शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
5
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
6
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
7
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
8
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
9
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
10
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
11
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
12
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
13
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
14
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
15
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
16
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
17
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
18
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
19
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
20
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा

खैरे, अहिर, गिते, आढळराव, अडसूळ होते मंत्रीपदाच्या शर्यतीत !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2019 14:46 IST

द्रकांत खैरे, हंसराज अहिर, शिवाजीराव आढळराव पाटील, अनंत गिते आणि आनंदराव अडसूळ यांचा पराभव विचार करायला लावणारा आहे. हे पाचही नेते मंत्रीपदाच्या शर्यतीत होते.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने शानदार विजय मिळवला. महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीने आपली कामगिरी कायम राखत, विजयी घोडदौड केली. परंतु, लोकसभा निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाला सामोरे जावे लागले. या दिग्गजांमध्ये सत्ताधारी पक्षातील नेत्यांचाही समावेश होता. या दिग्गजांच्या पराभवावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी लक्ष वेधले. त्यामुळे चंद्रकांत खैरे, हंसराज अहिर, शिवाजीराव आढळराव पाटील, अनंत गिते आणि आनंदराव अडसूळ यांचा पराभव विचार करायला लावणारा आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे अजूनही पराभवाच्या धक्क्यातून सावरलेले नाहीत. पराभवाला पक्षातील काही पदाधिकारी जबाबदार असल्याचे त्यांचे मत आहे. मात्र राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नामुळे कार्यकर्ते नव्हे तर शिवसेना आणि भाजपची संपूर्ण यंत्रणाच खैरे यांच्या पराभवासाठी कार्यरत होती का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. यावेळी राज ठाकरे यांनी इम्तियाज जलील कारणमात्र होते, असंही नमूद केले. शिवसेनेकडून चंद्रकांत खैरे मंत्रीपदाचे प्रबळ दावेदार होते. परंतु, त्यांचाच पराभव झाल्यामुळे मंत्रीपदाच्या चर्चांवर अपसुखच पडदा पडला.

 

भाजपचे ज्येष्ठ नेते हंसराज अहिर यांच्याविषयीही असंच झालं अशी शक्यता व्यक्त होत आहे. आतापर्यंत भाजपचा गड असलेल्या चंद्रपूरमध्ये बाळू धानोरकर यांच्या रुपाने काँग्रेसने आपला झेंडा रोवला आहे. १५ वर्षांनंतर काँग्रेसने ही जागा मिळविली आहे. ऐनवेळी शिवसेनेत दाखल झालेल्या धानोरकरांनी केंद्रीयमंत्री हंसराज अहिर यांना पराभूत केले. अहिर यांचा पराभव भाजपलाच हवा होता, अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे. हंसराज आहिर कॅबिनेट मंत्रीपदाचे दावेदार होते.

शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना शिरूर मतदार संघातून राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी पराभूत केले. त्यांच्या पराभवाचे नियोजन देखील भाजप-शिवसेनेनेच केले होते, असा दावा राज ठाकरे यांनी केला. आढळराव पाटील देखील मंत्रीपदासाठी प्रबळ दावेदार होते. हीच स्थिती आनंदराव अडसूळ आणि अनंत गिते यांच्याविषयी झालं. हे दोघेही मंत्रीपदासाठी दावेदार होते. त्यामुळेच त्यांचा पराभव घडवून आणला गेल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला.