शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
2
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
3
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“इतर पक्ष कसे चालावे हेही देवाभाऊ ठरवतात, सर्वांचे राजकीय गुरू”; भाजपा नेत्यांनी केले कौतुक
5
बाबासाहेबांचा मूलमंत्र आजही मार्गदर्शक; ‘भीम ज्योत’चे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
6
भारतात अनेकदा आले, पण पुतिन पाकमध्ये एकदाही का गेले नाहीत?; जाणकारांनी केला मोठा खुलासा
7
मंदिराने ठेवलेली एफडी बँकांना हडपायची होती, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ती देवाची संपत्ती...
8
नाताळ, थर्टीफर्स्टपर्यंत तरी इंडिगोची सेवा सुरु होणार का? CEO पीटर एल्बर्स म्हणाले, 'या' तारखेपर्यंत सेवा पूर्ववत होईल
9
सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
10
पुतिन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्टेट डिनरचे आयोजन; राहुल-खरगे नाही, थरुरांना निमंत्रण
11
'वैभव'शाही वर्ष! १४ वर्षांच्या पोरानं MS धोनी-विराटला मागे टाकत सेट केला आपला ट्रेंड
12
"इम्रान खान 'वेडा', त्याची विधाने देशाविरोधी अन् चिथावणीखोर"; पाकिस्तान आर्मीचा मोठा दावा
13
Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
14
IND vs SA वनडेआधी मोठी दुर्घटना टळली, फॅन्सच्या गर्दीमुळे होती चेंगराचेंगरीची भीती (VIDEO)
15
पुतिन यांचा दौरा सुफल, भारत अन् रशियात ७ मोठे अन् महत्त्वाचे करार; पंतप्रधान मोदी म्हणाले...
16
Indigo Crisis: भावाचा मृत्यू, मृतदेह कोलकात्यात; कुटुंबीय विमान रद्द झाल्याने मुंबईत अडकले...
17
“मशिदीला आक्षेप नाही, धार्मिक कारणांसाठी मंदिरे तोडली नाहीत”; शंकराचार्य नेमके काय म्हणाले?
18
एका व्यक्तीने स्वत:ची 'पावर' वापरून इंडिगोला १०० विमाने मिळवून दिलेली; एक वाद अन् आज तोच सोबत नाही...
19
Viral Video : 'क्या खूब लगती हो...'; गाण्यावर रील बनवताना घसरून धपकन पडली महिला, व्हिडीओ बघून लोक म्हणाले-
20
उर्मिला मातोंडकरसोबत जास्त सिनेमे, दोघांचं होतं अफेअर? राम गोपाल वर्मांनी सोडलं मौन; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

महाव्यवस्थापकच गोंधळतात तेव्हा...

By admin | Updated: May 7, 2014 01:26 IST

दिवा-सावंतवाडी ट्रेनला अपघात झाल्याचे अनेक तर्कवितर्क लावण्यात येत असले तरी हा अपघात प्रथमदर्शनी वेल्डिंगच्या समस्येमुळे झाल्याचे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनिल कुमार सूद यांनी सांगितले.

वेल्डिंगच्या समस्येमुळे अपघात झाल्याच्या वक्तव्यात तीन वेळा बदल

दिवा-सावंतवाडी पॅसेंजर ट्रेनला अपघात

मुंबई - दिवा-सावंतवाडी ट्रेनला अपघात झाल्याचे अनेक तर्कवितर्क लावण्यात येत असले तरी हा अपघात प्रथमदर्शनी वेल्डिंगच्या समस्येमुळे झाल्याचे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनिल कुमार सूद यांनी सांगितले. मंगळवारी ते या अपघाताची सविस्तर माहीती देताना पत्रकारांशी बोलत होते. अपघाताबद्दलचे कारण महाव्यवस्थापकाकडून सांगतानाच हा अपघात वेल्डिंगमुळे झाला नसल्याचे पुन्हा सांगत त्याबद्दल तीन वेळा आपले वक्तव्य बदलण्यात आले आणि पुर्ता गोंधळच पत्रकार परीषदेत उडवून दिला. या गोंधळानंतर सुरक्षा आयुक्तांच्या अहवालानंतर ते स्पष्ट होईल, अशी माहीती त्यांच्याकडून त्वरीत देण्यात आली. दिवा-सावंतवाडी पॅसेंजर ट्रेनला अपघात झाल्यानंतर मध्य रेल्वेच्या कारभाराविषयी अनेक प्रश्न उपस्थित झाले. यावर बोलताना सूद म्हणाले की, देखभाल आणि दुरुस्ती ही आमच्याकडून कमी होत असल्याचे जरी सांगितले जात असले तरी ते खरे नाही. रेल्वे रुळांची देखभाल ही किमॅनकडून केली जाते. असे अपघात हे किमॅनकडूनच रोखले जावू शकतात. आतापर्यंत त्यांच्याकडून अनेक चांगल्या कामगिरी पार पाडण्यात आल्या असून आपल्या कामात ते ९५ टक्के यशस्वी ठरतात. त्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण करणे चुकीचे आहे. त्यांच्या २0 टक्के जागा जरी रिक्त असल्या तरी त्या आमच्याकडून भरण्यात येतात. मात्र कालांतराने त्या जागा पुन्हा रिक्त होत असल्याचे त्यांनी सांगितले. या पॅसेंजर ट्रेनचा झालेला अपघात हा वेल्डिंग बरोबर नसल्यानेच झाला असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आल्याचे सांगत त्यांनी मानवी चुकांमुळे झालेल्या अपघाताला पुष्टी दिली. मात्र हे सांगताच आम्ही सर्व बाजू तपासत असून हा अपघात वेल्डिंगमधील चुकांमुळेच झाला असेल ते सांगणे कठीण असून सध्या उन्हाळा वाढला असून तापमानातील वाढीमुळे रुळात बदल झाल्याचे सांगत हेदेखिल एक कारण असल्याचे सूद यांनी सांगितले. या दोन कारणांनंतर पुन्हा वेल्डिंग करण्यात चूक झाल्याची शक्यता वर्तवत ज्यांनी हे काम केले त्याचा सत्कार केला पाहिजे, असे आश्चर्यकारक विधान केले आणि एकच गोंधळ उडवून दिला. त्यानंतर सुरक्षा आयुक्तांच्या अहवालानंतरच अपघाताचे कारण स्पष्ट होऊ शकते, असे सांगत दोन महिन्यात हा अहवाल सादर होईल, अशी माहीती त्यांनी दिली. ......................................................मुख्यमंत्र्यांनाच विचारा...नागोठणे येथील अपघातस्थळी भेट दिल्यानंतर आणि जखमी रुग्णांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री रेल्वेच्या कारभारावरच प्रश्न उपस्थित केले होते. पश्चिम आणि मध्य रेल्वेमध्ये कामकाजाचा समन्वय नसून त्यामुळे गोंधळ उडत असल्याचे ते म्हणाले होते. याबाबत महाव्यवस्थापक सुनिल कुमार सूद यांना विचारले असता, तुम्ही मुख्यमंत्र्यांनाच विचारा असे त्यांनी पत्रकारांनाच सांगितले. ...........................................एका वर्षात २६0 वेळा रेल्वे सेवा होते विस्कळीतमध्य रेल्वेच्या मुंबई विभागात एका वर्षात जवळपास २५0 ते २६0 रेल्वे सेवा विस्कळीतचे प्रमाण असल्याचे यावेळी सूद यांनी सांगितले. सेवा विस्कळीतचे प्रमाण कमी व्हावे यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले.