शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोणते वारे भिडता? का होते गारपीट? डॉ. रंजन केळकर यांनी उलगडले रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 12:42 IST

weather: हिवाळ्यात पश्चिम व पूर्वेकडील दोन्ही वारे महाराष्ट्रावर भिडत असल्याने इथे वादळी पाऊस आणि गारपीट होते, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे माजी महासंचालक व हवामानतज्ज्ञ डॉ. रंजन केळकर यांनी ‘लोकमत’ला दिली.  

- श्रीकिशन काळे पुणे - हिवाळ्यामध्ये पाऊस, गारपीट हे नवीन नाही. या महिन्यात असे हवामान असतेच. नोव्हेंबरमध्ये काही प्रमाणात पाऊस पडत असतो. हिवाळ्यात पश्चिम व पूर्वेकडील दोन्ही वारे महाराष्ट्रावर भिडत असल्याने इथे वादळी पाऊस आणि गारपीट होते, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे माजी महासंचालक व हवामानतज्ज्ञ डॉ. रंजन केळकर यांनी ‘लोकमत’ला दिली.  या पावसाला अवकाळीदेखील म्हणता येणार नाही, गारा पडल्याने  हा हवामान बदलाचा फटका असल्याचे म्हटले आहे. परंतु, तसे काहीही नसून या काळात अशी परिस्थिती असते, असे डाॅ. केळकर म्हणाले.

परस्परविरोधी वाऱ्यांचे प्रवाह भिडतात तेव्हा...- भारत उष्ण कटिबंधीय देश आहे. मात्र, उत्तरेकडील प्रदेश शीत कटिबंधात मोडतात. उष्ण कटिबंधावरचे वारे सामान्यत: पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात, शीत कटिबंधावरचे वारे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. - क्वचितप्रसंगी असे घडते की, हे परस्परविरोधी प्रवाह महाराष्ट्रावर एकमेकांना भिडतात. मग एकीकडची शीत व शुष्क हवा आणि दुसरीकडची उष्ण व दमट हवा यांची देवाणघेवाण होते आणि महाराष्ट्रात वादळी पावसासह गारपीट होते.

गारा पडण्याची प्रक्रियाजमिनीपासून जितके वरती जावे तितके हवेचे तापमान कमी होत जाते. समजा, जमिनीचे तापमान ३० अंश सेल्सिअस आहे, तर मग ५-६ किमी उंचीवर हवेचे तापमान शून्य सेल्सिअस राहते. आता या स्तरावर असलेल्या ढगातील जलबिंदूचे घनीभवन होऊन त्यांचे सूक्ष्म हिमकणांत रुपांतर होते, असे हिमकण असलेले क्युम्युलोनिम्बस प्रकारचे ढग आकाशात खूप उंच वाढतात.वारे एका स्थानावरून दुसऱ्या स्थानी म्हणजे आडवे वाहतात. परंतु, वातावरणात असेही काही तरंग असतात जे उभे वाहतात; क्युम्युलोनिम्बस प्रकारच्या ढगात हे उभे किंवा उर्ध्वाधर तरंग खूप प्रबळ असतात. त्याच्यात बनलेले हिमकण या तरंगांमुळे वर फेकले जातात. त्यांच्याभोवती आणखी बाष्प जमा होते, ते मोठे होतात आणि परत खाली पडतात. हिमकण जर पुन्हा पुन्हा वर खाली करत राहिले तर त्यांच्यावर बर्फाचे थर चढत जातात आणि त्यांचा आकार आणि वजन वाढते. अखेरीस ते पृथ्वीच्या गुरुत्त्वाकर्षामुळे खाली पडू लागतात आणि शेवटी जमिनीवर आदळतात तेव्हा त्यांना आपणगारा म्हणतो. 

शेतकऱ्यांनी कमी पाण्यात येणारी पिके ज्वारी, बाजरी आदी घ्यावीत. आता डाळिंबे, द्राक्ष, ऊस लावला जातो  नोव्हेंबरमध्ये असे वातावरण नेहमीचे आहे. गारपीट होतेच. शेतकऱ्यांनी हवामान कधी कोणते असते, ते ओळखून पिके घ्यावीत. - डॉ. रंजन केळकर, हवामानतज्ज्ञ  

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रweatherहवामान