झाल्यानंतर मी विचार केला तेव्हा बारामतीत सुनेत्राला उभं करायला नको होतं. ते कुटुंबाच्यादृष्टीने चुकीचे होते असं मला वाटलं. कुटुंबात एकमेकांविरोधात उभं राहिले. जिंकणारा आणि हरणारा हा कुटुंबातलाच एक होता. माझा स्वभाव पक्षातील सर्वांनाच माहिती आहे. कुटुंबाबाबत बोलण्याचा अधिकार मला आहे. त्यामुळे कुणी नाराज होण्याचं कारण नाही. जर कुणाला हे विधान आवडलं नसेल तर त्याचा जास्त विचार करू नका. हे विधान कौटुंबिक आहे असं त्यांनी स्पष्ट केले. 

त्याशिवाय निवडणुकीत उभं न राहणारे पहिल्यांदाच मुख्यमंत्री बनले. उद्धव ठाकरे यांच्यमागे १४५ आमदार होते. त्यामुळे मुख्यमंत्रिपदासाठी बहुमत गरजेचे असते. पृथ्वीराज चव्हाणांना तसे मुख्यमंत्रिपद मिळाले. हे दोघे पहिले मुख्यमंत्री झाले त्यानंतर आमदार बनले. विधानसभा, विधान परिषदेचा सदस्य नसतानाही मुख्यमंत्री बनू शकतात. १४५ आमदारांचे बहुमत मुख्यमंत्री व्हायला लागते. आम्ही महायुतीच्या माध्यमातून विधानसभा निवडणूक लढत आहोत. आम्हाला स्पष्ट बहुमत मिळावं यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही कामाला लागलोय. प्रत्येकजण मतदारांना आकर्षिक करण्याचा प्रयत्न करतोय. राज्यातील मतदार अंतिम निर्णय घेतील असं अजित पवारांनी सांगितले. 

दरम्यान, शरद पवारांसोबत पुन्हा एकत्र येण्याच्या प्रश्नावर अजित पवारांनी नो कमेंट्स असं उत्तर दिलं. आम्ही महायुतीचा प्रचार करत आहोत. सरकारच्या माध्यमातून अनेक योजना आणल्या आहेत. मतदारसंघातील विकासाबाबत आम्ही लोकांना सांगतोय. लोकसभेच्या निवडणुकीत आमच्याकडून ज्या कमी राहिली, मतदार दुरावले त्यांना पुन्हा आमच्यासोबत आणण्याचा प्रयत्न करतोय. लोकसभेत संविधान बदलणार, आरक्षण बदलणार असे नॅरेटिव्ह विरोधकांनी सेट केले. महाराष्ट्रात त्याचा मतदारांवर परिणाम झाला. विरोधकांच्या आरोपांवर आम्ही उत्तर देत होतो. अबकी बार ४०० पार हा नारा दिला गेला त्यामुळे लोकांच्या मनात विरोधकांनी शंका उपस्थित केली. आमच्यावर मतदारांनी विश्वास ठेवला नाही असं अजित पवारांनी सांगितले. 

निवडणूक निकालानंतर घेतला आढावा

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि मी बसलो होतो. तिघांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालामागील पराभवाची कारणे याचा आढावा घेतला. त्यामुळे पुढील रणनीतीसाठी आम्ही काही गोष्टी ठरवल्यात. निवडणूक निकालानंतर आम्ही आढावा घेतला, सहकाऱ्यांसोबत चर्चा केली. आजपासून निवडणूक होईपर्यंत केवळ विकासावर बोलायचे. विरोधकांवर काही बोलायचे नाही. मी विकासाचं राजकारण करतोय. आत्ताच्या अर्थसंकल्पात आम्ही खूप चांगल्या योजना आणल्यात. यंदा १० व्यांदा मी बजेट सादर केला. ७ योजना आम्ही लोकांसाठी आणल्या आहेत असं अजित पवारांनी सांगितले. 

स्थानिक निवडणुकीत महायुती? 

आम्ही अडीच वर्ष शिवसेनेसोबत सत्तेत राहिलो. कोरोनासारख्या कामात आम्ही लोकांसाठी जे जे काही शक्य होते ते केले. अडीच वर्ष सोबतच काम केले. एकनाथ शिंदेही मंत्रिमंडळात होते. तेदेखील कोरोना काळात काम करत होते. १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. तेव्हा आम्ही दुसऱ्या फळीत काम करायचो. सोनिया गांधींच्या परदेशी मुद्द्यांवर राष्ट्रवादीची स्थापना झाली. जूनमध्ये पक्ष स्थापन केला आणि ऑक्टोबरमध्ये काँग्रेससोबत जात सरकार बनवलं. १५ वर्ष काँग्रेस-राष्ट्रवादीनं सरकार चालवलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्ही वेगवेगळे लढत होतो. आघाडी विधानसभा, लोकसभेत असायची. महापालिका, जिल्हा परिषदेत नसायची. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत स्थानिक पदाधिकाऱ्यांची चर्चा करून युती, आघाडीचा निर्णय घेतला जातो. आम्ही संविधानाचा आदर कालही करत होतो, आजही करतो आणि उद्याही करणार आहोत. जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून आम्ही लोकांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न करत आहोत असं अजित पवारांनी सांगितले. 

 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSunetra Pawarसुनेत्रा पवारmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४NCPराष्ट्रवादी काँग्रेस