शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

"जे राजकारण सुरू आहे ते बाजूला ठेवून महाराष्ट्राचा विकास कसा करायचा याची खबरदारी घ्यायचीय"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2021 19:03 IST

Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेताना केले. 

पालघर - बुलेट ट्रेन... हायवे... कॉरिडॉर ट्रेनच्या नावावर इथल्या लोकांनी बऱ्याच गोष्टी गमावल्या आहेत. राज्यात सुरू असलेल्या राजकारणाकडे दुर्लक्ष करून आपण लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करायची आहे. त्यामुळे आपल्या महाराष्ट्राचा विकास कसा करायचा याची खबरदारी घ्यायची आहे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेताना केले. 

पालघरचा हा शेवटचा भाग मोठ्या उत्साहाने कार्यकर्ते या उपक्रमात सहभागी झाले आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे पदाधिकाऱ्यांमध्ये शिस्तबद्धता आहे. पवारसाहेबांवर प्रेम असणारे अनेक लोक या भागात आहे, पवारसाहेबांशी निष्ठा असणारी अनेक घरं या भागात आहे. लोकांचा सगळ्यात जास्त पाठिंबा असलेला नेता आपल्या पक्षाचा मार्गदर्शक आहे. त्यामुळे पवारसाहेबांच्या व्यक्तीमत्वाला साजेसा पक्ष आपल्याला येत्या काळात तयार करायचा आहे असेही जयंत पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. 

विक्रमगडवासियांनी सुनील भुसारा यांना आपली सेवा करण्याची संधी दिली आहे. भुसाराही आपली जबाबदारी चोख बजावत आहेत. तुमच्या मतदारसंघासाठी निधी खेचून आणत आहेत. भूसारा हा 'आपला माणूस' आहे, या आपल्या माणसाच्या मागे भक्कम उभे रहा असे आवाहन जयंत पाटील यांनी केले. या भागात मोठ्या संख्येने महिला भगिनी सहभागी झाल्या. बऱ्याच स्थानिक ठिकाणी महिला लोकांचे प्रतिनिधित्वही करत आहे. हे चित्र फार आशादायक आहे. ही परिस्थिती अधिक सुधारावी म्हणून येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस आदिवासी विभाग काढून आदिवासी बांधवांच्या प्रश्नांना या विभागामार्फत न्याय दिला जाईल अशी घोषणाही जयंत पाटील यांनी यावेळी केली. 

आपल्या आमदारकीच्या माध्यमातून सुनील भुसारा यांनी या भागाचा विकास करायला हवा, इथं पर्यटनाच्यादृष्टीने बऱ्याच गोष्टी करता येतील. त्या गोष्टी करून इथल्या स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत असे सांगतानाच त्यामुळे आपले तरुण उद्याचा पक्षाचा दुवा बनतील अशी खात्री गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली. 

संघटना चांगली आहे म्हणून विक्रमगड येथे आपण विजय खेचून आणला आहे. पक्षाचा जम अधिक बसावा यासाठी आपण ही परिवार संवाद यात्रा असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. आपण एकाच परिवाराचा भाग आहोत पण आपण नियमित भेटत नाही. त्यामुळे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यात समन्वय साधण्यासाठी ही संवाद यात्रा असल्याचेही जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलMaharashtraमहाराष्ट्र