शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

खैरे, अहिर, गिते, आढळराव, अडसूळ होते मंत्रीपदाच्या शर्यतीत !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2019 14:46 IST

द्रकांत खैरे, हंसराज अहिर, शिवाजीराव आढळराव पाटील, अनंत गिते आणि आनंदराव अडसूळ यांचा पराभव विचार करायला लावणारा आहे. हे पाचही नेते मंत्रीपदाच्या शर्यतीत होते.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने शानदार विजय मिळवला. महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीने आपली कामगिरी कायम राखत, विजयी घोडदौड केली. परंतु, लोकसभा निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाला सामोरे जावे लागले. या दिग्गजांमध्ये सत्ताधारी पक्षातील नेत्यांचाही समावेश होता. या दिग्गजांच्या पराभवावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी लक्ष वेधले. त्यामुळे चंद्रकांत खैरे, हंसराज अहिर, शिवाजीराव आढळराव पाटील, अनंत गिते आणि आनंदराव अडसूळ यांचा पराभव विचार करायला लावणारा आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे अजूनही पराभवाच्या धक्क्यातून सावरलेले नाहीत. पराभवाला पक्षातील काही पदाधिकारी जबाबदार असल्याचे त्यांचे मत आहे. मात्र राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नामुळे कार्यकर्ते नव्हे तर शिवसेना आणि भाजपची संपूर्ण यंत्रणाच खैरे यांच्या पराभवासाठी कार्यरत होती का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. यावेळी राज ठाकरे यांनी इम्तियाज जलील कारणमात्र होते, असंही नमूद केले. शिवसेनेकडून चंद्रकांत खैरे मंत्रीपदाचे प्रबळ दावेदार होते. परंतु, त्यांचाच पराभव झाल्यामुळे मंत्रीपदाच्या चर्चांवर अपसुखच पडदा पडला.

 

भाजपचे ज्येष्ठ नेते हंसराज अहिर यांच्याविषयीही असंच झालं अशी शक्यता व्यक्त होत आहे. आतापर्यंत भाजपचा गड असलेल्या चंद्रपूरमध्ये बाळू धानोरकर यांच्या रुपाने काँग्रेसने आपला झेंडा रोवला आहे. १५ वर्षांनंतर काँग्रेसने ही जागा मिळविली आहे. ऐनवेळी शिवसेनेत दाखल झालेल्या धानोरकरांनी केंद्रीयमंत्री हंसराज अहिर यांना पराभूत केले. अहिर यांचा पराभव भाजपलाच हवा होता, अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे. हंसराज आहिर कॅबिनेट मंत्रीपदाचे दावेदार होते.

शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना शिरूर मतदार संघातून राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी पराभूत केले. त्यांच्या पराभवाचे नियोजन देखील भाजप-शिवसेनेनेच केले होते, असा दावा राज ठाकरे यांनी केला. आढळराव पाटील देखील मंत्रीपदासाठी प्रबळ दावेदार होते. हीच स्थिती आनंदराव अडसूळ आणि अनंत गिते यांच्याविषयी झालं. हे दोघेही मंत्रीपदासाठी दावेदार होते. त्यामुळेच त्यांचा पराभव घडवून आणला गेल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला.