शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
4
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
5
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
6
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
9
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
10
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
11
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
12
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
13
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
14
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
15
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
16
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
17
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
18
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
19
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
20
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी

प्रकाश मेहतांना तुरुंगात टाकणार का; मुंडेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 2:21 AM

मंत्रिमंडळातून वगळलेल्या आणि भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप असलेल्या मंत्र्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

मुंबई : माजी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यावर एफ एस आय घोटाळ्याचा आरोप करणारे राधाकृष्ण विखे पाटील आता गृहनिर्माण मंत्री झाले आहेत. त्यामुळे नवेगृहनिर्माण मंत्री जुन्या गृहनिर्माण मंत्र्यांना तुरूंगात पाठवणार का, असा सवाल विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी बुधवारी विधानपरिषदेत केला. तसेच मंत्रिमंडळातून वगळलेल्या आणि भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप असलेल्या मंत्र्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली.राज्यपाल अभिभाषणावरच्या आभारदर्शक प्रस्तावावरील चर्चेत बोलताना मुंडे यांनी राज्य सरकारवर टीका केली. राज्य सरकारने गेल्या पाच वर्षात दिलेले एकही आश्वासन पाळले नाही, राज्यपालांचे अभिभाषण आणि राज्यातल्या वस्तुस्थितीचा काडीमात्र संबंध नसल्याचे मुंडे म्हणाले. राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर भाजपने लोकसभेची निवडणूक जिंकली. यापूर्वीच्या सरकारांनी राष्ट्रवादावर कधीच मत मागितली नाहीत कारण त्या सरकारांची कामगिरी भरीव होती, भाजपने मात्र शहिदांच्या नावावर मत मागितली. मूलभूत प्रश्नाना बगल देत ईव्हीएमच्या मदतीने लोकसभा जिंकली अशी टीका मुंडे यांनी केली.भाजपने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा सत्तेवर येण्यापूर्वी केली होती. उत्पन्न दुप्पट झाले नाही, उलट शेतमालाचे भाव पाडले. आता उत्पन्न दुप्पट करण्यासाठी २९२२चा वादा करून शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक केली जात आहे, असेही मुंडे म्हणाले.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेPrakash Mehtaप्रकाश मेहता