शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांचे वर्तन चुकीचे : माधव गोडबोले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 11:24 IST

सीबीआयच्या कारवाई विरोधात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी धरणे आंदोलन सुरु केले.

ठळक मुद्देकायद्याविरोधात जाण्याचा चुकीचा पायंडा चीट फंड घोटाळ्याची व्याप्ती फार मोठी मोठमोठे राजकीय नेते देखील गुंतलेले असल्याच्या तक्रारी स्थानिक पोलीस याप्रकरणी चौकशी करत नसल्याने काही जणांनी सर्वोच्च न्यायालयात घेतली धाव

पुणे : पश्चिम बंगालमधील चीट फंड गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी गेलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर सीबीआयच्या कारवाई विरोधात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी धरणे आंदोलन सुरु केले. हा अत्यंत चुकीचा प्रकार असल्याचे परखड मत माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांनी सोमवारी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. अशा घटनांमुळे देशात कायद्याच राज्य आहे की नाही ? असा प्रश्न उपस्थित होत असल्याचे ते म्हणाले. पश्चिम बंगालमध्ये काही वर्षांपुर्वी झालेल्या शारदा आणि रोझ व्हॅली या घोटाळ्याप्रकरणी स्थानिक पोलीस आयुक्तांचा जबाब नोंदविण्यासाठी गेलेल्या सीबीआय पथकाला स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी कारवाई विरोधात धरणे आंदोलन करीत असल्याचे जाहीर केले. देशाची संघीय रचना मोडून काढण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.  त्या पार्श्वभूमीवर बोलताना गोडबोले म्हणाले, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांचे वर्तन अतिशय चुकीचे आहे. सीबीआय ही केंद्रीय संस्था आहे. तिचा अधिकार हा केंद्रीय प्रदेशांपुरताच मर्यादित आहे. सीबीआयला एखाद्या स्थानिक गुन्ह्याची चौकशी करायची असल्यास, संबंधित राज्याची परवानगी आवश्यक असते. मात्र, संंबंधित चीट फंड घोटाळ्याची व्याप्ती फार मोठी असून, त्यात मोठमोठे राजकीय नेते देखील गुंतलेले असल्याच्या तक्रारी आहेत. स्थानिक पोलीस या प्रकरणी चौकशी करीत नसल्याने काही जणांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला चौकशीचे आदेश दिले. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सीबीआय टाळू शकत नाही. आपण संघ राज्य आहोत. जर एखाद्या राज्याचा मुख्यमंत्रीच सीबीआयच्या कारवाई विरोधात धरणे धरत असेल, तर कसे चालेल. या पुर्वी देखील दिल्लीचे मुख्यमंत्र्यांनी धरणे आंदोलन केले होते. मुख्यमंत्री पदावरील व्यक्ती अशा पद्धतीने वागत असेल, तर सामान्य नागरिकांनी कोणाच्या तोंडाकडे पाहायचे. हे कायद्याचे राज्य आहे. अशा प्रकरणाला देखील राजकीय रंग दिला जातो. या पद्धती विरोधात देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटायला हवी. मात्र, आजकाल विरोधात असल्यावर सीबीआय सरकारच्या हातातील बाहुले झाले असल्याची ओरड केली जाते. फक्त आपण कोणत्या बाकावर आहोत, हे पाहून राजकीय व्यक्ती प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत असल्याचे गोडबोले म्हणाले. 

टॅग्स :Puneपुणेwest bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जीCBIगुन्हा अन्वेषण विभागCentral Governmentकेंद्र सरकार