शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

सुनेत्रा पवारांना तिकीट देण्याचा निर्णय कुणी घेतला?; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2024 17:50 IST

माझ्या त्या विधानाचा जास्त कुणी विचार करू नका. कौटुंबिक दृष्टीने मी ते विधान केले होते असं अजित पवारांनी सांगितले. 

मुंबई - पत्नी सुनेत्रा पवार हिला बारामतीतून उभं करायला नव्हतं पाहिजे. निकालानंतर मी विचार केला ते कुटुंबाच्या दृष्टीने चुकीचे होते असं सांगत आमच्या संसदीय समितीने सुनेत्रा पवारला तिकीट देण्याचा निर्णय घेतला होता असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केले आहे. ANI ला दिलेल्या विशेष मुलाखतीत अजित पवारांनी हे भाष्य केले. 

अजित पवार म्हणाले की, जे मनात असतं ते मी बोलून टाकतो हा माझा स्वभाव आहे. निवडणूक झाल्यानंतर मी विचार केला तेव्हा बारामतीत सुनेत्राला उभं करायला नको होतं. ते कुटुंबाच्यादृष्टीने चुकीचे होते असं मला वाटलं. कुटुंबात एकमेकांविरोधात उभं राहिले. जिंकणारा आणि हरणारा हा कुटुंबातलाच एक होता. माझा स्वभाव पक्षातील सर्वांनाच माहिती आहे. कुटुंबाबाबत बोलण्याचा अधिकार मला आहे. त्यामुळे कुणी नाराज होण्याचं कारण नाही. जर कुणाला हे विधान आवडलं नसेल तर त्याचा जास्त विचार करू नका. हे विधान कौटुंबिक आहे असं त्यांनी स्पष्ट केले. 

त्याशिवाय निवडणुकीत उभं न राहणारे पहिल्यांदाच मुख्यमंत्री बनले. उद्धव ठाकरे यांच्यमागे १४५ आमदार होते. त्यामुळे मुख्यमंत्रिपदासाठी बहुमत गरजेचे असते. पृथ्वीराज चव्हाणांना तसे मुख्यमंत्रिपद मिळाले. हे दोघे पहिले मुख्यमंत्री झाले त्यानंतर आमदार बनले. विधानसभा, विधान परिषदेचा सदस्य नसतानाही मुख्यमंत्री बनू शकतात. १४५ आमदारांचे बहुमत मुख्यमंत्री व्हायला लागते. आम्ही महायुतीच्या माध्यमातून विधानसभा निवडणूक लढत आहोत. आम्हाला स्पष्ट बहुमत मिळावं यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही कामाला लागलोय. प्रत्येकजण मतदारांना आकर्षिक करण्याचा प्रयत्न करतोय. राज्यातील मतदार अंतिम निर्णय घेतील असं अजित पवारांनी सांगितले. 

दरम्यान, शरद पवारांसोबत पुन्हा एकत्र येण्याच्या प्रश्नावर अजित पवारांनी नो कमेंट्स असं उत्तर दिलं. आम्ही महायुतीचा प्रचार करत आहोत. सरकारच्या माध्यमातून अनेक योजना आणल्या आहेत. मतदारसंघातील विकासाबाबत आम्ही लोकांना सांगतोय. लोकसभेच्या निवडणुकीत आमच्याकडून ज्या कमी राहिली, मतदार दुरावले त्यांना पुन्हा आमच्यासोबत आणण्याचा प्रयत्न करतोय. लोकसभेत संविधान बदलणार, आरक्षण बदलणार असे नॅरेटिव्ह विरोधकांनी सेट केले. महाराष्ट्रात त्याचा मतदारांवर परिणाम झाला. विरोधकांच्या आरोपांवर आम्ही उत्तर देत होतो. अबकी बार ४०० पार हा नारा दिला गेला त्यामुळे लोकांच्या मनात विरोधकांनी शंका उपस्थित केली. आमच्यावर मतदारांनी विश्वास ठेवला नाही असं अजित पवारांनी सांगितले. 

निवडणूक निकालानंतर घेतला आढावा

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि मी बसलो होतो. तिघांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालामागील पराभवाची कारणे याचा आढावा घेतला. त्यामुळे पुढील रणनीतीसाठी आम्ही काही गोष्टी ठरवल्यात. निवडणूक निकालानंतर आम्ही आढावा घेतला, सहकाऱ्यांसोबत चर्चा केली. आजपासून निवडणूक होईपर्यंत केवळ विकासावर बोलायचे. विरोधकांवर काही बोलायचे नाही. मी विकासाचं राजकारण करतोय. आत्ताच्या अर्थसंकल्पात आम्ही खूप चांगल्या योजना आणल्यात. यंदा १० व्यांदा मी बजेट सादर केला. ७ योजना आम्ही लोकांसाठी आणल्या आहेत असं अजित पवारांनी सांगितले. 

स्थानिक निवडणुकीत महायुती? 

आम्ही अडीच वर्ष शिवसेनेसोबत सत्तेत राहिलो. कोरोनासारख्या कामात आम्ही लोकांसाठी जे जे काही शक्य होते ते केले. अडीच वर्ष सोबतच काम केले. एकनाथ शिंदेही मंत्रिमंडळात होते. तेदेखील कोरोना काळात काम करत होते. १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. तेव्हा आम्ही दुसऱ्या फळीत काम करायचो. सोनिया गांधींच्या परदेशी मुद्द्यांवर राष्ट्रवादीची स्थापना झाली. जूनमध्ये पक्ष स्थापन केला आणि ऑक्टोबरमध्ये काँग्रेससोबत जात सरकार बनवलं. १५ वर्ष काँग्रेस-राष्ट्रवादीनं सरकार चालवलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्ही वेगवेगळे लढत होतो. आघाडी विधानसभा, लोकसभेत असायची. महापालिका, जिल्हा परिषदेत नसायची. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत स्थानिक पदाधिकाऱ्यांची चर्चा करून युती, आघाडीचा निर्णय घेतला जातो. आम्ही संविधानाचा आदर कालही करत होतो, आजही करतो आणि उद्याही करणार आहोत. जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून आम्ही लोकांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न करत आहोत असं अजित पवारांनी सांगितले. 

 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSunetra Pawarसुनेत्रा पवारmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४NCPराष्ट्रवादी काँग्रेस