शहरं
Join us  
Trending Stories
1
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
2
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
3
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
4
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
5
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
6
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
7
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
8
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
9
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
10
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
11
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
12
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
13
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
14
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
15
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
16
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
17
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
18
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
19
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
20
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

मराठा आरक्षणाचं काय झालं ?, न्यायालयानं सरकारला विचारला जाब 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2018 07:35 IST

गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या मराठा आरक्षणावरून उच्च न्यायालयानं राज्य सरकारला खडे बोल सुनावले आहेत.

बई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकारला चांगलेच फटकारले. आरक्षणाचा हा मुद्दा काही महिन्यांपासून मागास प्रवर्ग आयोगाकडे प्रलंबित आहे. या आयोगाचे कामकाज कुठवर आले? उर्वरित काम किती दिवसांत पूर्ण होईल? याची संपूर्ण माहिती शुक्रवारपर्यंत सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने सरकारला दिले. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली काढण्यात यावा, यासाठी आर. आर. फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी अ‍ॅड. विजय किल्लेदार यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.या याचिकेवरील सुनावणी न्या. रणजीत मोरे व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठापुढे सुरू आहे. राज्य सरकारने २०१६ मध्ये मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला आव्हान देणाऱ्या, तर राज्य सरकारच्या आरक्षणाच्या निर्णयाला पाठिंबा देणा-या अनेक याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या. राज्याने ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देऊ नये, असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिल्यास आरक्षणाची ही मर्यादा ओलांडली जाणार आहे. त्यामुळे अनेकांनी या आरक्षणाला विरोध केला. उच्च न्यायालयानेही २०१६ मध्ये राज्य सरकारच्या या निर्णयाला स्थगिती दिली होती. मराठा समाजाला आरक्षण देणे कितपत योग्य आहे, याची चाचपणी करण्यासाठी उच्च न्यायालयाने २०१७ मध्ये हे प्रकरण मागास प्रवर्ग आयोगाकडे वर्ग केले.अद्याप हे प्रकरण आयोगाकडेच प्रलंबित असल्याने उच्च न्यायालय अंतिम निर्णय देऊ शकत नाही. त्यामुळे सुनावणीवेळी आयोगाचे कामकाज कुठवर आले, हा मुद्दा उपस्थित झाला. जोवर ते काम पूर्ण होत नाही, आरक्षण देण्याबाबत त्यांचा अहवाल मिळत नाही, तोवर न्यायालयात पुढील सुनावणी होऊ शकत नसल्याने त्याची माहिती शुक्रवारी सादर करावी, असे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी समाजाचे नेतृत्व करणाºया संघटनांनी मागील वर्षी राज्यभर अनेक मूक मोर्चे काढले होते. लाखोंच्या संख्येने निघालेल्या या मोर्चांमध्ये महिला व तरुणांचा सहभाग लक्षणीय होता. यानंतर सरकारने समाजाच्या हिताचे अनेक निर्णय घेतले होते. परंतु आरक्षणाच्या मुख्य मागणीवर काहीही ठोस निर्णय झाला नव्हता. या प्रकरणी सरकार न्यायालयात प्रामाणिक प्रयत्न युक्तिवाद करीत नाही, असा आंदोलकांचा आक्षेप होता.

टॅग्स :marathaमराठाagitationआंदोलन