शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

'आधार' नको हो, मुलांचं पोट भरण्यासाठी आम्हाला रेशनकार्ड हवंय!; आंदोलक शेतकऱ्यांची व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2018 12:32 IST

केंद्रातील मोदी सरकार सगळ्या गोष्टी आधार कार्डाशी जोडतंय, पण आम्हाला त्याचा काहीच फायदा नाही.

मुंबई- केंद्रातील मोदी सरकार सगळ्या गोष्टी आधार कार्डाशी जोडतंय, पण आम्हाला त्याचा काहीच फायदा नाही. त्यापेक्षा आजोबांच्या काळापासून चालत आलेलं रेशनकार्ड बदलून नवं दिलं तर आमची पोरं दोन घास जेवू शकतील, अशी व्यथा किसान लाँग मार्चमधील शेतकऱ्यांनी मांडली.

आपल्या विविध मागण्यांसाठी नाशिकहून चालत निघालेले हजारो शेतकरी आज पहाटे आझाद मैदानात धडकलेत. त्यात आदिवासी शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय आहे आणि त्यांच्या दोन मागण्या अत्यंत ज्वलंत आहेत. कर्जमाफी, हमीभाव त्यांनाही हवा आहेच, पण त्यापेक्षाही कसतो त्या जमिनीचा हक्क आणि रेशनकार्डासाठी ते या लढ्यात उतरलेत.

३० वर्षांपूर्वी आजोबांच्या नावाने मिळालेल्या एकाच रेशनकार्डवर पुढच्या तीन पिढ्यांची नावं आहेत. त्यामुळे आम्हाला बीपीएलच्या (दारिद्र्यरेषेखालील) सवलतींचा लाभ मिळत नाही. रेशनकार्डावरील एकाच व्यक्तीला-कुटुंबाला रेशन, केरोसिन दिलं जातं. मग आमच्या कुटुंबाचं पोट कसं भरणार?, असा जीवनमरणाचा प्रश्न सुरगण्याहून आलेल्या सुरेश कोल्हे या शेतकऱ्यानं विचारला. आज अनेक कुटुंब स्वतंत्र राहतात. पाच-सहा भावांची वेगळी घरं आहेत. आमच्याकडे आधार कार्ड आहे, जनधन खातंही उघडलंय, पण रेशन कार्ड नसल्यानं आदिवासींना मिळणाऱ्या सुविधा आम्हाला मिळत नाहीत, त्याचा सरकारने गंभीरपणे विचार करावा, असं ते म्हणाले. सुरेश कोल्हे यांच्यावर १५ हजार रुपयांचं कर्ज आहे. ते आपल्या शेतात नागली, तूर, तांदूळ पिकवतात, पण निसर्गाच्या कृपेवरच बरंच काही अवलंबून असतं. त्यामुळे हे छोटंसं कर्ज माफ करावं आणि रेशन कार्ड द्यावं, ही त्यांची प्रातिनिधिक मागणी आहे.

टॅग्स :Kisan Sabha Long Marchकिसान सभा लाँग मार्चMaharashtraमहाराष्ट्र