शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

उद्धव ठाकरेंनी सोबत यावं, म्हणून आता त्यांच्या दारात जाणार नाही; यायचं असेल तर..., रावसाहेब दानवे स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2022 14:50 IST

"ज्या युतीला राज्यातील लोकांनी मतदान केले होते. त्याच्यासोबत  दगाफटका करून त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत संधान साधले आणि स्वतः मुख्यमंत्री बनले."

उद्धव ठाकरे यांनी आमच्या सोबत यावे की न यावे, हे बोलण्यासाठी काही आम्ही आता त्यांच्या दारात जाणार नाही. यायचे असेल, कुणीही येणार असेल, त्यांना मागच्या घटनेचा पश्चात्ताप झाला असेल, तर त्यांना यायला काही हरकत नाही. त्यांना येण्यासाठी आमची ना नाही. या आणि आमच्यासोबत राहा. पण जे सरकार आमचे चाललेय, त्यात डिस्टर्ब करू नका, असे भाजपचे नेते तथा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हणटले आहे. ते एका मराठी वृत्त वाहिनीशी बोलत होते.

राजकारणात कुणी कुणाचा कायमचा मित्र नाही आणि शत्रूही नाही -यावेळी, मैत्रिदिनाच्या पार्श्वभूमीवर, उद्धव ठाकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकत्र येण्यासंदर्भात बोलताना दानवे म्हणाले, राजकारणात कुणी कुणाचा कायमचा मित्र नाही आणि कुणीही कुणाचा कायमचा शत्रू नाही. उद्धव ठाकरे काही दिवस आमच्यासोबत होते. 25 वर्ष आम्ही एकत्र राहिलो. मात्र, 25 व्या वर्षी त्यांना वाटले, की भारतीय जनता पक्षासोबत राहून आपले नुकसान झाले. यामुळे त्यांनी आमची साथ सोडली. ज्या युतीला राज्यातील लोकांनी मतदान केले होते. त्याच्यासोबत  दगाफटका करून त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत संधान साधले आणि स्वतः मुख्यमंत्री बनले. ते आमचे मित्र होते. आता पूर्व मित्र झाले. 

तसेच, आता आम्ही नवीन मित्र जोडले आहेत, एकनाथ शिंदे. ते आज आमचे मित्र आहेत. मित्र, म्हणजेच मूळ शिवसेना आहे आणि आता आम्ही एकत्र सरकार स्थापन केले आहे. यामुळे, मैत्री दिनाच्या दिवशी एकमेकांना शुभेच्छा देताना अशाच शब्दांचा वापर करायला हवा. की समोरच्याला वाईट वाटू नये. असाच शब्द प्रयोग कुण्या एखाद्या शिंदे गटातील आमदाराने केला असले, तर त्याचा वेगळा अर्थ काढू नये, असेही दानवे यांनी म्हटले आहे. ते टीव्ही-9 सोबत बोलत होते.

उद्धव ठाकरे आणि शिंदेंनी एकत्र यावे -तत्पूर्वी, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र यावं. शिवसेना वाढवावी ही भावना प्रत्येक शिवसैनिकांची, पदाधिकारी आणि आमदार-खासदारांची आहे. भगवंताच्या आशीर्वादाने हे घडून येईल,असे शहाजी बापू पाटील यांनी म्हटले होते.  

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाShiv Senaशिवसेना