शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

उद्धव ठाकरेंनी सोबत यावं, म्हणून आता त्यांच्या दारात जाणार नाही; यायचं असेल तर..., रावसाहेब दानवे स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2022 14:50 IST

"ज्या युतीला राज्यातील लोकांनी मतदान केले होते. त्याच्यासोबत  दगाफटका करून त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत संधान साधले आणि स्वतः मुख्यमंत्री बनले."

उद्धव ठाकरे यांनी आमच्या सोबत यावे की न यावे, हे बोलण्यासाठी काही आम्ही आता त्यांच्या दारात जाणार नाही. यायचे असेल, कुणीही येणार असेल, त्यांना मागच्या घटनेचा पश्चात्ताप झाला असेल, तर त्यांना यायला काही हरकत नाही. त्यांना येण्यासाठी आमची ना नाही. या आणि आमच्यासोबत राहा. पण जे सरकार आमचे चाललेय, त्यात डिस्टर्ब करू नका, असे भाजपचे नेते तथा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हणटले आहे. ते एका मराठी वृत्त वाहिनीशी बोलत होते.

राजकारणात कुणी कुणाचा कायमचा मित्र नाही आणि शत्रूही नाही -यावेळी, मैत्रिदिनाच्या पार्श्वभूमीवर, उद्धव ठाकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकत्र येण्यासंदर्भात बोलताना दानवे म्हणाले, राजकारणात कुणी कुणाचा कायमचा मित्र नाही आणि कुणीही कुणाचा कायमचा शत्रू नाही. उद्धव ठाकरे काही दिवस आमच्यासोबत होते. 25 वर्ष आम्ही एकत्र राहिलो. मात्र, 25 व्या वर्षी त्यांना वाटले, की भारतीय जनता पक्षासोबत राहून आपले नुकसान झाले. यामुळे त्यांनी आमची साथ सोडली. ज्या युतीला राज्यातील लोकांनी मतदान केले होते. त्याच्यासोबत  दगाफटका करून त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत संधान साधले आणि स्वतः मुख्यमंत्री बनले. ते आमचे मित्र होते. आता पूर्व मित्र झाले. 

तसेच, आता आम्ही नवीन मित्र जोडले आहेत, एकनाथ शिंदे. ते आज आमचे मित्र आहेत. मित्र, म्हणजेच मूळ शिवसेना आहे आणि आता आम्ही एकत्र सरकार स्थापन केले आहे. यामुळे, मैत्री दिनाच्या दिवशी एकमेकांना शुभेच्छा देताना अशाच शब्दांचा वापर करायला हवा. की समोरच्याला वाईट वाटू नये. असाच शब्द प्रयोग कुण्या एखाद्या शिंदे गटातील आमदाराने केला असले, तर त्याचा वेगळा अर्थ काढू नये, असेही दानवे यांनी म्हटले आहे. ते टीव्ही-9 सोबत बोलत होते.

उद्धव ठाकरे आणि शिंदेंनी एकत्र यावे -तत्पूर्वी, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र यावं. शिवसेना वाढवावी ही भावना प्रत्येक शिवसैनिकांची, पदाधिकारी आणि आमदार-खासदारांची आहे. भगवंताच्या आशीर्वादाने हे घडून येईल,असे शहाजी बापू पाटील यांनी म्हटले होते.  

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाShiv Senaशिवसेना