शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

"आम्ही शेतकऱ्यांनी कुटुंब जगवण्यापुरते पिकवले तर काय होईल?; हा लढा जनतेचा आहे"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2021 07:13 IST

आंदोलकांचे हरेकप्रकारे मानसिक खच्चीकरण करण्याचे काम सुरू आहे. 

प्रगती जाधव-पाटीलसातारा : कृषिप्रधान देशात शेतकऱ्यांवर आंदोलनाची वेळ येते आणि याकडे इतर समाज ‘शेतकऱ्यांचा प्रश्‍न’ म्हणत दुर्लक्ष करत असेल तर ते या देशासाठी घातक आहे. आम्ही शेतकऱ्यांनी कुटुंब जगवण्यापुरते पिकवले तर काय होईल? असा सवाल किसान आंदोलनातील एक प्रमुख नेते सरदार व्ही. एम. सिंग यांनी केला. ‘देशातील शेतकऱ्यांनी ही लढाई आरपारची ठरवली आहे. आणखी दोन वर्षे या आंदोलनाला भाजीभाकर पुरविण्याची ताकद लंगरमध्ये आहे,’ असे निर्धारात्मक उद्गारही त्यांनी काढले.

‘उत्तर प्रदेशातील करोडपती शेतकरी’ अशी व्ही. एम. सिंग यांची ओळख सांगितली जाते. राजधानी दिल्लीच्या सीमेवर गाझियाबाद येथे सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याबरोबरच सरकारबरोबर चर्चेच्या फेऱ्या करून शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारे सिंग यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. ते म्हणाले, ‘भारत हा कृषिप्रधान देश आहे. जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांचा लढा हा अवघ्या जनतेचा आहे. पण त्याकडे निव्वळ ‘शेतकऱ्यांचा विषय’ म्हणून बघणे चुकीचे आहे. अनेक पातळ्यांवर अयशस्वी ठरलेले केंद्रातील बोलघेवडे सरकार अद्यापही शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांबाबत गंभीर नाही. खासगी कंपन्यांना गालिचा अंथरणाऱ्यांना शेतकऱ्यांकडे यायला आणि त्यांचे प्रश्‍न समजून घ्यायलाही सवड नाही, हे दुर्दैव आहे. व्यवस्थेत निर्णयाचा अधिकार नसणाऱ्यांची टोळी चर्चेला पाठवून शेतकरी आंदोलकांची क्रूर चेष्टाच चालवली आहे. आंदोलकांचे हरेकप्रकारे मानसिक खच्चीकरण करण्याचे काम सुरू आहे. 

तथापि, आम्हीं मागे हटणार नाही. आमच्या अनेक लेकरांनी त्यांचे शिक्षण बाजूला ठेवून या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविला आहे. माता-भगिनींनीही शेत आणि घराची जबाबदारी स्वीकारून तिथली खिंड लढवली आहे. आमचे मनोबल वाढविण्यासाठी आम्हाला मिळणारी ही ऊर्जा पुरेशी आहे.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपagricultureशेती