शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

महाव्यवस्थापकच गोंधळतात तेव्हा...

By admin | Updated: May 7, 2014 01:26 IST

दिवा-सावंतवाडी ट्रेनला अपघात झाल्याचे अनेक तर्कवितर्क लावण्यात येत असले तरी हा अपघात प्रथमदर्शनी वेल्डिंगच्या समस्येमुळे झाल्याचे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनिल कुमार सूद यांनी सांगितले.

वेल्डिंगच्या समस्येमुळे अपघात झाल्याच्या वक्तव्यात तीन वेळा बदल

दिवा-सावंतवाडी पॅसेंजर ट्रेनला अपघात

मुंबई - दिवा-सावंतवाडी ट्रेनला अपघात झाल्याचे अनेक तर्कवितर्क लावण्यात येत असले तरी हा अपघात प्रथमदर्शनी वेल्डिंगच्या समस्येमुळे झाल्याचे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनिल कुमार सूद यांनी सांगितले. मंगळवारी ते या अपघाताची सविस्तर माहीती देताना पत्रकारांशी बोलत होते. अपघाताबद्दलचे कारण महाव्यवस्थापकाकडून सांगतानाच हा अपघात वेल्डिंगमुळे झाला नसल्याचे पुन्हा सांगत त्याबद्दल तीन वेळा आपले वक्तव्य बदलण्यात आले आणि पुर्ता गोंधळच पत्रकार परीषदेत उडवून दिला. या गोंधळानंतर सुरक्षा आयुक्तांच्या अहवालानंतर ते स्पष्ट होईल, अशी माहीती त्यांच्याकडून त्वरीत देण्यात आली. दिवा-सावंतवाडी पॅसेंजर ट्रेनला अपघात झाल्यानंतर मध्य रेल्वेच्या कारभाराविषयी अनेक प्रश्न उपस्थित झाले. यावर बोलताना सूद म्हणाले की, देखभाल आणि दुरुस्ती ही आमच्याकडून कमी होत असल्याचे जरी सांगितले जात असले तरी ते खरे नाही. रेल्वे रुळांची देखभाल ही किमॅनकडून केली जाते. असे अपघात हे किमॅनकडूनच रोखले जावू शकतात. आतापर्यंत त्यांच्याकडून अनेक चांगल्या कामगिरी पार पाडण्यात आल्या असून आपल्या कामात ते ९५ टक्के यशस्वी ठरतात. त्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण करणे चुकीचे आहे. त्यांच्या २0 टक्के जागा जरी रिक्त असल्या तरी त्या आमच्याकडून भरण्यात येतात. मात्र कालांतराने त्या जागा पुन्हा रिक्त होत असल्याचे त्यांनी सांगितले. या पॅसेंजर ट्रेनचा झालेला अपघात हा वेल्डिंग बरोबर नसल्यानेच झाला असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आल्याचे सांगत त्यांनी मानवी चुकांमुळे झालेल्या अपघाताला पुष्टी दिली. मात्र हे सांगताच आम्ही सर्व बाजू तपासत असून हा अपघात वेल्डिंगमधील चुकांमुळेच झाला असेल ते सांगणे कठीण असून सध्या उन्हाळा वाढला असून तापमानातील वाढीमुळे रुळात बदल झाल्याचे सांगत हेदेखिल एक कारण असल्याचे सूद यांनी सांगितले. या दोन कारणांनंतर पुन्हा वेल्डिंग करण्यात चूक झाल्याची शक्यता वर्तवत ज्यांनी हे काम केले त्याचा सत्कार केला पाहिजे, असे आश्चर्यकारक विधान केले आणि एकच गोंधळ उडवून दिला. त्यानंतर सुरक्षा आयुक्तांच्या अहवालानंतरच अपघाताचे कारण स्पष्ट होऊ शकते, असे सांगत दोन महिन्यात हा अहवाल सादर होईल, अशी माहीती त्यांनी दिली. ......................................................मुख्यमंत्र्यांनाच विचारा...नागोठणे येथील अपघातस्थळी भेट दिल्यानंतर आणि जखमी रुग्णांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री रेल्वेच्या कारभारावरच प्रश्न उपस्थित केले होते. पश्चिम आणि मध्य रेल्वेमध्ये कामकाजाचा समन्वय नसून त्यामुळे गोंधळ उडत असल्याचे ते म्हणाले होते. याबाबत महाव्यवस्थापक सुनिल कुमार सूद यांना विचारले असता, तुम्ही मुख्यमंत्र्यांनाच विचारा असे त्यांनी पत्रकारांनाच सांगितले. ...........................................एका वर्षात २६0 वेळा रेल्वे सेवा होते विस्कळीतमध्य रेल्वेच्या मुंबई विभागात एका वर्षात जवळपास २५0 ते २६0 रेल्वे सेवा विस्कळीतचे प्रमाण असल्याचे यावेळी सूद यांनी सांगितले. सेवा विस्कळीतचे प्रमाण कमी व्हावे यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले.