शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

"जे राजकारण सुरू आहे ते बाजूला ठेवून महाराष्ट्राचा विकास कसा करायचा याची खबरदारी घ्यायचीय"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2021 19:03 IST

Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेताना केले. 

पालघर - बुलेट ट्रेन... हायवे... कॉरिडॉर ट्रेनच्या नावावर इथल्या लोकांनी बऱ्याच गोष्टी गमावल्या आहेत. राज्यात सुरू असलेल्या राजकारणाकडे दुर्लक्ष करून आपण लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करायची आहे. त्यामुळे आपल्या महाराष्ट्राचा विकास कसा करायचा याची खबरदारी घ्यायची आहे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेताना केले. 

पालघरचा हा शेवटचा भाग मोठ्या उत्साहाने कार्यकर्ते या उपक्रमात सहभागी झाले आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे पदाधिकाऱ्यांमध्ये शिस्तबद्धता आहे. पवारसाहेबांवर प्रेम असणारे अनेक लोक या भागात आहे, पवारसाहेबांशी निष्ठा असणारी अनेक घरं या भागात आहे. लोकांचा सगळ्यात जास्त पाठिंबा असलेला नेता आपल्या पक्षाचा मार्गदर्शक आहे. त्यामुळे पवारसाहेबांच्या व्यक्तीमत्वाला साजेसा पक्ष आपल्याला येत्या काळात तयार करायचा आहे असेही जयंत पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. 

विक्रमगडवासियांनी सुनील भुसारा यांना आपली सेवा करण्याची संधी दिली आहे. भुसाराही आपली जबाबदारी चोख बजावत आहेत. तुमच्या मतदारसंघासाठी निधी खेचून आणत आहेत. भूसारा हा 'आपला माणूस' आहे, या आपल्या माणसाच्या मागे भक्कम उभे रहा असे आवाहन जयंत पाटील यांनी केले. या भागात मोठ्या संख्येने महिला भगिनी सहभागी झाल्या. बऱ्याच स्थानिक ठिकाणी महिला लोकांचे प्रतिनिधित्वही करत आहे. हे चित्र फार आशादायक आहे. ही परिस्थिती अधिक सुधारावी म्हणून येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस आदिवासी विभाग काढून आदिवासी बांधवांच्या प्रश्नांना या विभागामार्फत न्याय दिला जाईल अशी घोषणाही जयंत पाटील यांनी यावेळी केली. 

आपल्या आमदारकीच्या माध्यमातून सुनील भुसारा यांनी या भागाचा विकास करायला हवा, इथं पर्यटनाच्यादृष्टीने बऱ्याच गोष्टी करता येतील. त्या गोष्टी करून इथल्या स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत असे सांगतानाच त्यामुळे आपले तरुण उद्याचा पक्षाचा दुवा बनतील अशी खात्री गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली. 

संघटना चांगली आहे म्हणून विक्रमगड येथे आपण विजय खेचून आणला आहे. पक्षाचा जम अधिक बसावा यासाठी आपण ही परिवार संवाद यात्रा असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. आपण एकाच परिवाराचा भाग आहोत पण आपण नियमित भेटत नाही. त्यामुळे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यात समन्वय साधण्यासाठी ही संवाद यात्रा असल्याचेही जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलMaharashtraमहाराष्ट्र