शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

युती कोणी तोडली? ठाकरे-भाजपात जुंपली; राऊत म्हणतात, 'या' नेत्यानं फोन केला होता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 12:02 IST

शरद पवारांविषयी तुम्हाला एवढा आदर आहे म्हणून तुम्ही त्यांचा पक्ष फोडला का? असा सवाल राऊतांनी पंतप्रधान मोदींना केला.

मुंबई – शिवसेना-भाजपा युती उद्धव ठाकरेंमुळे तुटली असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एनडीए खासदारांच्या बैठकीत केले. आता या विधानावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. २०१४ मध्ये भाजपानेच युती तोडली होती. तत्कालीन भाजपा नेत्याने तसा फोनही केला होता असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले की, पंतप्रधान दिशाभूल करत आहेत. २०१४ ची परिस्थिती पंतप्रधान मोदींना आठवायला हवी. २०१४ मध्ये शिवसेनेशी साथ कुणी आणि कशासाठी सोडली? हे अख्ख्या देशाने पाहिलंय. शिवसेना त्यानंतर स्वातंत्र्य निवडणूक लढली. आपली युती तुटली, आपण वेगळे झालोय असं भाजपाकडून अधिकृतपणे एकनाथ खडसे यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून सांगितले होते. त्यामुळे शिवसेनेशी साथ कुणी सोडली याबाबत पंतप्रधानांनी जुना रेकॉर्ड तपासून पाहावा असं त्यांनी म्हटलं.

त्याचसोबत शरद पवारांविषयी तुम्हाला एवढा आदर आहे म्हणून तुम्ही त्यांचा पक्ष फोडला का? शरद पवार आणि काँग्रेस यांचे वेगळे राजकारण आहे. लालकृष्ण आडवाणी यांना राष्ट्रपती होण्यापासून पंतप्रधानांनी रोखलं, आडवाणींना राजकीय सन्यास घेण्यासाठी भाग पाडलं असं आम्ही म्हणतो का? हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. तसेच काँग्रेस आणि शरद पवार हादेखील त्यांच्यातील अंतर्गत प्रश्न आहे असा टोलाही संजय राऊतांनी भाजपाला लगावला.

काय म्हणाले होते नरेंद्र मोदी?

NDA च्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी युतीवरून उद्धव ठाकरेंवर घणाघात केला. आम्ही शिवसेनेसोबत युती तोडली नाही तर त्यांनी तोडली. २०१४ पासून शिवसेना युतीत असूनही त्यांचे मुखपत्र सामनातून सरकारवर टीका करत राहिले. आम्ही एकत्रित निवडणूक लढवल्या आणि जिंकल्याही. जे पक्ष एनडीएत सहभागी होतात त्यांचे स्वागत आहे. आम्हाला एनडीएचा विस्तार करायचा आहे. सत्तेत असतानाही शिवसेना टीका करायची. विनाकारण वाद उकरून काढायची. आम्ही सर्वकाही सहन केले, कमीपणा घेतला, तुम्हाला सत्तेत पण राहायचे आणि टीकाही करायची या दोन्ही एकत्र कशा होऊ शकतात? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला होता.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाShiv Senaशिवसेना