शहरं
Join us  
Trending Stories
1
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाचत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
2
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
3
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
4
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
5
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
6
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
7
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
8
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
9
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
10
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
11
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
12
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
13
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
14
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
15
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
16
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
17
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
18
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
19
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
20
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस

नव्याने येणाऱ्या सरकारसमोर ओल्या दुष्काळाचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 11:14 IST

सत्ता कुणाचीही आली तरीही या नव्या सरकारसमोर राज्यातील अनेक भागात निर्माण झालेल्या ओला दुष्काळजन्य परिस्थितीतेचे मोठे आव्हान असणार आहे.

मुंबई : राज्यात एकीकडे सत्तास्थापनेच्या राजकीय घडामोडींना वेग आला असताना दुसरीकडे राज्यातील अनेक भागात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान केले आहेत.पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेली पिके उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाला असून अशा संकटाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज आहे. त्यामुळे राज्यात नव्याने स्थापन होणाऱ्या सरकारपुढे ओला दुष्काळाचे आव्हान असणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता राजकीय पक्षांकडून सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरु आहेत. युती करून विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या भाजपचे १०५ तर शिवसेनेच्या ५६ उमेदवार निवडून आली आहेत. मात्र सत्तेचा फॉर्म्युल्यामुळे या दोन्ही पक्षात वाद सुरु आहेत. त्याचप्रमाणे भाजपकडून हव तसा प्रतिसाद मिळाला नाही तर, शिवसेना राष्ट्रवादीचा पाठींबा घेऊन सरकार स्थापना करण्याचा अंदाज सुद्धा वर्तवला जात आहे. मात्र सत्ता कुणाचीही आली तरीही या नव्या सरकारसमोर राज्यातील अनेक भागात निर्माण झालेल्या ओला दुष्काळजन्य परिस्थितीतेचे मोठे आव्हान असणार आहे.

राज्यातील अनेक भागात झालेल्या परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असून ओला दुष्काळजन्य परिस्थती निर्माण झाली आहे. सर्वच पिके खरिपाची उध्वस्त झाली असल्याने शेतकऱ्यांचे दिवाळीत दिवाळे निघाले. परतीच्या पावसाने मका, बाजरी, तुरी, कपाशी पिकांचे करोडो रुपयांचे अतोनात नुकसान केले आहेत. शेतात पाणी तुंबल्याने मका व बाजरीच्या कणसांना कोंब फूटले तर कपाशीचे पिक पाण्यामुळे पिवळी पडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सरकरी मदतीची गरज निर्माण झाली आहे.

परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे. प्रशासनाकडून पिंकाचे पंचनामे करण्यास सुद्धा सुरवात झाली असली तरीही राज्यातील नवीन सरकार स्थापना होईपर्यंत मदत मिळणे अशक्य असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राज्यात नव्याने आलेल्या सरकारकडून पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांन कश्याप्रमाणे मदत मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.