शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

Maharashtra BJP: आता महाराष्ट्रात काय? 10 तारखेनंतर काय होते हे पाहाच, भाजपाने दिलेले इशारे

By अतुल कुलकर्णी | Updated: March 11, 2022 07:08 IST

भाजपला हवी स्वबळावर सत्ता; राज्यात केजरीवाल, ममता कोण होणार? दहा तारखेनंतर काय होते हे पाहाच, असे भाजपचे राज्यातील नेते सतत बोलत होते. त्या बोलण्याचे अर्थ आता महाविकास आघाडीच्या नेत्यांना कळत असतील. 

- अतुल कुलकर्णीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पाचपैकी चार राज्यांत भाजपने यश मिळविल्यानंतर 'आता महाराष्ट्राचा नंबर' अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राज्यात भाजप कशारीतीने सत्ता मिळविणार हाच एकमेव ‘मिलीयन डॉलर’ प्रश्न सगळ्यांपुढे आहे. 

या निकालाने भाजपचा आत्मविश्वास वाढला असला तरी महाराष्ट्रात ते लगेचच कोणासोबत तरी सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करतील अशी कोणतीही शक्यता नाही. त्या उलट काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांना कसे जास्तीत जास्त अडचणीत आणता येईल आणि या तिघांचीही स्पेस स्वत:च्या पक्षवाढीसाठी कशी वापरता येईल, याचे डावपेच राज्यातील भाजप नेत्यांनी सुरू केले आहेत.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जिद्दीने पंजाबसारख्या दुसऱ्या राज्यात जाऊन घवघवीत यश मिळविले. गोव्यासारख्या राज्यात स्वत:चे खाते उघडले. मात्र, देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता असणारे महाराष्ट्रातले नेते महाराष्ट्रातच भाजपला पराभूत का करू शकत नाहीत, असा प्रश्न महाविकास आघाडीच्या नेत्यांना पडला आहे.दहा तारखेनंतर काय होते हे पाहाच, असे भाजपचे राज्यातील नेते सतत बोलत होते. त्या बोलण्याचे अर्थ आता महाविकास आघाडीच्या नेत्यांना कळत असतील. 

आत्मपरीक्षण करण्याची हीच वेळपश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी एकट्याने भाजपशी लढल्या आणि दणदणीत विजय मिळवून दाखवला. बिहारमध्ये लालू प्रसाद यांचा मुलगा तेजस्वीने एकट्याने ७५ च्या आसपास जागा मिळवल्या. उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांनी एकट्याने झुंज देत १२६ जागांचा पल्ल्ला गाठला. या सगळ्या ठिकाणी भाजपची निवडणूक यंत्रणा कमालीची वेगळी होती. झाडून सगळे नेते मैदानात उतरले होते. अशावेळी जर हे लोक एवढे यश मिळवू शकतात, तर महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र असतानाही असे यश का मिळवू शकत नाही याचे आत्मपरीक्षण करण्याची हीच वेळ आहे.

अशी कोणतीही शक्यता नाहीभाजपच्या आजच्या यशाने राज्यातील सत्तेतल्या तिन्ही पक्षांना एकत्र येण्यासाठी मजबूर केले आहे. तीन पक्षांतील कोणताही एक पक्ष भाजपसोबत कोणत्याही परिस्थितीत जाणार नाही. मात्र, गेल्या दोन वर्षांत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी एकदाही टोकाचे विधान न करणे, फडणवीस यांनीही या दोघांविरुद्ध फार न बोलणे, त्यातून काही नवे घडू शकते असा तर्क दिला जात आहे. अजित पवार यांच्यासोबत फसलेल्या प्रयोगाची पुनरावृत्ती होऊ शकते किंवा एकनाथ शिंदे वेगळा गट करून भाजपसोबत जातील का? अशीही चर्चा असली तरी लगेच राज्यात काही बदल होतील अशी कोणतीही शक्यता आजतरी नाही.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्र