शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
2
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
3
शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, ५६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; Infosys मध्ये घसरण, 'या' शेअर्समध्ये तेजी
4
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
5
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
6
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
7
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
8
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
9
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
10
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
11
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
12
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
13
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
14
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
15
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
16
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
17
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
18
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
19
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
20
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत

"आदित्य ठाकरेंनी कुठून लढायचं ते आम्ही ठरवू, महाराष्ट्र त्यांचा.." - अंबादास दानवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2024 18:19 IST

आदित्य ठाकरे यांनी आता भिवंडीतून लढावं अशी टीका शिवसेना नेत्यांकडून होत होती. त्यावर अंबादास दानवेंनी पलटवार केला आहे. 

मुंबई - शिवसेना एकच आहे, ही गद्दारांची सेना आहे. स्वत:चं अपयश लपवण्यासाठी मुर्खाच्या नंदनवनात राहणारे टीका करतायेत. काँग्रेसच्या मतांवर निवडून आलो असतो तर मागील वेळी काँग्रेसचा १ खासदार निवडून आला होता. आता १३ खासदार निवडून आलेत. त्यामुळे मानसशास्त्रात याला आंबट गोड प्रतिक्रिया म्हणतात. काँग्रेसच्या मतांवर आम्ही निवडून आलो असं कुणी म्हणत असेल तर त्यांनी त्यांच्या उन्मादातच राहावे अशी टीका ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केली आहे.

अंबादास दानवे म्हणाले की,  आदित्य ठाकरेंनी कुठून लढायचं हे आम्ही ठरवू. तुम्हाला तुमच्या जागा निवडून आणण्यासाठी काय काय आटापिटा करावा लागला, किती नोटांचे खोके काढावे लागले. रात्री बेरात्री कोणाकोणाला भेटावे लागले, किती गुंडाची मदत घ्यावी लागली याचाही हिशोब द्यावा. भिवंडीतून लढा, वरळीतून लढा, कुठून लढायचे ते लढतील. महाराष्ट्र त्यांचा आहे. त्यामुळे सल्ले देण्याची आवश्यकता नाही. तुम्ही तुमच्या जागा वाचवा. निव्वळ पैशाच्या ताकदीवर तुम्ही जिंकत असाल तर ही तुमची सूज आहे. ज्यादिवशी तुमचे पैसे संपतील तेव्हा कुत्रंही विचारणार नाही असं त्यांनी सांगितले. 

तसेच ज्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई प्रलंबित आहे. विधानसभा अध्यक्षांनी एकांगी भूमिका घेतली, सुप्रीम कोर्टात प्रलंबित असताना आमदारांना मतदानाचा अधिकार आहे का? उद्या यातून कुणी निवडून आले तर त्या ११ जणांचे भवितव्य काय? कायदेशीर सल्ला घेऊन विधान परिषदेच्या ११ जागांबाबत निर्णय घेऊ. महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही लढू. निवडणुकीला बराच काळ आहे उमेदवार कोण यावर चर्चा होईल असं दानवेंनी म्हटलं.

दरम्यान, माध्यमे एकांगी बाजूने भूमिका घेतो, नाना पटोलेंचा फोन घेतला नाही म्हणून माध्यमांनी हलकल्लोळ माजवला. आज महायुती पदवीधर, शिक्षक मतदारसंघात ३ उमेदवार आहेत. हे असतानाही प्रसार माध्यमे महायुती ३ बाजूला ३ ओढतायेत. रामदास कदम उघड उघड बोलतायेत. प्रकाश आंबेडकर यांना भाजपाची बी टीम अशाप्रकारेच लोक संबोधतात आणि ओळखतात. ते जर आमच्यासोबत असते तर निकालाचे चित्र आणखी वेगळे असते. भाजपाचे लोक बोलत होते, आम्हाला ४०० जागा द्या, घटना बदलायचीय. हिंदु राष्ट्र बनवू अशी विधाने भाजपा नेतेच करत होते. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना भाजपाला बदलायची आहे आणि अजूनही तेच मनसुबे आहेत असा आरोप अंबादास दानवेंनी भाजपावर केला. 

तुमचा उमेदवार नाही, जागा नाही...

काही बिनशर्ट पाठिंबा त्यावर टीका केली, तुमची एकही जागा नाही, तुमचा उमेदवार नाही. बरं, विधानसभेला तुम्ही २२५ जागा लढवणार बोलता, तुम्ही पाठिंबा ज्याला दिला होता त्याचं झालं काय? हा हिशोब दिला पाहिजे. उद्धव ठाकरेंनी कुणाचं नाव घेतलं नव्हतं. बिनशर्त पाठिंबा असे अनेक लोक देत असतात. त्यामुळे बिनशर्ट पाठिंबा म्हटले असतील असा खोचक टोला दानवेंनी राज ठाकरेंना लगावला.  

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेShiv SenaशिवसेनाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरRaj Thackerayराज ठाकरे