शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅपिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
2
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
3
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
4
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
5
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
6
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
7
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
8
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
9
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
10
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
11
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
12
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
13
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
14
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
15
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
16
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
17
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
18
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
19
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
20
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट

राजकीय आणि विधिमंडळ पक्ष यात फरक काय?; उद्धव ठाकरेंच्या वकिलांनी स्पष्ट समजावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 18:35 IST

एखादा आमदार राजकीय पक्षाच्या आशीर्वादाने, त्यांच्या मतांमुळे निवडून आला असेल तर तो राजकीय पक्षाची धोरणे, त्यांची भूमिका आणि त्यांच्या निर्णयाचे पालन करावे ही त्याची जबाबदारी असते.

मुंबई - Uddhav Thackeray Press Conference ( Marathi News ) विधिमंडळाचे बहुमत हा शिवसेनेचा आवाज आहे का असा प्रश्न विधानसभा अध्यक्षांकडे आला तेव्हा त्यांनी निवडणूक आयोगाकडे आलेल्या नोंदीकडे दुर्लक्ष केले. हा निकाल १० व्या परिशिष्ठाच्या विरोधात आहे. या निर्णयाचे ३ पैलू आहेत. पक्षांतर बंदीचा उद्देश आयाराम-गयाराम हे बंद करावे. पक्षांतर बंदीच्या कायद्यात राजकीय पक्षाची व्याख्या स्पष्ट सांगितली आहे अशा शब्दात ठाकरे गटाचे सुप्रीम कोर्टाचे वकील रोहित शर्मा राजकीय आणि विधिमंडळ पक्षातील फरक समजावून सांगितला आहे. 

वकील रोहित शर्मा म्हणाले की, एका राजकीय पक्षाची स्थापना समाजात, लोकांमध्ये होते. त्या पक्षाची विचारधारा कार्यकर्ते लोकांपर्यंत पोहचवतात. राजकीय पक्षातील कार्यकर्ते प्रतिनिधी म्हणून पुढे येतात. त्यानंतर त्या प्रतिनिधीतून एक नेता निवडला जातो. राजकीय पक्षाचे हे महत्त्व आहे. निवडणूक झाल्याशिवाय विधिमंडळ पक्ष होत नाही. राजकीय पक्षाची कागदपत्रे निवडणूक आयोगाकडे असतात. निवडणूक आयोगाला राजकीय पक्ष कोणत्या मतदारसंघातून कोण उमेदवार उभा राहील ते सांगते. कुणीही व्यक्ती शिवसेनेचा उमेदवार आहे हे निवडणूक आयोगाला सांगू शकत नाही. तो अधिकार फक्त राजकीय पक्षाच्या नेतृत्वाला असतो. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना संविधानाच्या चौकटीत विधिमंडळ पक्ष म्हटला जातो. त्याचा कार्यकाळ केवळ ५ वर्षाचा असतो. विधिमंडळ पक्षातील बहुमत हे राजकीय पक्षाचे बहुमत असू शकत नाही. १९८५ मध्ये १० व्या परिशिष्ठात राजकीय पक्षाची व्याख्या निश्चित केली आहे. एखादा आमदार राजकीय पक्षाच्या आशीर्वादाने, त्यांच्या मतांमुळे निवडून आला असेल तर तो राजकीय पक्षाची धोरणे, त्यांची भूमिका आणि त्यांच्या निर्णयाचे पालन करावे ही त्याची जबाबदारी असते. जर या नियमाचे उल्लंघन झाले तर तो संबंधित सदस्य सभागृहातून अपात्र ठरू शकतो असं संविधान सांगते असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत राजकीय पक्षाच्या विचारधारेवर, कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर जर कुणी निवडून आले तर त्या लोकप्रतिनिधीचे कर्तव्य असते की त्याने पक्षाच्या विचारधारेशी, धोरणेशी एकनिष्ठ राहावे. मग विधिमंडळ बहुमत असले की राजकीय पक्षाची बहुमत असेल ही गोष्ट संविधानाच्या विरोधात आहे. विधिमंडळ आणि राजकीय पक्ष हे दोन वेगळे आहेत. राजकीय पक्ष ही पर्मंनट बॉडी आहे. धोरण, कार्यकारणी, नेतृत्व आणि त्याचे अध्यक्ष आहेत. विधिमंडळाचे काम हे राजकीय पक्षाची भूमिका सभागृहात मांडावी हे असते. राजकीय पक्षाच्या विरोधात जाण्याची भूमिका नसावी. विधिमंडळातील एक तृतीयांश लोक राजकीय पक्षाविरोधात जाईल तर त्यांना वेगळा गट संबोधले जाईल असा कायदा होता मात्र तो संविधानातून वगळण्यात आला. त्यामुळे आता जर तुम्ही एक तृतीयांश असाल किंवा आणखी जास्त तुम्हाला राजकीय पक्षाच्या विरोधात जाणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे १० व्या परिशिष्ठातंर्गत विधानसभा अध्यक्षांनी निकाल द्यायला हवा होता. जर तुम्ही विधिमंडळालाच राजकीय पक्ष मानला तर तुम्ही संविधानालाच नाकारल्यासारखे आहे असंही शर्मा यांनी म्हटलं. 

दरम्यान, विधिमंडळ पक्षाचे आयुष्य ५ वर्ष असते. विधिमंडळात बहुमत असेल तो राजकीय पक्ष ठरेल हे विधानसभा अध्यक्षांच्या निकालावरून दिसते. जर राजकीय पक्षाच्या विधिमंडळात कमीजण निवडून आले. त्यात समजा ३-४ जण निवडले असतील ते ४ जण विधिमंडळ पक्ष म्हणून मानला जातो. त्यातील ३ लोक एकाबाजूला झाले तर हे ३ जण पूर्ण राजकीय पक्ष आपलाच आहे असं सांगून मनाला येईल ते करतील हे संविधानात मान्य नाही. या सर्व गोष्टी आम्ही सर्वोच्च न्यायालसमोर मांडल्या आहेत. सर्वोच्च न्यायालय आमच्या याचिकेवर न्याय देईल असा आम्हाला विश्वास आहे असंही वकील रोहित शर्मा यांनी सांगितले आहे. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाSupreme Courtसर्वोच्च न्यायालय