शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

कारण काय? एकनाथ शिंदेंनी बोलावली आमदारांची बैठक; थोड्य़ाच वेळात सुरु होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 20:13 IST

वर्षा बंगल्यावर मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार की अजित पवारांच्या गटावर होणार? यातून काय निर्णय होणार, शिंदे गटाच्या आमदारांचे पुढे काय होणार असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

ज्या अजित पवार आणि राष्ट्रवादीवर बाण सोडून एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना दगा दिला होता, त्याच अजित पवारांची शिंदे सरकारमध्ये एन्ट्री झाल्याने शिंदे गटात मोठी अस्वस्थता वाढली आहे. गेले वर्षभर रखडवत असलेला मंत्रिमंडळ विस्तार अचानक पवार गटासाठी उरकून घेतल्याने शिंदे गटात नाराजी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी आमदारांना काहीही कारण न सांगता वर्षा बंगल्यावर महत्वाची बैठक बोलावली आहे. 

वर्षा बंगल्यावर मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार की अजित पवारांच्या गटावर होणार? यातून काय निर्णय होणार, शिंदे गटाच्या आमदारांचे पुढे काय होणार असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. पुढील निवडणुकीत ९० हून अधिक जागा जिंकणार, कोणत्याही पदाधिकाऱ्यांवर अन्याय, कामे करण्याची जबाबदारी माझी असा शब्द अजित पवारांनी दिला आहे. 

शिंदे गटातून देखील धुसफुस सुरु झाली आहे. अनेकांनी राष्ट्रवादीचे आव्हान मिळणार असल्याने पुढील निवडणुकीत काय करायचे यावर चिंता व्यक्त केली आहे. काहींनी आता मंत्री असलेल्यांनी राजीनामे द्यावेत आणि आम्हाला मंत्रिपद द्यावे, अशी मागणी केलेली आहे. बच्चू कडूंनी आम्हाला विश्वासात न घेता अजित पवारांना सोबत घेण्यात आले आहे, असा आरोप केला आहे. 

दुसरीकडे ठाकरे गटाने शिंदे आणि अन्य आमदारांवर अपात्रतेची कारवाई होणार आहे, यामुळे हे सगळे सुरु असल्याचा आरोप केला आहे. यामुळे एकंदरीत शिंदे गटाला याचे हादरे बसल्याचे दिसत आहे. काही आमदार ठाकरेंसोबत परत जाण्याच्या विचारात आहेत, असेही दावे केले जात आहेत.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना