शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

त्यांना ७० वर्षांत जमले नाही, ते नऊ वर्षांत करून दाखविले; जे. पी. नड्डा यांची काँग्रेसवर जोरदार टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2023 10:32 IST

  पुणे : काँग्रेसच्या लोकांनी लिहिणे, वाचणे सोडून दिले आहे, म्हणून त्यांना कळत नाही; पण नरेंद्र मोदींमुळे जगात भारताची ...

 पुणे : काँग्रेसच्या लोकांनी लिहिणे, वाचणे सोडून दिले आहे, म्हणून त्यांना कळत नाही; पण नरेंद्र मोदींमुळे जगात भारताची प्रतिष्ठा वाढली. ७० वर्षांत काँग्रेसने केले नाही ते नऊ वर्षांत मोदी सरकारने केले, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी गुरुवारी केले. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या  बैठकीत ते बोलत होते. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे, रावसाहेब दानवे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, माजी मंत्री पंकजा मुंडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, विनोद तावडे आदींची उपस्थिती होती. नड्डा म्हणाले की, जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था भारताची आहे. मोबाइल उत्पादनात, रेल्वे, रस्ते, अशा सर्व क्षेत्रांत पुढे आहे. कोरोनाचा फटका जगाला बसला; पण भारताला नाही. कारण मोदींनी संकटाला संधी मानले. राज्य सरकारच्या कामाचेही मोदी यांनी कौतुक केले. मविआ सरकारच्या काळात राज्याचे सर्वाधिक नुकसान झाल्याची टीका त्यांनी केली.भाजप कार्यकारिणीच्या बैठकीतील पहिल्या सत्रात मोदी सरकारच्या नवव्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित महाजनसंपर्क अभियानाची माहिती देण्यात आली. दुसऱ्या सत्रात मोदी व राज्य सरकारच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. त्यानंतर नड्डा यांचे उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्यांसमोर भाषण झाले.पुरंदर तालुक्यातील माजी आमदार अशोक टेकवडे यांंना भाजपत प्रवेश देण्यात आला.

१.७५ लाख विशेष कार्यकारी अधिकारी येत्या पंधरा दिवसांमध्ये राज्य सरकार पावणेदोन लाख विशेष कार्यकारी अधिकारी नेमणार आहे. त्या माध्यमातून भाजप आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना पदे मिळणार आहेत, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.  महाविजय संकल्प ‘महापालिका निवडणुका राष्ट्रवादीमुळे रखडल्या. महाविकास आघाडी सरकारने प्रभागरचनेसंदर्भात घेतलेला चुकीचा निर्णय आम्ही रद्द केला. त्याविरोधात राष्ट्रवादी न्यायालयात गेली आहे, म्हणून निवडणुकांना उशीर होत आहे,’ अशा शब्दांत त्यांनी विलंबाचे खापर राष्ट्रवादीवर फोडले.

टॅग्स :J P Naddaजगत प्रकाश नड्डाBJPभाजपाMumbaiमुंबईcongressकाँग्रेस