शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

"आम्ही शेतकऱ्यांनी कुटुंब जगवण्यापुरते पिकवले तर काय होईल?; हा लढा जनतेचा आहे"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2021 07:13 IST

आंदोलकांचे हरेकप्रकारे मानसिक खच्चीकरण करण्याचे काम सुरू आहे. 

प्रगती जाधव-पाटीलसातारा : कृषिप्रधान देशात शेतकऱ्यांवर आंदोलनाची वेळ येते आणि याकडे इतर समाज ‘शेतकऱ्यांचा प्रश्‍न’ म्हणत दुर्लक्ष करत असेल तर ते या देशासाठी घातक आहे. आम्ही शेतकऱ्यांनी कुटुंब जगवण्यापुरते पिकवले तर काय होईल? असा सवाल किसान आंदोलनातील एक प्रमुख नेते सरदार व्ही. एम. सिंग यांनी केला. ‘देशातील शेतकऱ्यांनी ही लढाई आरपारची ठरवली आहे. आणखी दोन वर्षे या आंदोलनाला भाजीभाकर पुरविण्याची ताकद लंगरमध्ये आहे,’ असे निर्धारात्मक उद्गारही त्यांनी काढले.

‘उत्तर प्रदेशातील करोडपती शेतकरी’ अशी व्ही. एम. सिंग यांची ओळख सांगितली जाते. राजधानी दिल्लीच्या सीमेवर गाझियाबाद येथे सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याबरोबरच सरकारबरोबर चर्चेच्या फेऱ्या करून शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारे सिंग यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. ते म्हणाले, ‘भारत हा कृषिप्रधान देश आहे. जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांचा लढा हा अवघ्या जनतेचा आहे. पण त्याकडे निव्वळ ‘शेतकऱ्यांचा विषय’ म्हणून बघणे चुकीचे आहे. अनेक पातळ्यांवर अयशस्वी ठरलेले केंद्रातील बोलघेवडे सरकार अद्यापही शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांबाबत गंभीर नाही. खासगी कंपन्यांना गालिचा अंथरणाऱ्यांना शेतकऱ्यांकडे यायला आणि त्यांचे प्रश्‍न समजून घ्यायलाही सवड नाही, हे दुर्दैव आहे. व्यवस्थेत निर्णयाचा अधिकार नसणाऱ्यांची टोळी चर्चेला पाठवून शेतकरी आंदोलकांची क्रूर चेष्टाच चालवली आहे. आंदोलकांचे हरेकप्रकारे मानसिक खच्चीकरण करण्याचे काम सुरू आहे. 

तथापि, आम्हीं मागे हटणार नाही. आमच्या अनेक लेकरांनी त्यांचे शिक्षण बाजूला ठेवून या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविला आहे. माता-भगिनींनीही शेत आणि घराची जबाबदारी स्वीकारून तिथली खिंड लढवली आहे. आमचे मनोबल वाढविण्यासाठी आम्हाला मिळणारी ही ऊर्जा पुरेशी आहे.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपagricultureशेती