शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

खैरे, अहिर, गिते, आढळराव, अडसूळ होते मंत्रीपदाच्या शर्यतीत !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2019 14:46 IST

द्रकांत खैरे, हंसराज अहिर, शिवाजीराव आढळराव पाटील, अनंत गिते आणि आनंदराव अडसूळ यांचा पराभव विचार करायला लावणारा आहे. हे पाचही नेते मंत्रीपदाच्या शर्यतीत होते.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने शानदार विजय मिळवला. महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीने आपली कामगिरी कायम राखत, विजयी घोडदौड केली. परंतु, लोकसभा निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाला सामोरे जावे लागले. या दिग्गजांमध्ये सत्ताधारी पक्षातील नेत्यांचाही समावेश होता. या दिग्गजांच्या पराभवावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी लक्ष वेधले. त्यामुळे चंद्रकांत खैरे, हंसराज अहिर, शिवाजीराव आढळराव पाटील, अनंत गिते आणि आनंदराव अडसूळ यांचा पराभव विचार करायला लावणारा आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे अजूनही पराभवाच्या धक्क्यातून सावरलेले नाहीत. पराभवाला पक्षातील काही पदाधिकारी जबाबदार असल्याचे त्यांचे मत आहे. मात्र राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नामुळे कार्यकर्ते नव्हे तर शिवसेना आणि भाजपची संपूर्ण यंत्रणाच खैरे यांच्या पराभवासाठी कार्यरत होती का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. यावेळी राज ठाकरे यांनी इम्तियाज जलील कारणमात्र होते, असंही नमूद केले. शिवसेनेकडून चंद्रकांत खैरे मंत्रीपदाचे प्रबळ दावेदार होते. परंतु, त्यांचाच पराभव झाल्यामुळे मंत्रीपदाच्या चर्चांवर अपसुखच पडदा पडला.

 

भाजपचे ज्येष्ठ नेते हंसराज अहिर यांच्याविषयीही असंच झालं अशी शक्यता व्यक्त होत आहे. आतापर्यंत भाजपचा गड असलेल्या चंद्रपूरमध्ये बाळू धानोरकर यांच्या रुपाने काँग्रेसने आपला झेंडा रोवला आहे. १५ वर्षांनंतर काँग्रेसने ही जागा मिळविली आहे. ऐनवेळी शिवसेनेत दाखल झालेल्या धानोरकरांनी केंद्रीयमंत्री हंसराज अहिर यांना पराभूत केले. अहिर यांचा पराभव भाजपलाच हवा होता, अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे. हंसराज आहिर कॅबिनेट मंत्रीपदाचे दावेदार होते.

शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना शिरूर मतदार संघातून राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी पराभूत केले. त्यांच्या पराभवाचे नियोजन देखील भाजप-शिवसेनेनेच केले होते, असा दावा राज ठाकरे यांनी केला. आढळराव पाटील देखील मंत्रीपदासाठी प्रबळ दावेदार होते. हीच स्थिती आनंदराव अडसूळ आणि अनंत गिते यांच्याविषयी झालं. हे दोघेही मंत्रीपदासाठी दावेदार होते. त्यामुळेच त्यांचा पराभव घडवून आणला गेल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला.