शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

मुंबईची तहान भागवणाऱ्या तालुक्याची पाणी टंचाई कधी दूर होणार : पांडुरंग बरोरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 13:27 IST

शहापूर तालुक्यातील पाणी प्रश्न मागील साडेचार वर्षात आतापर्यंत पाच वेळा लक्षवेधीत मांडला, मात्र अजूनही कोणतेही उपयोजना करण्यात आल्या नाहीत.

मुंबई - महाराष्ट्राला यावेळी दुष्काळाचा मोठा फटका बसला आहे. धरणांचा तालुका समजल्या जाणारा आणि मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारा शहापूर तालुका सुद्धा दुष्काळाच्या संकटात सापडला आहे. त्यामुळे देशाच्या आर्थिक राजधानीची तहान भागवणाऱ्या शहापूर तालुक्यातील पाणी टंचाई कधी दूर होणार असा प्रश्न राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी विधानसभेत उपस्थित केला.

शहापूर तालुक्यात यावेळी सुद्धा पाणी टंचाई निर्माण झाली आहे. याच मुद्यावरून सोमवारी विधानसभेत आमदार पांडुरंग बरोरा यांनी सरकारला जाब विचारला. शहापूर तालुक्यातील पाणी प्रश्न मागील साडेचार वर्षात आतापर्यंत पाच वेळा लक्षवेधीत मांडला, मात्र अजूनही कोणतेही उपयोजना करण्यात आल्या नाहीत. तालुक्यातील २८५ गावांना पाणी टंचाईचा फटका बसला आहे. २२५ गावांना ३७ टँकरने पाणी पुरवठा केला जात असल्याची आकडेवारी बरोरा यांनी विधानसभेत मांडली. तर, मुंबईची तहान भागवणाऱ्या शहापूर तालुक्याची तहान कधी भागवणार असा प्रश्न बरोरा यांनी उपस्थित केला.

भाजप सरकार आल्यानंतर पहिल्याच अधिवेशनात पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी जिल्हा परिषदेला आदेश दिले होती की,सर्वे करून तातडीने पाणी पुरवठा योजना राबवून पाणी टंचाई दूर करा. प्रत्यक्षात काही काम झालेच नाही. राष्ट्रीय पेयजल योजनेतून २८५ गावांसाठी डीपीआर तयार करण्यात आला आहे. या योजनेला तांत्रिक मान्यता सुद्धा मिळाली आहे. मात्र उद्या संपणाऱ्या अधिवेशनापूर्वी या योजनेला प्रशासकीय मान्यता देण्यात यावी, तसेच आगामी निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी निविदा काढण्यात यावी अशी मागणी आमदार पांडुरंग बरोरा यांनी केली.