शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

मुंबईची तहान भागवणाऱ्या तालुक्याची पाणी टंचाई कधी दूर होणार : पांडुरंग बरोरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 13:27 IST

शहापूर तालुक्यातील पाणी प्रश्न मागील साडेचार वर्षात आतापर्यंत पाच वेळा लक्षवेधीत मांडला, मात्र अजूनही कोणतेही उपयोजना करण्यात आल्या नाहीत.

मुंबई - महाराष्ट्राला यावेळी दुष्काळाचा मोठा फटका बसला आहे. धरणांचा तालुका समजल्या जाणारा आणि मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारा शहापूर तालुका सुद्धा दुष्काळाच्या संकटात सापडला आहे. त्यामुळे देशाच्या आर्थिक राजधानीची तहान भागवणाऱ्या शहापूर तालुक्यातील पाणी टंचाई कधी दूर होणार असा प्रश्न राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी विधानसभेत उपस्थित केला.

शहापूर तालुक्यात यावेळी सुद्धा पाणी टंचाई निर्माण झाली आहे. याच मुद्यावरून सोमवारी विधानसभेत आमदार पांडुरंग बरोरा यांनी सरकारला जाब विचारला. शहापूर तालुक्यातील पाणी प्रश्न मागील साडेचार वर्षात आतापर्यंत पाच वेळा लक्षवेधीत मांडला, मात्र अजूनही कोणतेही उपयोजना करण्यात आल्या नाहीत. तालुक्यातील २८५ गावांना पाणी टंचाईचा फटका बसला आहे. २२५ गावांना ३७ टँकरने पाणी पुरवठा केला जात असल्याची आकडेवारी बरोरा यांनी विधानसभेत मांडली. तर, मुंबईची तहान भागवणाऱ्या शहापूर तालुक्याची तहान कधी भागवणार असा प्रश्न बरोरा यांनी उपस्थित केला.

भाजप सरकार आल्यानंतर पहिल्याच अधिवेशनात पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी जिल्हा परिषदेला आदेश दिले होती की,सर्वे करून तातडीने पाणी पुरवठा योजना राबवून पाणी टंचाई दूर करा. प्रत्यक्षात काही काम झालेच नाही. राष्ट्रीय पेयजल योजनेतून २८५ गावांसाठी डीपीआर तयार करण्यात आला आहे. या योजनेला तांत्रिक मान्यता सुद्धा मिळाली आहे. मात्र उद्या संपणाऱ्या अधिवेशनापूर्वी या योजनेला प्रशासकीय मान्यता देण्यात यावी, तसेच आगामी निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी निविदा काढण्यात यावी अशी मागणी आमदार पांडुरंग बरोरा यांनी केली.