शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

शरद पवार, काँग्रेसच्या भूमिकेनंतर उद्धव ठाकरे गट मवाळ; CM पदाच्या चेहऱ्याचा हट्ट सोडला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 11:14 IST

निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा द्यावा, काँग्रेस राष्ट्रवादी जे नाव देईल त्याला मी पाठिंबा द्यायला तयार आहे असं विधान करत उद्धव ठाकरे सातत्याने आग्रहाची मागणी करत होते. 

मुंबई - महाविकास आघाडीने निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करावा. ज्याची संख्या जास्त त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र ठेवले तर त्यातून पाडापाडी होते असं सांगत उद्धव ठाकरेंनी जाहिरपणे महाविकास आघाडीच्या मेळाव्यात भाष्य केले होते. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित व्हावा अशी ठाकरे गटाची मागणी होती मात्र त्याला शरद पवार आणि काँग्रेसनं स्पष्ट नकार दिला. त्यानंतर आता ठाकरे गटाने मवाळ भूमिका घेत आमचं सर्वात आधी काम हे भ्रष्ट सरकार हटवणं आहे. मुख्यमंत्रिपदावर कधीही चर्चा होऊ शकते असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, जनतेच्या मनात जो चेहरा त्यालाच जनता मुख्यमंत्री बनवते. शरद पवारांचं विधान शतप्रतिशत ठीक आहे. तीन पक्षांची मिळून महाविकास आघाडी आहे. कोण किती जागा जिंकते त्यानंतर हे ठरवलं जाईल. परंतु महाविकास आघाडीला बहुमत मिळतंय. आमचं सर्वात आधी काम हे भ्रष्ट सरकार हटवणं हे आहे. आम्ही मुख्यमंत्रिपदावर कधीही चर्चा करू शकतो असं त्यांनी माध्यमांना सांगितले. त्यामुळे ठाकरे गटाने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करावा ही आग्रहाची मागणी काँग्रेस आणि शरद पवारांच्या भूमिकेनंतर सोडली अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

काय म्हणाले होते शरद पवार ?

कोल्हापूरात पत्रकारांशी पवारांनी संवाद साधला. तेव्हा मुख्यमंत्रिपदाबाबतच्या प्रश्नावर शरद पवारांनी उत्तर दिले की, मुख्यमंत्री चेहऱ्याबाबत आताच आग्रह धरण्यात काही अर्थ नाही. मुख्यमंत्रिपदाबाबतीत महाविकास आघाडी एकत्र बसून निर्णय घेईल. आकड्यांच्या आधारावर विधानसभा निवडणुकीननंतर महाविकास आघाडीचा कोण होणार हे ठरणार आहे. मुख्यमंत्री कोण? हे आता महत्त्वाचं नाही. सध्या महाविकास आघाडीला बहुमत मिळेल अशी स्थिती आहे. तसे वातावरण राज्यात आहे. तसेच, लोकांच्या पाठिंब्यानंतर एक स्थिर सरकार देणं महत्त्वाचं आहे. स्थिर सरकार देणं, हे आमचे उद्दिष्ट्य आहे", असे म्हणत संख्याबळ आल्यानंतर नेतृत्व कुणी करायचे, याचा निर्णय होईल अशी स्पष्ट भूमिका शरद पवारांनी घेतली आहे.

पवारांच्या भूमिकेला काँग्रेसचं समर्थन

शरद पवार चुकीचे काय बोलले, महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही निवडणुकीला पुढे जाणार आहोत. महाविकास आघाडीचं संख्याबळ आल्यानंतरच तिथे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवला जाईल. मविआच्या मेळाव्यात आम्ही उद्धव ठाकरेंच्या मागणीवर बोललोय. महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ असं सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी शरद पवारांच्या भूमिकेचं समर्थन केले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारcongressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४