शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

राज्यसभा निवडणुकीत पक्षाच्या आमदाराने क्रॉस वोटिंग केल्यास काय कारवाई होईल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 16:20 IST

यंदा अपक्षांच्या मतांवर सर्व गणित अवलंबून असल्याने मोठ्या पक्षांकडून त्यांची मनधरणी करण्याचं काम सुरू आहे.

मुंबई - राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. या निवडणुकीत भाजपाने ३, शिवसेनेने २, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी एक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे. या निवडणुकीत सहावा उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेना-भाजपा यांच्यात थेट लढत आहे. येत्या १० जूनला मतदान होणार असून तत्पूर्वी कुठलाही घोडेबाजार होऊ नये यासाठी सत्ताधारी पक्ष विशेष खबरदारी घेत आहे. 

नेमकी राज्यसभेची निवडणूक प्रक्रिया काय असते आणि एखाद्या आमदाराने पक्षाविरोधात जात क्रॉस वोटिंग केले तर काय कारवाई होईल यावर विधान भवनाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांनी सविस्तर सांगितले आहे. अनंत कळसे म्हणाले की, विधानसभेचे सर्व निवडून आलेले आमदार हे मतदार असतात. राज्यसभेच्या सहा जागांसाठी हे मतदान होणार आहे. विधान भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये हे मतदान पार पडेल. निवडणूक अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली हे मतदान होईल. समजा, २८८ आमदारांनी आपापल्या पक्षातील उमेदवारांना मतदान केले. २८८ मतदारांचे मतदान पात्र असेल असं गृहित धरलं. तर त्याचा कोटा काढला जातो. या मतदानात १ मताची किंमत १०० असते. उमेदवाराला जिंकण्यासाठी ४२ मतांची गरज असते असं त्यांनी म्हटलं. 

तसेच या निवडणुकीत पहिल्या पसंतीची मते देणे प्रत्येकाला गरजेचे असते. बाकी पसंतीची मते दिली नाही तरी चालतात. ज्या उमेदवाराला सर्वात कमी मते मिळतील तो या निवडणुकीतून बाहेर होईल. अनेक वर्षांनी राज्यसभेची निवडणूक महाराष्ट्रात होत आहे. १९९८ ला राम प्रधानांवेळी राज्यसभा निवडणूक झाली. त्यात चुरशीची लढत झाली होती. परंतु त्यावेळी खुले मतदान करण्याची पद्धत नव्हती. त्यात काँग्रेसच्या काही मतांमध्ये क्रॉस व्होटिंग होऊन राम प्रधानांचा पराभव झाला होता. विधानसभेच्या कामकाजासाठी व्हिप जारी केला जातो. मतदार कुठल्या उमेदवाराला मत देणार हे पक्ष प्रतिनिधीला दाखवलं जाते. एखाद्या पक्षीय आमदाराने क्रॉस मतदान केले तर सदस्य निलंबन होऊ शकते असं माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांनी सांगितले. 

महाराष्ट्रात सध्या राज्यसभा निवडणुकीचं वारं वाहत आहे. सर्वच पक्षांच्या हालचालींना या निवडणुकीमुळे वेग आला आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांना मुंबईत येऊन राहण्याचे आदेश दिले आहेत. तर महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची आज ट्रायडेंट हॉटेलमध्ये बैठक पार पडत आहे. यंदा अपक्षांच्या मतांवर सर्व गणित अवलंबून असल्याने मोठ्या पक्षांकडून त्यांची मनधरणी करण्याचं काम सुरू आहे. महाराष्ट्रात भाजपने ३ उमेदवार उतरवले आहेत, तर महाविकास आघाडीनं ४ उमेदवार उतरवलेत. महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ जागा आहेत. राज्यसभेची एक जागा जिंकण्यासाठी ४२ आमदार हवेत. महाविकास आघाडीकडे १६८ आमदारांचं समर्थन आहेत. यात शिवसेनेचे ५५, राष्ट्रवादीचे ५३ आणि काँग्रेसचे ४४, तर अन्य पक्षांचे ८, ७ अपक्ष आमदारांचा समावेश आहे. तर भाजपकडे १०६ आमदार आहेत. अन्य ७ आमदारांना त्यांना पाठिंबा दिला आहे. 

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाShiv SenaशिवसेनाBJPभाजपा