शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपालांच्या कृतीला वैधानिक आधार कोणता? सरन्यायाधीशांचा ठाकरे गटाच्या वकिलांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 05:29 IST

सरकारने पाठिंबा देणे व काढून घेण्याची कृती ही मूळ राजकीय पक्षाच्या अखत्यारित येते. शिंदे यांना दावा करण्याला कोणताही वैधानिक आधार नसल्याचे सिंघवी यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टातील युक्तिवादात सरन्यायाधीशांनी राज्यपालांच्या हेतू व मर्यादा भंगांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश देण्याच्या राज्यपालांच्या अधिकाराला वैधानिक आधार काय आहे? असा सवाल त्यांनी सिंघवी यांना केला. 

सरन्यायाधीशांच्या या प्रश्नावर सिंघवी म्हणाले, कोणतेही अधिकार नाही. अपात्रतेचा प्रश्न कोर्टात व विधानसभा उपाध्यक्षांकडे प्रलंबित असताना कोणत्या आधारावर राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले, हे समजण्यापलीकडे आहे. शिंदे यांनी पक्ष म्हणून नव्हे तर वैयक्तिक पातळीवर सरकार स्थापनेचा दावा केला. ही कृती राज्यघटनेच्या १०व्या अनुसूचीचा भंग आहे. 

सरकारने पाठिंबा देणे व काढून घेण्याची कृती ही मूळ राजकीय पक्षाच्या अखत्यारित येते. शिंदे यांना दावा करण्याला कोणताही वैधानिक आधार नसल्याचे सिंघवी यांनी सांगितले.

बहुमत चाचणीची गरज का भासली?  कौल युक्तिवाद करीत असताना सरन्यायाधीश डॉ. चंद्रचूड व न्या. नरसिंहा यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. यावर सरन्यायाधीश म्हणाले, राज्यपालांना बहुमत चाचणीची गरज का भासली? आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेचा निकाल लागल्यानंतरही बहुमत चाचणीचे निर्देश देता आले असते.   आमदार व खासदारांना राजकीय पक्षाच्या ध्येयधोरणाशी सुसंगत राहावे लागते. पक्षाच्या पक्षादेशाला बांधील राहावे लागते. यावर कौल यांनी दावा केला की, शिवसेना नेतृत्वाच्या कार्यपद्धतीबद्दल आमदारांमध्ये असंतोष होता. यामुळे एकूण ५५ आमदारांपैकी ३४ जणांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.   अपात्रतेचा निर्णय लागेपर्यंत राज्यपाल राज्य सरकार अस्थिर ठेवू शकणार नाहीत. यासाठी सभागृहात बहुमत सिद्ध करणे, याशिवाय दुसरा कोणताही सक्षम पर्याय राज्यघटनेच्या चौकटीत राहू शकत नाही, असा दावा कौल यांनी केला.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे