शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
2
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
3
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
4
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
5
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
6
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
7
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
8
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
9
बाई, हा काय प्रकार... LinkedIn वर फुल-टाइम गर्लफ्रेंडची व्हॅकन्सी, लोक विचारतात सॅलरी किती?
10
सोनं १३०६ रुपयांनी स्वस्त, चांदीही घसरली; पटापट चेक करा कॅरेटनिहाय लेटेस्ट रेट
11
Jara Hatke: अजब प्रथा: 'या' गावात लग्नाआधी तोडले जातात वधूचे दात; पण का??? वाचा 
12
मनोज जरांगे पाटील यांनी दिल्ली गाठली; अमित शाह यांच्याकडे केली मोठी मागणी, नेमके काय घडतेय?
13
IPL Auction 2026 LIVE: केकेआरचा मोठा डाव, कॅमरून ग्रीनपाठोपाठ पतिरानावर लावली विक्रमी बोली
14
Budh Pradosh 2025: इंग्रजी वर्ष २०२५ मधील शेवटचे प्रदोष व्रत; कर्जमुक्ती, संतान प्राप्तीसाठी करा 'हे' उपाय
15
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉसह सरफराज खानला कुणीच दिला नाही भाव; सलग दुसऱ्यांदा 'अनसोल्ड'चा ठपका
16
खळबळजनक! लेकीच्या कस्टडीसाठी पतीने रचला भयंकर प्लॅन; टीव्ही अभिनेत्री पत्नीला केलं किडनॅप
17
नाईट क्लब आग प्रकरणी फरार लुथरा बंधूंना दिल्लीत आणले; थायलंडला पळून गेले होते
18
कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! मार्च २०२६ पूर्वी मिळणार मोठं गिफ्ट, सरकारनं दिली महत्त्वाची माहिती
19
सेकंदात तयार होणारी मॅगी कॅप्सूल खरी की खोटी? ४० मिलियन लोकांनी बघितलेल्या व्हिडीओचं सत्य काय?
20
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' जन्मतारखेच्या लोकांनी पायात काळा धागा बांधू नये; होतो दुष्परिणाम!
Daily Top 2Weekly Top 5

नव्याने येणाऱ्या सरकारसमोर ओल्या दुष्काळाचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 11:14 IST

सत्ता कुणाचीही आली तरीही या नव्या सरकारसमोर राज्यातील अनेक भागात निर्माण झालेल्या ओला दुष्काळजन्य परिस्थितीतेचे मोठे आव्हान असणार आहे.

मुंबई : राज्यात एकीकडे सत्तास्थापनेच्या राजकीय घडामोडींना वेग आला असताना दुसरीकडे राज्यातील अनेक भागात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान केले आहेत.पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेली पिके उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाला असून अशा संकटाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज आहे. त्यामुळे राज्यात नव्याने स्थापन होणाऱ्या सरकारपुढे ओला दुष्काळाचे आव्हान असणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता राजकीय पक्षांकडून सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरु आहेत. युती करून विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या भाजपचे १०५ तर शिवसेनेच्या ५६ उमेदवार निवडून आली आहेत. मात्र सत्तेचा फॉर्म्युल्यामुळे या दोन्ही पक्षात वाद सुरु आहेत. त्याचप्रमाणे भाजपकडून हव तसा प्रतिसाद मिळाला नाही तर, शिवसेना राष्ट्रवादीचा पाठींबा घेऊन सरकार स्थापना करण्याचा अंदाज सुद्धा वर्तवला जात आहे. मात्र सत्ता कुणाचीही आली तरीही या नव्या सरकारसमोर राज्यातील अनेक भागात निर्माण झालेल्या ओला दुष्काळजन्य परिस्थितीतेचे मोठे आव्हान असणार आहे.

राज्यातील अनेक भागात झालेल्या परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असून ओला दुष्काळजन्य परिस्थती निर्माण झाली आहे. सर्वच पिके खरिपाची उध्वस्त झाली असल्याने शेतकऱ्यांचे दिवाळीत दिवाळे निघाले. परतीच्या पावसाने मका, बाजरी, तुरी, कपाशी पिकांचे करोडो रुपयांचे अतोनात नुकसान केले आहेत. शेतात पाणी तुंबल्याने मका व बाजरीच्या कणसांना कोंब फूटले तर कपाशीचे पिक पाण्यामुळे पिवळी पडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सरकरी मदतीची गरज निर्माण झाली आहे.

परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे. प्रशासनाकडून पिंकाचे पंचनामे करण्यास सुद्धा सुरवात झाली असली तरीही राज्यातील नवीन सरकार स्थापना होईपर्यंत मदत मिळणे अशक्य असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राज्यात नव्याने आलेल्या सरकारकडून पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांन कश्याप्रमाणे मदत मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.