शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

कोणते वारे भिडता? का होते गारपीट? डॉ. रंजन केळकर यांनी उलगडले रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 12:42 IST

weather: हिवाळ्यात पश्चिम व पूर्वेकडील दोन्ही वारे महाराष्ट्रावर भिडत असल्याने इथे वादळी पाऊस आणि गारपीट होते, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे माजी महासंचालक व हवामानतज्ज्ञ डॉ. रंजन केळकर यांनी ‘लोकमत’ला दिली.  

- श्रीकिशन काळे पुणे - हिवाळ्यामध्ये पाऊस, गारपीट हे नवीन नाही. या महिन्यात असे हवामान असतेच. नोव्हेंबरमध्ये काही प्रमाणात पाऊस पडत असतो. हिवाळ्यात पश्चिम व पूर्वेकडील दोन्ही वारे महाराष्ट्रावर भिडत असल्याने इथे वादळी पाऊस आणि गारपीट होते, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे माजी महासंचालक व हवामानतज्ज्ञ डॉ. रंजन केळकर यांनी ‘लोकमत’ला दिली.  या पावसाला अवकाळीदेखील म्हणता येणार नाही, गारा पडल्याने  हा हवामान बदलाचा फटका असल्याचे म्हटले आहे. परंतु, तसे काहीही नसून या काळात अशी परिस्थिती असते, असे डाॅ. केळकर म्हणाले.

परस्परविरोधी वाऱ्यांचे प्रवाह भिडतात तेव्हा...- भारत उष्ण कटिबंधीय देश आहे. मात्र, उत्तरेकडील प्रदेश शीत कटिबंधात मोडतात. उष्ण कटिबंधावरचे वारे सामान्यत: पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात, शीत कटिबंधावरचे वारे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. - क्वचितप्रसंगी असे घडते की, हे परस्परविरोधी प्रवाह महाराष्ट्रावर एकमेकांना भिडतात. मग एकीकडची शीत व शुष्क हवा आणि दुसरीकडची उष्ण व दमट हवा यांची देवाणघेवाण होते आणि महाराष्ट्रात वादळी पावसासह गारपीट होते.

गारा पडण्याची प्रक्रियाजमिनीपासून जितके वरती जावे तितके हवेचे तापमान कमी होत जाते. समजा, जमिनीचे तापमान ३० अंश सेल्सिअस आहे, तर मग ५-६ किमी उंचीवर हवेचे तापमान शून्य सेल्सिअस राहते. आता या स्तरावर असलेल्या ढगातील जलबिंदूचे घनीभवन होऊन त्यांचे सूक्ष्म हिमकणांत रुपांतर होते, असे हिमकण असलेले क्युम्युलोनिम्बस प्रकारचे ढग आकाशात खूप उंच वाढतात.वारे एका स्थानावरून दुसऱ्या स्थानी म्हणजे आडवे वाहतात. परंतु, वातावरणात असेही काही तरंग असतात जे उभे वाहतात; क्युम्युलोनिम्बस प्रकारच्या ढगात हे उभे किंवा उर्ध्वाधर तरंग खूप प्रबळ असतात. त्याच्यात बनलेले हिमकण या तरंगांमुळे वर फेकले जातात. त्यांच्याभोवती आणखी बाष्प जमा होते, ते मोठे होतात आणि परत खाली पडतात. हिमकण जर पुन्हा पुन्हा वर खाली करत राहिले तर त्यांच्यावर बर्फाचे थर चढत जातात आणि त्यांचा आकार आणि वजन वाढते. अखेरीस ते पृथ्वीच्या गुरुत्त्वाकर्षामुळे खाली पडू लागतात आणि शेवटी जमिनीवर आदळतात तेव्हा त्यांना आपणगारा म्हणतो. 

शेतकऱ्यांनी कमी पाण्यात येणारी पिके ज्वारी, बाजरी आदी घ्यावीत. आता डाळिंबे, द्राक्ष, ऊस लावला जातो  नोव्हेंबरमध्ये असे वातावरण नेहमीचे आहे. गारपीट होतेच. शेतकऱ्यांनी हवामान कधी कोणते असते, ते ओळखून पिके घ्यावीत. - डॉ. रंजन केळकर, हवामानतज्ज्ञ  

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रweatherहवामान