शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

"यापेक्षा मोठे नैतिक अधःपतन कोणते असू शकते?’’ भाजपाची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 11:48 IST

BJP Criticize Uddhav Thackeray: बाळासाहेबांच्या आशीर्वादासाठी राष्ट्रीय नेते मातोश्रीचे उंबरठे झिजवत असत. त्यांचा कौटुंबिक वारस असलेल्या ठाकरेंना आता इतरांचे उंबरठे झिजविण्याची वेळ यावी यापेक्षा मोठे नैतिक अधःपतन कोणते असू शकते?

मुंबई - शिवसेनेत पडलेली फूट आणि महाराष्ट्रात झालेली राजकीय उलथापालथ या घडामोडींपासून उद्धव ठाकरे हे भाजपा आणि भाजपा नेत्यांवर सडकून टीका करत आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी भाजपाचे नैतिक अध:पतन झाल्याचा टोला लगावला होता. त्याला आता भाजपानेही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आपल्या नेतृत्वातून स्वहस्ते पक्षाचे विसर्जन करून उरल्यासुरल्या सेनेचे प्रमुखपदही गमावलेल्या उद्धव ठाकरेंच्या तोंडी नैतिक अधःपतनाची चिंता म्हणजे ‘सैतानाच्या तोंडी शांतिपाठ’ असेच म्हणावे लागेल. बाळासाहेबांच्या आशीर्वादासाठी राष्ट्रीय नेते मातोश्रीचे उंबरठे झिजवत असत. त्यांचा कौटुंबिक वारस असलेल्या ठाकरेंना आता इतरांचे उंबरठे झिजविण्याची वेळ यावी यापेक्षा मोठे नैतिक अधःपतन कोणते असू शकते? असा टोला केशव उपाध्ये यांनी लगावला.

केशव उपाध्ये म्हणाले की, आपल्या नेतृत्वातून स्वहस्ते पक्षाचे विसर्जन करून उरल्यासुरल्या सेनेचे प्रमुखपदही गमावलेल्या उद्धव ठाकरेंच्या तोंडी नैतिक अधःपतनाची चिंता म्हणजे ‘सैतानाच्या तोंडी शांतिपाठ’ असेच म्हणावे लागेल. पक्षाचे उरलेले अस्तित्व वाचवून राजकीय कडेलोटापासून स्वतःचा बचाव करण्याच्या केविलवाण्या प्रयत्नात ज्यांनी प्रत्येक हाताचा आधार शोधला, आणि लहानमोठ्या पक्षांची मते ओरबाडण्याचा स्वार्थीपणा करून अधःपतनाची परिसीमा गाठली, त्यांनी राजकारणातील नैतिक अधःपतनाची चिंता करावी ही आत्मवंचना म्हणावी की आत्मपरीक्षण म्हणावे हा प्रश्नच आहे, असे केशव उपाध्ये म्हणाले. 

उद्धव ठाकरेंनी शिवसेना संपविली, बाळासाहेबांचे निष्ठावंत दुरावले, स्वतःचे पक्षप्रमुखपदही स्वहस्ते संकटात आणले आणि आता अस्तित्व टिकविण्यासाठी लहानमोठ्या पक्षांचे उंबरठे झिजविले. बाळासाहेबांच्या आशीर्वादासाठी राष्ट्रीय नेते मातोश्रीचे उंबरठे झिजवत असत. त्यांचा कौटुंबिक वारस असलेल्या ठाकरेंना आता इतरांचे उंबरठे झिजविण्याची वेळ यावी यापेक्षा मोठे नैतिक अधःपतन कोणते असू शकते? पक्ष संपला, हाताशी नेतेही नाहीत आणि कार्यकर्तेही उरले नाहीत, स्वतःचे पदही राखता आले नाही आणि दोनचार लाळघोट्यांकरवी स्वतःवर स्तुतिसुमने उधळून घेण्याची वेळ आली, त्यांनी इतरांच्या अधःपतनाची उठाठेव करू नये. मुख्यमंत्रीपदावर असताना करोनामुळे घरात बसायची वेळ आली होती, आणि आता सारे काही गमावल्यामुळे घरात बसावे लागणार आहे, असा टोलाही केशव उपाध्ये यांनी लगावला.

ते पुढे म्हणाले की, २०१४ मध्ये भाजपसोबतची युती मोडून वेगळी चूल मांडणाऱ्या व नंतर सत्तेसाठी गोंडा घोळवत सरकारात सामील होणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या राजकीय स्वार्थावर त्यांचा लाऊडस्पीकर असलेल्या संजय राऊत यांनी अगदी अलीकडेच टोमणेबाज आरसा दाखविला आहे. बाळासाहेबांनी थापलेला शेंदूराचा थर आता उघडा पडला असून आतले दगड दिसू लागले आहेत. ज्या दिवशी शिवसेना कॉंग्रेसबरोबर जाईल त्या दिवशी पक्षाचे दुकान मी बंद करेन असे बाळासाहेब म्हणाले होते. उद्धव ठाकरेंनी कॉंग्रेसच नव्हे, तर राष्ट्रवादी कॉंग्रेस, संभाजी ब्रिगेड, कम्युनिस्टांकडेही आधारासाठी हात पसरून शिवसेनेचे दुकान बंद केले असून बाळासाहेबांचा शब्द खरा करून दाखविला, असा चिमटा केशव उपाध्ये यांनी काढला. 

२०१९ मध्ये कॉंग्रेसबरोबर हातमिळवणी करून मतदारांना फसवून व युतीला दगा देत या अधःपतनाचे शिल्पकार ठरलेल्या ठाकरेंनी राजकारणातील अधःपतनावर बोलावे हा या शतकातला केविलवाणा राजकीय विनोद आहे. पडझड झालेल्या पक्षाला आणि पक्षाच्या आधाराने स्वतःला व कुटुंबाला वाचविण्यासाठी यांनी आघाडीसाठी बाळासाहेबांनाही नाकारून राजकीय सोयीपुरते प्रबोधनकारांच्या विचारांचा बुरखा पांघरला हे अधःपतन नव्हे काय? प्रकाश आंबेडकर यांनी बाळासाहेबांवर व बाळासाहेबांचा हिंदुत्वाच्या विचारावर सतत कडवट टीका केली होती. हे सोयीपुरते विसरून उद्धव ठाकरेंनी अखेरच्या बचावाकरिता प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीशी युती करताना बाळासाहेबांना डावलून प्रबोधनकारांचे नाव वापरले, या अधःपतनाला काय म्हणायचे? असा सवालही केशव उपाध्ये उपस्थित केला. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा