शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
5
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
6
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
7
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
8
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
9
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
10
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
11
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
12
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
13
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
14
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
15
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
16
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
17
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
18
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
19
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
20
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट

West Bengal Election Result 2021: बंगालमध्ये रडीचा डाव! नंदीग्राम येथील प्रकारानंतर शरद पवारांचे सूचक ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 19:54 IST

West Bengal Election Result 2021: शरद पवार यांनी ट्विट करत नंदीग्राम येथील प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबई: देशभरात निवडणूक निकालाची धामधूम सुरू आहे. सर्वांचे लक्ष पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक निकालाकडे (West Bengal Election Result 2021) लागले आहे. पश्चिम बंगाल निवडणुकांमध्ये नंदीग्राम येथे भाजपचे शुभेंदू अधिकारी आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. सुरुवातीला ममता बॅनर्जी विजयी झाल्याचे सांगितले जात होते. मात्र, त्यानंतर शुभेंदू अधिकारी विजयी झाल्याचे सांगितले जात आहे. या संपूर्ण प्रकारावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून, ज्या पद्धतीने तिथे जे चाललंय याला 'रडीचा डाव' एवढंच म्हणता येईल, असे म्हटले आहे. (west bengal election result 2021 ncp sharad pawar react over nandigram election result)

नंदीग्राम मतदारसंघातील निवडणूक निकालावरून संभ्रमावस्था आहे. सुरुवातीला ममता बॅनर्जी यांचा विजय झाल्याचे सांगितले जात होते. मात्र, त्यानंतर शुभेंदू अधिकारी यांचा विजय झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. या निकालानंतर ममता बॅनर्जी यांनी फेरमोजणी करण्याची मागणी केल्याचे म्हटले जात आहे. मात्र, अद्याप मतमोजणी सुरू असून, सर्वांनी संयम राखावा, असे आवाहन तृणमूल काँग्रेसकडून करण्यात आले आहे. यातच आता शरद पवार यांनी ट्विट करत या संपूर्ण प्रकारावर टीका केली आहे. 

विजयाची परंपरा कायम राखण्यात अपयश; ‘ही’ आहेत भगीरथ भालकेंच्या पराभवाची ५ कारणं

रडीचा डाव!

बंगालच्या मतदारांनी भरभरून ममतांना पाठिंबा दिला आणि सबंध देशाच्या सत्तेला पराभूत केलं. हा निकाल मोठ्या मनाने स्वीकारायला हवा होता. पण ज्या पद्धतीने तिथे जे चाललंय याला 'रडीचा डाव' एवढंच म्हणता येईल!, असे ट्विट शरद पवार यांनी केले आहे. 

शरद पवारांकडून ममता बॅनर्जींचे अभिनंदन

यापूर्वी, तृणमूल काँग्रेसच्या विस्मयचकित करणाऱ्या विजयासाठी मी तुमचे अभिनंदन करतो. आपण भविष्यात लोकांच्या कल्याणासाठी एकत्रपणे काम करणे सुरू ठेवुयात. तसेच कोरोनाच्या संकटाचाही मिळून सामना करुयात, असे ट्विट शरद पवार यांनी केले होते. 

“कोरोनाची परिस्थिती हाताळण्यास मोदी अपयशी ठरले, यावर निकालाने शिक्कामोर्तब केले”

दरम्यान, देशातील पाच राज्यांच्या निवडणूक निकालांची घोषणा आज होत आहे. यातील पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं होते. कारण या ठिकाणी ममता बॅनर्जी विरुद्ध भाजप असा लढा पाहायला मिळाला होता. मतमोजणीच्या सध्याच्या आकडेवारीनुसार पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचीच सत्ता येणार असल्याचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे.   

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Assembly Election Results 2021विधानसभा निवडणूक निकाल 2021Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMamata Banerjeeममता बॅनर्जीTrinamool Congressतृणमूल काँग्रेसPoliticsराजकारण