शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
2
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
3
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
4
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
5
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
6
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
7
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
8
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
9
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
10
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
11
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
12
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
13
स्फोट होतात, माणसं मरतात, त्यात विशेष काय ?
14
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?
15
महापालिका डायरी: होर्डिंगसाठी बीएमसीची परवानगी तर घ्यावी लागेलच!
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

खैरबंदा जलाशयात पाणी सोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2018 12:10 AM

यावर्षी जुलै महिन्यात पावसाने दडी मारल्यामुळे खैरबंदा जलाशयाच्या लाभ क्षेत्रातंर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांना पाण्याची गरज आहे. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेवून पिकांसाठी १० आॅगस्टपर्यंत खैरबंदा जलाशयात पाणी सोडण्याचे निर्देश आ. विजय रहांगडाले यांनी संबंधित विभागाच्या अधिकाºयांना दिले.

ठळक मुद्देविजय रहांगडाले : आढावा बैठकीत दिले निर्देश, शेतकऱ्यांना होणार मदत

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : यावर्षी जुलै महिन्यात पावसाने दडी मारल्यामुळे खैरबंदा जलाशयाच्या लाभ क्षेत्रातंर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांना पाण्याची गरज आहे. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेवून पिकांसाठी १० आॅगस्टपर्यंत खैरबंदा जलाशयात पाणी सोडण्याचे निर्देश आ. विजय रहांगडाले यांनी संबंधित विभागाच्या अधिकाºयांना दिले.धापेवाडा टप्पा १ व टप्पा २ च्या कामाचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी (दि.७) तिरोडा येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीेला जि.प.सदस्या विमल नागपुरे, कैलाश पटले, उपसभापती मनोहर राऊत, पं.स.सदस्य हितेंद्र लिल्हारे, कृऊबास संचालक चतूरभूज बिसेन, डॉ. वसंत भगत, भाजप उपाध्यक्ष मनोहर बुध्दे, कार्यकारी अभियंता छप्परघरे, कार्यकारी अभियंता पृथ्वी फालके, उपअभियंता पंकज गेडाम, गायकवाड व लाभक्षेत्रांतर्गत येणाऱ्या गावातील सरपंच व भाजप पदाधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांची बैठक बोलावून खैरबंदा जलाशयात सध्या स्थितीत ७.०० दलघमी पाणीसाठा असून त्याची टक्केवारी ४४ टक्के आहे. त्यांचा फायदा शेतकऱ्यांना सिंचनासाठी व्हावा, यासाठी खैरबंदा जलाशयात पाणीसाठ्याचे पूर्ण संचय करणे आवश्यक आहे. खैरबंदा जलाशयात धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा क्रं. १ च्या खैरबंदा उर्ध्वनलिकाद्वारे वैनगंगा नदीचे पाणी उपसा करुन १० आॅगस्टपर्यंत खैरबंदा जलाशयात सोडण्याचे निर्देश दिले.धापेवाडा उपसा सिंचन टप्पा १ योजना ही शेतकऱ्यांसाठी लाभदायक आहे. सन १९९५ पासून या योजनेला पूर्णत्वाकडे नेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आ. रहांगडाले यांच्या कार्यकाळात धापेवाडा उपसा सिंचन टप्पा क्रं. १ पूर्णत्वास आली. या उपसा सिंचन योजनेचे पाणी खळबंदा जलाशयात सोडण्यासाठी १५ आॅगस्ट २०१७ ला यशस्वी चाचणी घेण्यात आली. परंतु उपसा सिंचनातील काही तांत्रीक बिघाडीमुळे चारही पंप सुरु नसल्यामुळे पूर्णपणे खैरबंदा जलाशयात पाणी भरता आले नाही. त्यामुळे त्वरीत पंप दुरुस्ती करण्याचे निर्देश आ.रहांगडाले यांनी दिले होते. त्यानंतर चारही पंप दुरुस्त करण्यात आले. त्यामुळे या योजनेचे पाणी खैरबंदा जलाशयात सोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पाण्याचे योग्य नियोजन करुन पाणीपट्टीच्या दराबाबत सर्व ग्रामपंचायतीनी शेतकºयांना नोटीसद्वारे माहिती द्यावी. सर्व शेतकºयांनी वेळेवर पाणीपट्टी भरावी असे आ.रहांगडाले यांनी बैठकीत सांगितले.

 

टॅग्स :Damधरण