शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

विजय वडेट्टीवारांनी पुन्हा अजित पवारांना डिवचलं; इंदापूरात राष्ट्रवादीला स्पष्ट शब्दातच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 00:38 IST

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आमच्या पक्षाची भूमिका ठरलेली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व आमचे सर्व सहकारी काँग्रेस पक्षाची ताकद तळागाळापर्यंत वाढवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत आहेत.

ठळक मुद्देमहाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याची भाजपचा डाव, काँग्रेस पक्ष नंबर एक राहणारराज्यामध्ये भाजपा सत्तेत असताना, ज्या मंत्र्यांवर आरोप झाले, त्यांच्यावर कारवाई केली नाही. सध्या भारतीय जनता पार्टी दबाव तंत्राचा वापर करून, दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.

इंदापूर : दिल्लीतील भाजपचे सरकार ईडी व सीबीआय या यंत्रणेचा प्रचंड दुरुपयोग करून राज्यातील महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा डाव करत आहे. परंतु, राज्यामध्ये भाजपा सत्तेत असताना, ज्या मंत्र्यांवर आरोप झाले, त्यांच्यावर कारवाई केली नाही. सुडाचा बदला घेण्याची भावना महाराष्ट्रात कधी नव्हती. अशी चुकीची परंपरा घातक ठरणारी आहे, अशी टीका राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली.

इंदापूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामधाम येथे मंगळवारी (दि. ३१) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार बोलत होते. या वेळी इंदापूर तालुक्याचे काँग्रेसचे  तालुकाध्यक्ष स्वप्नील सावंत व काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

वडेट्टीवार म्हणाले, सध्या भारतीय जनता पार्टी दबाव तंत्राचा वापर करून, दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. दिल्लीतले सरकार शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून न्याय मिळावा म्हणून शेतकरी झगडत आहेत. मात्र केंद्र सरकार अद्यापि शेतकऱ्यांना न्याय देऊ शकले नाही. उलट न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करण्याचा प्रचंड प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. भाजपाचे सरकार म्हणजे व्यापाऱ्यांचे सरकार आहे.  देश विकण्याचा धंदा केंद्र सरकारने चालवला आहे, असा घणाघात वडेट्टीवार यांनी केला.इंदापूर विधानसभेची जागा आम्ही सोडणार नाही

राष्ट्रवादी काँग्रेसचा गड असलेल्या इंदापूरात सध्या दत्तात्रय भरणे आमदार आहे. ही जागा अजित पवारांसाठी महत्त्वाची आहे. याच जागेवरुन हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांच्यात राजकीय मतभेद आहेत. मात्र आता यावरुन विजय वडेट्टीवार म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आमच्या पक्षाची भूमिका ठरलेली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व आमचे सर्व सहकारी काँग्रेस पक्षाची ताकद तळागाळापर्यंत वाढवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. त्यामुळे आम्ही काही इंदापूरची विधानसभा सोडणार नाही. सध्या राज्यात काँग्रेस पक्षालाच जोरदार पाठिंबा मिळतो आहे. पुढच्या विधानसभेला महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष नंबर एक राहील, अशीही माहिती मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारcongressकाँग्रेस