शहरं
Join us  
Trending Stories
1
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
2
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
3
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
4
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
5
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
6
Mahabharat: एखादी गोष्ट बायकांच्या पोटात राहत नाही, त्याला कारणीभूतआहे महाभारतातली 'ही' कथा!
7
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
8
PM Kisan योजनेच्या २० व्या हप्त्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक; लाभार्थींच्या यादीत नाव आहे का चेक करा
9
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
10
चीनमुळे अनेक उद्योगांवर संकट, सामना करण्यासाठी आता भारताचा 'मास्टर प्लान', सरकार उचलणार पाऊल?
11
महाराष्ट्र बदलतोय : पैठणी ते कोल्हापुरी चप्पल, MSME उद्योगांची डिजिटल झेप!
12
२ पिढ्या पण ध्येय एकच! माय-लेकीच्या जोडीची दमदार कामगिरी, एकत्र पास केली NEET
13
दमदार इंजिन, शानदार मायलेज..; Honda ने लॉन्च केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत...
14
Powerful Air Forces : जगातील सगळ्यात ताकदवान हवाई दलं; भारत 'टॉप ५'मध्ये कितव्या स्थानावर?
15
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
16
रमीला ऑलिम्पिक दर्जा मिळणार, कोकाटेंना क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच; काँग्रेसचा महायुतीला चिमटा
17
Monsoon Recipe: तुम्ही कधी पंजाबी शिरा 'प्यायलात' का? ट्राय करा, पावसाळी आजारांवरचा चविष्ट उपाय!
18
ओव्हल कसोटीत टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, ठरू शकते पराभवाचं कारण  
19
UPI New Rule: आजपासून लागू झाले यूपीआयचे नवे नियम; सारखं सारखं करता येणार नाही 'हे' काम
20
दीड वर्षांचा लेक, महिन्याभरापूर्वी प्रमोशन; लेफ्टनंट कर्नल भानू प्रताप शहीद, दगड पडले अन्...

एकनाथ शिंदेंचे 'चलो मुंबई'; आजच राज्यपाल आणि देवेंद्र फडणवीसांना भेटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 13:03 IST

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाचा शेवट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याने झाला.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाचा शेवट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याने झाला. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळलं. शिवसेनेनं इतिहासातील आजवरच्या सर्वात मोठ्या बंडाचा सामना केला. दरम्यान, यानंतर आता राज्यात नव्या सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. राज्यात सरकार केव्हा स्थापन होईल हे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी यावर भाष्य केलं.

आज शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची एक बैठक पार पडली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी गटनेता म्हणून निवड करण्यात आली आहे. “आजच्या बैठकीत शिवसेनेचा गटनेता म्हणून माझी निवड करण्यात आली आहे. सर्व ५० आमदारांनी मला अधिकार दिले आहेत आणि अधिकृत केलं आहे. पुढची रणनीती मुंबईत गेल्यानंतर ठरवून कळवली जाईल. नंतर मी पुन्हा गोव्याला जाणार आहे. सध्या दोन प्रस्ताव दिले आहेत. त्यानुसार मी तिकडे जात आहे,” असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. 

“उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला त्याचा आनंद आम्हाला नाही. आमची ५० आमदारांची मागणी एकच होती. मतदार संघातले जे प्रश्न आणि अडचणी होत्या, त्यांना जे काही वाईट चांगले अनुभव येत होते, बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचार पुढे नेऊया अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे होती. वेळीच यावर निर्णय घेतला असता तर ही वेळ आली नसती. उद्धव ठाकरेंबाबत कालही आणि आजही आम्हाला आदर आहे. मी सध्या मुंबईत गेल्यावर यावर बैठक होईल आणि त्यांनतर त्यावर निर्णय होईल. राज्यपालांशी भेट होईल त्यानंतर पुढील रणनीती सांगितली जाईल आणि नंतर देवेंद्र फडणवीसांचीही भेट घेणार आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळUddhav Thackerayउद्धव ठाकरे