शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

..... तर असा देशद्रोह आम्ही रोजच करणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 6:10 PM

दिलेली आश्वासने पाळत का नाही असे विचारणे म्हणजे देशद्रोह ठरत असेल तर मग आम्ही असा देशद्रोह रोज करणार असे  सुकाणू समितीचे नेते साथी सुभाष लोमटे यांनी आज येथे स्पष्टपणे ठणकावले आहे.

ठळक मुद्देबाजू मांडण्यासाठी औरंगाबादचे सुकाणू समितीचे नेते पत्रपरिषदेत एकत्र आले. किती शेतक-यांचा सातबारा कोरा झाला, हे तरी सांगा, असे आवाहन लोमटे यांनी केले. जीवाणू उपयुक्त असतो. विषाणू बाधक असतो. हा फरक मुख्यमंत्र्यांनी जरा नीट समजून घेतला पाहिजे, असा सल्ला देसरडा यांनी दिला.

ऑनलाईन लोकमत 

औरंगाबाद, दि. 18 : पालकमंत्र्यांऐवजी शेतकरी, कष्टकरी वा स्वातंत्र्यसैनिक यांना ध्वजारोहण करु द्यावे असे आवाहन आम्ही केले होते. हा देशद्रोह होय असा जावईशोध मुख्यमंत्र्यांनी लावला आहे. दिलेली आश्वासने पाळत का नाही असे विचारणे म्हणजे देशद्रोह ठरत असेल तर मग आम्ही असा देशद्रोह रोज करणार असे  सुकाणू समितीचे नेते साथी सुभाष लोमटे यांनी आज येथे स्पष्टपणे ठणकावले आहे. 

काल मुख्यमंत्र्यांनी सुकाणू समिती जीवाणू आहे, ती राष्टद्रोही आहे, असे वक्तव्य केले होते. त्यावर आपली बाजू मांडण्यासाठी औरंगाबादचे सुकाणू समितीचे नेते पत्रपरिषदेत एकत्र आले. यावेळी कॉ. एच. एम. देसरडा, साथी अण्णा खंदारे, कॉ. उध्दव भवलकर, जनार्दन पिंपळे, कॉ. बुध्दप्रिय कबीर, मंगल ठोंबरे, कॉ. लक्ष्मण साक्रुडकर, अजमलखान  आदींची उपस्थिती होती. 

सुभाष लोमटे म्हणाले, स्वातंत्र्य सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण करा असे म्हणणे कसा काय देशद्रोह ठरु शकतो. मग लोकशाहीत सरकारला प्रश्न विचारायचे नाहीत का? जनतेचे प्रश्न उपस्थित करणे हा देशद्रोह ठरणार असेल तर मग असा देशद्रोह आम्हाला रोज करावा लागेल. उलट दिलेली आश्वासने न पाळने हा देशद्रोह होय. पण असा आरोप आम्ही करु इच्छित नाही. पण लोकशाहीत तुम्हाला आम्ही जाब विचारणार...उत्तरे देण्याची जवाबदारी तुमची आहे. जाब विचारण्याचा आमचा अधिकार तरी हिरावून घेऊ नका. 

सुकाणू समितीची ताकद नाही. नसेलही.मग मुख्यमंत्र्यांनी आमची दखल घेण्याचीही गरज नाही. मग ते का घेतात?  आम्ही शेतक-यांचा नेमका प्रश्न लावून धरतोय. या प्रश्नाची पुन्हा पुन्हा आठवण करुन देतोय, हेच त्यांना नकोय. रोज शेकतरी आत्महत्त्या करताहेत, मग किती शेतक-यांचा सातबारा कोरा झाला, हे तरी सांगा, असे आवाहन लोमटे यांनी केले. 

लोमटे यांनी सांगितले की, ध्वजारोहण रोखण्याची आमची भूमिका नव्हती. आणि सुकाणू समितीतर्फे कुठेही ध्वजारोहण रोखले गेले नाही. सुकाणू समितीत विविध जनसंघटना आहेत. काँग्रेस- राष्ट्रवादी नाहीत.  विरोधी पक्षाचे मत लोकशाहीत गाभा असतो, हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात घ्यावे.

जीवाणू उपयुक्त असतो. विषाणू बाधक असतो. सुकाणू समिती जीवाणू असे म्हणणा-या मुख्यमंत्र्यांनी हा फरक जरा नीट समजून घेतला पाहिजे, असा सल्ला देसरडा यांनी दिला. सध्याच्या सरकारची पाऊले छुप्या आणीबाणीकडे चालली आहेत. लोकशाहीचा संकोच होतोय, असे ते म्हणाले.