शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
2
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
3
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
4
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
5
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
6
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
7
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
8
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
9
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
10
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
11
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
12
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
13
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
14
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
15
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
16
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
17
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!
18
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
19
Bigg Boss 19: सलमानच्या शोची उपेंद्र लिमयेंना ऑफर? अभिनेता म्हणाला- "मला अनेकांनी विचारलं..."
20
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी

महाव्यवस्थापकच गोंधळतात तेव्हा...

By admin | Updated: May 7, 2014 01:26 IST

दिवा-सावंतवाडी ट्रेनला अपघात झाल्याचे अनेक तर्कवितर्क लावण्यात येत असले तरी हा अपघात प्रथमदर्शनी वेल्डिंगच्या समस्येमुळे झाल्याचे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनिल कुमार सूद यांनी सांगितले.

वेल्डिंगच्या समस्येमुळे अपघात झाल्याच्या वक्तव्यात तीन वेळा बदल

दिवा-सावंतवाडी पॅसेंजर ट्रेनला अपघात

मुंबई - दिवा-सावंतवाडी ट्रेनला अपघात झाल्याचे अनेक तर्कवितर्क लावण्यात येत असले तरी हा अपघात प्रथमदर्शनी वेल्डिंगच्या समस्येमुळे झाल्याचे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनिल कुमार सूद यांनी सांगितले. मंगळवारी ते या अपघाताची सविस्तर माहीती देताना पत्रकारांशी बोलत होते. अपघाताबद्दलचे कारण महाव्यवस्थापकाकडून सांगतानाच हा अपघात वेल्डिंगमुळे झाला नसल्याचे पुन्हा सांगत त्याबद्दल तीन वेळा आपले वक्तव्य बदलण्यात आले आणि पुर्ता गोंधळच पत्रकार परीषदेत उडवून दिला. या गोंधळानंतर सुरक्षा आयुक्तांच्या अहवालानंतर ते स्पष्ट होईल, अशी माहीती त्यांच्याकडून त्वरीत देण्यात आली. दिवा-सावंतवाडी पॅसेंजर ट्रेनला अपघात झाल्यानंतर मध्य रेल्वेच्या कारभाराविषयी अनेक प्रश्न उपस्थित झाले. यावर बोलताना सूद म्हणाले की, देखभाल आणि दुरुस्ती ही आमच्याकडून कमी होत असल्याचे जरी सांगितले जात असले तरी ते खरे नाही. रेल्वे रुळांची देखभाल ही किमॅनकडून केली जाते. असे अपघात हे किमॅनकडूनच रोखले जावू शकतात. आतापर्यंत त्यांच्याकडून अनेक चांगल्या कामगिरी पार पाडण्यात आल्या असून आपल्या कामात ते ९५ टक्के यशस्वी ठरतात. त्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण करणे चुकीचे आहे. त्यांच्या २0 टक्के जागा जरी रिक्त असल्या तरी त्या आमच्याकडून भरण्यात येतात. मात्र कालांतराने त्या जागा पुन्हा रिक्त होत असल्याचे त्यांनी सांगितले. या पॅसेंजर ट्रेनचा झालेला अपघात हा वेल्डिंग बरोबर नसल्यानेच झाला असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आल्याचे सांगत त्यांनी मानवी चुकांमुळे झालेल्या अपघाताला पुष्टी दिली. मात्र हे सांगताच आम्ही सर्व बाजू तपासत असून हा अपघात वेल्डिंगमधील चुकांमुळेच झाला असेल ते सांगणे कठीण असून सध्या उन्हाळा वाढला असून तापमानातील वाढीमुळे रुळात बदल झाल्याचे सांगत हेदेखिल एक कारण असल्याचे सूद यांनी सांगितले. या दोन कारणांनंतर पुन्हा वेल्डिंग करण्यात चूक झाल्याची शक्यता वर्तवत ज्यांनी हे काम केले त्याचा सत्कार केला पाहिजे, असे आश्चर्यकारक विधान केले आणि एकच गोंधळ उडवून दिला. त्यानंतर सुरक्षा आयुक्तांच्या अहवालानंतरच अपघाताचे कारण स्पष्ट होऊ शकते, असे सांगत दोन महिन्यात हा अहवाल सादर होईल, अशी माहीती त्यांनी दिली. ......................................................मुख्यमंत्र्यांनाच विचारा...नागोठणे येथील अपघातस्थळी भेट दिल्यानंतर आणि जखमी रुग्णांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री रेल्वेच्या कारभारावरच प्रश्न उपस्थित केले होते. पश्चिम आणि मध्य रेल्वेमध्ये कामकाजाचा समन्वय नसून त्यामुळे गोंधळ उडत असल्याचे ते म्हणाले होते. याबाबत महाव्यवस्थापक सुनिल कुमार सूद यांना विचारले असता, तुम्ही मुख्यमंत्र्यांनाच विचारा असे त्यांनी पत्रकारांनाच सांगितले. ...........................................एका वर्षात २६0 वेळा रेल्वे सेवा होते विस्कळीतमध्य रेल्वेच्या मुंबई विभागात एका वर्षात जवळपास २५0 ते २६0 रेल्वे सेवा विस्कळीतचे प्रमाण असल्याचे यावेळी सूद यांनी सांगितले. सेवा विस्कळीतचे प्रमाण कमी व्हावे यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले.