शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

रामदास कदमांची भाजपावर आगपाखड; "तुमच्यावर विश्वास ठेवून आम्ही आलोय, पण तुम्ही..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 11:03 IST

जेव्हा लोकसभेच्या उमेदवारी जाहीर होतील तेव्हा माझे वैयक्तिक मत काय आहे हे मांडेन असं सांगत कदमांनी भाजपाला थेट इशारा दिला आहे. 

मुंबई - Ramdas Kadam on BJP ( Marathi News ) महाराष्ट्रात आम्ही शिवसेना-राष्ट्रवादी असो. मोदी-शाह यांच्या कामावर विश्वास ठेऊन सोबत आलोय. आमचा विश्वासघात होणार नाही याची दक्षता भाजपाने घेणे आवश्यक आहे. मोदी-शाह यांनी महाराष्ट्रातील काही नेत्यांचे कान पकडले पाहिजेत अशा शब्दात शिवसेना नेते रामदास कदम यांनी राज्यातील भाजपा नेत्यांना फटकारलं आहे. 

रामदास कदम म्हणाले की, ज्या आमच्या विद्यमान जागा आहेत तिथे काही भाजपाच्या मंडळी आम्हीच उमेदवार आहोत असं सांगतायेत. तालुक्यात, मतदारसंघनिहाय जातात तिथे हे सुरू आहे ही माझी खंत आहे. रत्नागिरी, रायगड, मावळ, संभाजीनगर याठिकाणी हे सुरू आहे. हे जे चाललंय ते महाराष्ट्र भाजपाच्या माध्यमातून घृणास्पद सुरू आहे. मोदी-शाह यांनी महाराष्ट्रातील काही नेत्यांचे कान पकडले पाहिजेत. प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवायचा आहे. परंतु तुमच्यावर विश्वास ठेवून जी लोक आलेत त्यांचा केसाने गळा कापू नका. भविष्यात तुम्ही यातून वेगळा संदेश महाराष्ट्राला देताय याचे भान भाजपाच्या लोकांना असणे गरजेचे आहे असंही कदमांनी म्हटलं. 

तसेच मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाने उघडपणे राष्ट्रवादीला मतदान केले. युती असतानाही गुहागरमध्ये मला भाजपाने पाडले. आम्ही इतका मोठा निर्णय घेतला, विश्वासाने भाजपासोबत आलो म्हणून मंत्रिमंडळ झाले. आता माझ्या मुलाच्या मतदारसंघात भाजपाचे चव्हाण आणि त्यांचे सहकारी निधी आणून भूमिपूजन करून स्थानिक आमदाराला बाजूला ठेवतायेत. हेतूपुरस्पर त्रास दिला जातोय असा आरोप रामदास कदमांनी केला. 

दरम्यान, हे असेच सुरू राहिले तर भविष्यात भाजपावर कुणी विश्वास ठेवणार नाही. याची दखल भाजपाच्या वरिष्ठ पातळीवर घेतली पाहिजे. मोदी-शाह यांच्यावर विश्वास ठेऊन आम्ही आलोय. मागच्यावेळी काय झाले ते झालं, पण पुन्हा पुन्हा आमचा विश्वासघात झाला तर माझेही नाव रामदास कदम आहे. मीदेखील शिवसेनेचा नेता म्हणून २५ वर्ष काम करतोय. अधिक आज बोलणार नाही. जेव्हा लोकसभेच्या उमेदवारी जाहीर होतील तेव्हा माझे वैयक्तिक मत काय आहे हे मांडेन असं सांगत कदमांनी भाजपाला थेट इशारा दिला आहे. 

एकनाथ शिंदेमुळे उद्धव ठाकरे बाहेर पडले

शिवसेनाप्रमुखाच्या पोटी नालायक मुलगा जन्माला याची खंत आज महाराष्ट्राला आहे. आज ते एकनाथ शिंदेंमुळे बाहेर पडले. कुणी त्यांना विचारणार नाही. आधी ते बाहेर पडत नव्हते, कुणाला भेटत नव्हते. मुख्यमंत्री असतानाही मंत्रालयात जात नव्हते. पण एकनाथ शिंदेंनी त्यांना जबरदस्तीने बाहेर पडायला लागले. परंतु येत्या लोकसभेत पुन्हा एकदा मोठ्या फरकाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात खासदार निवडून येतील यामध्ये कुणाच्या मनात शंका नाही असंही कदमांनी सांगितले. 

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना