शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
2
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
3
युझवेंद्र चहल ई-सिगारेट पिताना दिसला, पण कारवाई मात्र अर्शदीप सिंगवर होणार? जाणून घ्या प्रकरण
4
पेट्रोल पंपांवर मोफत मिळतात 'या' ६ सुविधा; पैसे मागितले तर करू शकता तक्रार, जाणून घ्या तुमचा अधिकार
5
Nashik TCS Case: निदा खानचा हैदराबादला पळण्याचा प्लॅन कसा फसला? एआयएमआयएम नेत्याचा मोबाईल सापडला अन्...
6
घरबसल्या दरमहा कमवू शकता २० हजार रुपये; जाणून घ्या Post Officeच्या या सुपरहिट योजनेचं गणित
7
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
8
एज व्हेरिफिकेशन करताना इंटरनेट कंपन्यांच्या नाकी नऊ; खोट्या दाढी-मिशा लावून मुलं करतायत सिस्टिमची फसवणूक!
9
‘मुलीच्या डोक्यावर केस कमी आहेत...’ सांगत साखरपुडा मोडला, 'खरं' कारण कळताच सगळ्यांचा संताप झाला!
10
होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिका-इराण भिडले! युद्धविराम धुडकावून गोळीबार; हल्ल्यामुळे जहाजाला लागली आग
11
भारताचा दणका अन् चीनचा खोटारडेपणा! १ वर्षानंतर चीनने जगासमोर मान्य केलं ऑपरेशन सिंदूरमधील 'ते' सत्य
12
पुन्हा उधारीच्या भरवशावर पाकिस्तान! IMF कडून १.३२ बिलियन डॉलर्सची मदत; पण जनतेचे कंबरडे मोडणार?
13
लेफ्टिनेंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी देशाचे नवे CDS, अशी आहे त्यांची कारकीर्द 
14
Dividend Stock: एका शेअरवर ७५ रुपयांचा डिविडंड देतेय 'ही' दिग्गज कंपनी, रेकॉर्ड डेट निश्चित, ब्रोकरेजनं वाढवलं टार्गेट
15
लग्नानंतर २६ वर्षांनी आर. माधवनने सांगितली पुरुषांची 'मन की बात'! पत्नीकडून असतात 'या' अपेक्षा
16
तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास ५० लाख दंड! ट्रायचे कठोर पाऊल; नवीन नियमावलीचा मसुदा जाहीर
17
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
18
Petrol Diesel Rate: पेट्रोल डिझेलचे दर वाढणार का? सरकारच्या एका निर्णयाचा कंपन्यांना मोठा फटका; महिन्याला होतंय ₹३०००० कोटींचं नुकसान
19
आजचे राशीभविष्य, ०९ मे २०२६: नवीन योजना आखाल, नातेवाईक-मित्रांकडून सुखद बातमी मिळेल! 'असा' जाईल आजचा दिवस 
20
बऱ्याच दिवसांनी दिसला परश्या, पुण्यातील इव्हेंटमध्ये रिंकू-आकाशची हजेरी; नंतर दोघांची धमालमस्ती
Daily Top 2Weekly Top 5

देश कुठे चालला आहे ?

By admin | Updated: August 18, 2014 00:33 IST

खासगीकरणाच्या नावावर देशाला विकण्याचे कारस्थान सुरू आहे. सर्वच सार्वजनिक उद्योगाचे खासगीकरण करण्यात आले असून यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे फिक्सींग आहे. देशातील राजकीय पक्ष हे टाटा,

अर्थसंकल्पाची आंबेडकरी मीमांसा : ब्रिगेडियर सुधीर सावंत यांचा सवाल
नागपूर : खासगीकरणाच्या नावावर देशाला विकण्याचे कारस्थान सुरू आहे. सर्वच सार्वजनिक उद्योगाचे खासगीकरण करण्यात आले असून यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे फिक्सींग आहे. देशातील राजकीय पक्ष हे टाटा, बिर्ला आणि अंबानीसारख्या उद्योगपतींच्या इशाऱ्यावर चालत असून देश नव्या ईस्ट इंडिया कंपनीचा गुलाम बनला आहे. सध्याची परिस्थिती बघता देश कुठे चालला आहे, असा सवाल मत शिवराज्य पक्षाचे अध्यक्ष ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी येथे व्यक्त केले.
समता सैनिक दलातर्फे शनिवारी हिंदी मोरभवन येथे ‘भारत सरकारच्या अर्थसंकल्पाची आंबेडकरी मीमांसा’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी समता सैनिक दलाचे केंद्रीय संघटक अ‍ॅड. विमलसूर्य चिमणकर होते तर समता सैनिक दलाचे राष्ट्रीय निमंत्रक अशोक बोंदाडे आणि राष्ट्रीय प्रचारक प्रकाश दार्शनिक प्रमुख वक्ते होते.
ब्रिगेडियर सावंत यांनी आपल्या भाषणात भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला चांगलेच धारेवर धरले. या देशातील समतावादी संस्कृती नष्ट करण्यासाठी विषमतावादी अर्थव्यवस्था रुजविण्याचे काम भाजपा करीत आहे. भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दुतोंडी आहे. खासगीकरणाच्या माध्यमातूनच या देशाचा विकास होऊ शकतो, अशी नवी समज देशात रुजविण्याचे कारस्थान सुरू आहे. संरक्षण व विमा क्षेत्रातील एफडीआय (प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक) ही ४९ टक्क्यावर नेऊन या देशातील डिफेन्सच्या जमिनी विक्रीला निघाल्या आहेत. इस्रायल व अमेरिकन कंपन्यांशी संगनमत करून हे सर्व केले जात आहे. काँग्रेस आणि भाजपा हे एकमेकांना कितीही शिवीगाळ करीत असले तरी ते याबाबत जुळी भावंडे आहेत. दोघांचाही उद्देश एकच आहे. उद्योगाला चालना देण्याच्या गोंडस नावाखाली सामान्य बहुजनांना संरक्षण देणारे कायदे रद्द केले जात आहेत.
जोपर्यंत या देशातील शेतकऱ्यांच्या हातात पैसा येणार नाही तोपर्यंत देश विकास करू शकणार नाही. सामान्य माणूस सशक्त झाला नाही तर देश सक्षम कसा होणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. प्रकाश दार्शनिक यांनीही अर्थसंकल्पातील सामान्यजनांवरील अन्यायावर प्रकाश टाकला. अशोक बोंदाडे यांनी प्रस्ताविक केले. डी.पी. रुपनारायण यांनी संचालन केले. सुनील सारिपुत्र यांनी आभार मानले. कार्यक्रमाला डॉ. विमलकिर्ती, ई.मो. नारनवरे, घनश्याम फुसे, शंकर मानके, डी.बी. वानकर, केतन पिंपळापुरे, एकनाथ ताकसांडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)