शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

अजित पवारांनी माफी मागितल्यास पुन्हा सोबत घेणार?; कडक भूमिका घेत शरद पवारांनी कापले परतीचे दोर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2024 13:42 IST

गेलेले आमदार पुन्हा शरद पवारांकडे येऊन माफी मागतील, या आमदारांमध्ये घालमेल सुरू आहे, असा दावा राजेश टोपे यांनी नुकताच केला होता.

NCP Sharad Pawar ( Marathi News ) : राष्ट्रवादीतील फुटीनंतर पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिवसेंदिवस राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत. त्यामुळे दोन्ही गटांमधील संघर्ष टोकदार झाला असून अजित पवार गटाला आता माफी नाही, अशी भूमिका शरद पवारांनी घेतली आहे. "अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या लोकांबद्दल आता फेरविचार नाही," असं शरद पवार यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे.

दिल्लीतील भाजप सरकार गेलं तर अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेले आमदार पुन्हा शरद पवारांकडे येऊन माफी मागतील, या आमदारांमध्ये घालमेल सुरू आहे, असा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते राजेश टोपे यांनी नुकताच केला होता. याबाबत प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणाले की, "आमदारांमध्ये घालमेल सुरू आहे की नाही मला माहीत नाही, पण असा निर्णय ज्यांनी घेतला आहे त्यांच्याबाबत आमच्या पक्षात आता फेरविचार होणार नाही. भाजपसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय घेण्यास जे जबाबदार आहेत, त्यांच्याबाबत आमची भूमिका स्वच्छ आहे," असं म्हणत महायुतीत गेलेल्या गटाला शरद पवार यांनी फटकारलं आहे.

महाविकास आघाडीच्या बैठकीबाबत माहिती, प्रकाश आंबेडकरांबद्दल काय म्हणाले?

शरद पवार यांनी आज होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीबाबत माहिती दिली. "दिल्लीत आज काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावर प्राथमिक चर्चा होईल. या बैठकीत राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाड उपस्थित राहतील. जागावाटपाचं चित्र कसं असावं यावर ही बैठक होणार असली तरी ही अंतिम बैठक नाही. ही जागावाटपाच्या चर्चेची सुरुवात असून यामध्ये प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आणि इतर डाव्या पक्षांनाही सहभागी करून घ्यावं, अशी आमची भूमिका आहे,' असं शरद पवार म्हणाले.

गेल्या काही महिन्यांपासून महाविकास आघाडीच्या विविध नेत्यांशी संबंधित ठिकाणांवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून छापे टाकले आहेत. याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, साहजिकच जोपर्यंत दिल्लीचं सरकार बदल नाही, तोपर्यंत अशा गोष्टी घडत राहणार. 

दरम्यान, 'बिल्किस बानो प्रकरणात गुन्हेगारांना मिळालेला दिलासा कोर्टाने रद्द केला आहे. सुप्रीम कोर्टाने निकालात नमूद केलं आहे की यावर महाराष्ट्र सरकारनं निर्णय द्यावा. सुप्रीम कोर्टाचा निर्णय सर्वसामान्यांना आधार देणारा आहे," अशा शब्दांत शरद पवार यांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालाबाबत समाधान व्यक्त केलं आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडी