शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
3
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
4
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
5
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
6
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
7
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
8
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
9
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
10
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
11
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
12
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
13
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
14
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
15
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
16
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
17
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
18
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
19
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
20
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...

पुढे काय? ४८ तासांत सांगतो; अशोक चव्हाणांची भूमिका तर फडणवीसांवर विशेष जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2024 06:25 IST

आधी आमदारकी, मग पत्रावर हाताने ‘माजी’ लिहून काँग्रेस पक्षही सोडला, रविवारी दिवसभर काॅंग्रेस नेत्यांसाेबत बैठका, चर्चेनंतर ‘उद्या सकाळी ११ वाजता येतो’ असे सांगून गेले अन् सोमवारी सकाळी सव्वा अकराला थेट विधानभवनात...

मुंबई : माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अखिल भारतीय काँग्रेसच्या कार्य समितीचे सदस्य अशोक चव्हाण यांनी सोमवारी आमदारकी तसेच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. मी अजून कोणताही निर्णय घेतला नसून ४८ तासांत पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करेन, असे चव्हाण यांनी नंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.

चव्हाण हे भाजपच्या वाटेवर असून १५ फेब्रुवारीला छत्रपती संभाजीनगर येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत जाहीर सभेत भाजप प्रवेश करतील, अशी दाट शक्यता आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘आगे, आगे देखो होता है क्या’, अशी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमधील इतर आमदारही पक्ष सोडणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या पाठोपाठ त्यांचे कट्टर समर्थक आणि माजी आमदार अमर राजूरकर यांनीही काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला.

रविवारी सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत चव्हाण टिळक भवन येथे वरिष्ठ नेत्यांसोबत बैठकीत सहभागी झाले होते. त्यानंतर राज्यसभा निवडणूक रणनीतीबाबत चर्चा झाली, त्या बैठकीलाही हजेरी लावून त्यांनी रणनीती ठरवण्यात सहभाग घेतला. सोमवारी सकाळी ११ वाजता पुन्हा बैठकीसाठी पक्ष कार्यालयात येणार, असे सांगून ते गेले. मात्र, सोमवारी पक्ष कार्यालयाऐवजी ते सकाळी ११.१५ च्या सुमारास विधानभवनात गेले आणि आमदारकीचा राजीनामा दिला. तो राजीनामा विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंजूर केला. त्यानंतर लगेच त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र लिहून काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

काँग्रेस पक्षाचा राजीनामा देण्याचा माझा निर्णय पूर्णत: वैयक्तिक आहे. कुठल्याही आमदाराशी मी याबाबत चर्चादेखील केलेली नाही. अन्य कोण काय निर्णय घेणार हे मला माहिती नाही. मी कोणाशीही संपर्क साधलेला नाही. पक्षाने मला खूप काही दिले आणि मी देखील मनापासून अनेक वर्षे पक्षाची सेवा केली आहे. - अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री

काँग्रेस विधिमंडळ पक्षाची उद्या बैठकचव्हाण यांचा राजीनामा आणि राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने बुधवारी सर्व आमदारांची मुंबईत बैठक बोलावली आहे. राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरण्याचा गुरुवारी शेवटचा दिवस आहे. ही निवडणूक बिनविरोध होणार नसेल तर गुरुवारी देखील पुन्हा काँग्रेस आमदारांची बैठक होऊ शकते.

फडणवीस यांच्यावर विशेष जबाबदारीअशोक चव्हाण यांना भाजपमध्ये आणण्याच्या दृष्टीने भाजप नेतृत्वाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विशेष जबाबदारी सोपविली आहे. सूत्रांनी सांगितले की, फडणवीस आणि चव्हाण यांच्यात दोन-तीन बैठका झाल्या. २०२२ मध्ये विधान परिषद, राज्यसभा निवडणुकीतील धक्कादायक निकाल व त्यानंतरचे सत्तांतर तसेच गेल्या वर्षी अजित पवार यांनी केलेले बंड यातही फडणवीस यांची महत्त्वाची भूमिका राहिली होती.

काॅंग्रेस म्हणते, साेबत काेणी जाणार नाही 

अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काॅंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थाेरात आणि नसीम खान यांनी पक्षाच्यावतीने भूमिका स्पष्ट केली. चव्हाणांसाेबत इतर काेणीही पक्ष साेडून जाणार नाही, असा दावा त्यांनी केला. अशोक चव्हाण काँग्रेस पक्षाला सोडून जातील असे आम्हाला कधीही वाटले नव्हते. त्यांनी पुढची रणनीती जाहीर केली नसली तरी त्यांची दिशा निश्चित आहे. भाजपकडून सातत्याने फोडाफोडीचे राजकारण सुरू होते. ते आज आमच्यासोबत देखील झाले आहे. - पृथ्वीराज चव्हाण, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री

अशोक चव्हाण यांची कारकीर्द

  • सुरुवात युवक काँग्रेसच्या माध्यमातून झाली. १९८६ ते १९८९ या काळात युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि प्रदेश उपाध्यक्षपद. 
  • १९८७ साली पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवली. या पोटनिवडणुकीत ॲड. प्रकाश आंबेडकर यांना हरवत ते वयाच्या तिसाव्या वर्षी खासदार. मात्र १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव. 
  • १९९२ मध्ये ते विधान परिषदेचे सदस्य. १९९३ साली ते सार्वजनिक बांधकाम, नगरविकास आणि गृह विभागाचे राज्यमंत्री बनले.
  • १९९९ मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर गेल्यावर महसूलमंत्री झाले. २००४ मध्ये पुन्हा ते कॅबिनेट मंत्री. २००८ मुख्यमंत्री बनले. 
  • २००९ मध्ये दुसऱ्यांदा मुख्यमंत्री. २०१४ मोदी लाटेतही ते लोकसभेवर निवडून गेले. २०१९ च्या लोकसभेत पराभव. विधानसभेत विजय मिळवला.

 

घाईघाईत घेतली पीडब्ल्यूडीची एनओसी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला ‘राम-राम’ म्हणताच त्यांनी रविभवन/नाग भवनसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (पीडब्ल्यूडी) ना हरकत प्रमाणपत्राची (एनओसी) मागणी केली. १२,३०० रुपयांची थकबाकी लगेच भरली. पीडब्ल्यूडीनेही घाईघाईने सोमवारी सायंकाळीच एनओसी जारी केली. साधारणपणे खासदार आणि आमदारांना निवडणूक लढवण्यासाठी रविभवनची एनओसी आवश्यक असते. उमेदवारी अर्जासोबत त्यांना येथेही एनओसी द्यावी लागेल. राज्यसभा निवडणूक २७ फेब्रुवारी राेजी होऊ घातली आहे. 

 

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेसBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस