शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

"यापेक्षा मोठे नैतिक अधःपतन कोणते असू शकते?’’ भाजपाची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 11:48 IST

BJP Criticize Uddhav Thackeray: बाळासाहेबांच्या आशीर्वादासाठी राष्ट्रीय नेते मातोश्रीचे उंबरठे झिजवत असत. त्यांचा कौटुंबिक वारस असलेल्या ठाकरेंना आता इतरांचे उंबरठे झिजविण्याची वेळ यावी यापेक्षा मोठे नैतिक अधःपतन कोणते असू शकते?

मुंबई - शिवसेनेत पडलेली फूट आणि महाराष्ट्रात झालेली राजकीय उलथापालथ या घडामोडींपासून उद्धव ठाकरे हे भाजपा आणि भाजपा नेत्यांवर सडकून टीका करत आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी भाजपाचे नैतिक अध:पतन झाल्याचा टोला लगावला होता. त्याला आता भाजपानेही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आपल्या नेतृत्वातून स्वहस्ते पक्षाचे विसर्जन करून उरल्यासुरल्या सेनेचे प्रमुखपदही गमावलेल्या उद्धव ठाकरेंच्या तोंडी नैतिक अधःपतनाची चिंता म्हणजे ‘सैतानाच्या तोंडी शांतिपाठ’ असेच म्हणावे लागेल. बाळासाहेबांच्या आशीर्वादासाठी राष्ट्रीय नेते मातोश्रीचे उंबरठे झिजवत असत. त्यांचा कौटुंबिक वारस असलेल्या ठाकरेंना आता इतरांचे उंबरठे झिजविण्याची वेळ यावी यापेक्षा मोठे नैतिक अधःपतन कोणते असू शकते? असा टोला केशव उपाध्ये यांनी लगावला.

केशव उपाध्ये म्हणाले की, आपल्या नेतृत्वातून स्वहस्ते पक्षाचे विसर्जन करून उरल्यासुरल्या सेनेचे प्रमुखपदही गमावलेल्या उद्धव ठाकरेंच्या तोंडी नैतिक अधःपतनाची चिंता म्हणजे ‘सैतानाच्या तोंडी शांतिपाठ’ असेच म्हणावे लागेल. पक्षाचे उरलेले अस्तित्व वाचवून राजकीय कडेलोटापासून स्वतःचा बचाव करण्याच्या केविलवाण्या प्रयत्नात ज्यांनी प्रत्येक हाताचा आधार शोधला, आणि लहानमोठ्या पक्षांची मते ओरबाडण्याचा स्वार्थीपणा करून अधःपतनाची परिसीमा गाठली, त्यांनी राजकारणातील नैतिक अधःपतनाची चिंता करावी ही आत्मवंचना म्हणावी की आत्मपरीक्षण म्हणावे हा प्रश्नच आहे, असे केशव उपाध्ये म्हणाले. 

उद्धव ठाकरेंनी शिवसेना संपविली, बाळासाहेबांचे निष्ठावंत दुरावले, स्वतःचे पक्षप्रमुखपदही स्वहस्ते संकटात आणले आणि आता अस्तित्व टिकविण्यासाठी लहानमोठ्या पक्षांचे उंबरठे झिजविले. बाळासाहेबांच्या आशीर्वादासाठी राष्ट्रीय नेते मातोश्रीचे उंबरठे झिजवत असत. त्यांचा कौटुंबिक वारस असलेल्या ठाकरेंना आता इतरांचे उंबरठे झिजविण्याची वेळ यावी यापेक्षा मोठे नैतिक अधःपतन कोणते असू शकते? पक्ष संपला, हाताशी नेतेही नाहीत आणि कार्यकर्तेही उरले नाहीत, स्वतःचे पदही राखता आले नाही आणि दोनचार लाळघोट्यांकरवी स्वतःवर स्तुतिसुमने उधळून घेण्याची वेळ आली, त्यांनी इतरांच्या अधःपतनाची उठाठेव करू नये. मुख्यमंत्रीपदावर असताना करोनामुळे घरात बसायची वेळ आली होती, आणि आता सारे काही गमावल्यामुळे घरात बसावे लागणार आहे, असा टोलाही केशव उपाध्ये यांनी लगावला.

ते पुढे म्हणाले की, २०१४ मध्ये भाजपसोबतची युती मोडून वेगळी चूल मांडणाऱ्या व नंतर सत्तेसाठी गोंडा घोळवत सरकारात सामील होणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या राजकीय स्वार्थावर त्यांचा लाऊडस्पीकर असलेल्या संजय राऊत यांनी अगदी अलीकडेच टोमणेबाज आरसा दाखविला आहे. बाळासाहेबांनी थापलेला शेंदूराचा थर आता उघडा पडला असून आतले दगड दिसू लागले आहेत. ज्या दिवशी शिवसेना कॉंग्रेसबरोबर जाईल त्या दिवशी पक्षाचे दुकान मी बंद करेन असे बाळासाहेब म्हणाले होते. उद्धव ठाकरेंनी कॉंग्रेसच नव्हे, तर राष्ट्रवादी कॉंग्रेस, संभाजी ब्रिगेड, कम्युनिस्टांकडेही आधारासाठी हात पसरून शिवसेनेचे दुकान बंद केले असून बाळासाहेबांचा शब्द खरा करून दाखविला, असा चिमटा केशव उपाध्ये यांनी काढला. 

२०१९ मध्ये कॉंग्रेसबरोबर हातमिळवणी करून मतदारांना फसवून व युतीला दगा देत या अधःपतनाचे शिल्पकार ठरलेल्या ठाकरेंनी राजकारणातील अधःपतनावर बोलावे हा या शतकातला केविलवाणा राजकीय विनोद आहे. पडझड झालेल्या पक्षाला आणि पक्षाच्या आधाराने स्वतःला व कुटुंबाला वाचविण्यासाठी यांनी आघाडीसाठी बाळासाहेबांनाही नाकारून राजकीय सोयीपुरते प्रबोधनकारांच्या विचारांचा बुरखा पांघरला हे अधःपतन नव्हे काय? प्रकाश आंबेडकर यांनी बाळासाहेबांवर व बाळासाहेबांचा हिंदुत्वाच्या विचारावर सतत कडवट टीका केली होती. हे सोयीपुरते विसरून उद्धव ठाकरेंनी अखेरच्या बचावाकरिता प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीशी युती करताना बाळासाहेबांना डावलून प्रबोधनकारांचे नाव वापरले, या अधःपतनाला काय म्हणायचे? असा सवालही केशव उपाध्ये उपस्थित केला. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा