शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

'आधार' नको हो, मुलांचं पोट भरण्यासाठी आम्हाला रेशनकार्ड हवंय!; आंदोलक शेतकऱ्यांची व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2018 12:32 IST

केंद्रातील मोदी सरकार सगळ्या गोष्टी आधार कार्डाशी जोडतंय, पण आम्हाला त्याचा काहीच फायदा नाही.

मुंबई- केंद्रातील मोदी सरकार सगळ्या गोष्टी आधार कार्डाशी जोडतंय, पण आम्हाला त्याचा काहीच फायदा नाही. त्यापेक्षा आजोबांच्या काळापासून चालत आलेलं रेशनकार्ड बदलून नवं दिलं तर आमची पोरं दोन घास जेवू शकतील, अशी व्यथा किसान लाँग मार्चमधील शेतकऱ्यांनी मांडली.

आपल्या विविध मागण्यांसाठी नाशिकहून चालत निघालेले हजारो शेतकरी आज पहाटे आझाद मैदानात धडकलेत. त्यात आदिवासी शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय आहे आणि त्यांच्या दोन मागण्या अत्यंत ज्वलंत आहेत. कर्जमाफी, हमीभाव त्यांनाही हवा आहेच, पण त्यापेक्षाही कसतो त्या जमिनीचा हक्क आणि रेशनकार्डासाठी ते या लढ्यात उतरलेत.

३० वर्षांपूर्वी आजोबांच्या नावाने मिळालेल्या एकाच रेशनकार्डवर पुढच्या तीन पिढ्यांची नावं आहेत. त्यामुळे आम्हाला बीपीएलच्या (दारिद्र्यरेषेखालील) सवलतींचा लाभ मिळत नाही. रेशनकार्डावरील एकाच व्यक्तीला-कुटुंबाला रेशन, केरोसिन दिलं जातं. मग आमच्या कुटुंबाचं पोट कसं भरणार?, असा जीवनमरणाचा प्रश्न सुरगण्याहून आलेल्या सुरेश कोल्हे या शेतकऱ्यानं विचारला. आज अनेक कुटुंब स्वतंत्र राहतात. पाच-सहा भावांची वेगळी घरं आहेत. आमच्याकडे आधार कार्ड आहे, जनधन खातंही उघडलंय, पण रेशन कार्ड नसल्यानं आदिवासींना मिळणाऱ्या सुविधा आम्हाला मिळत नाहीत, त्याचा सरकारने गंभीरपणे विचार करावा, असं ते म्हणाले. सुरेश कोल्हे यांच्यावर १५ हजार रुपयांचं कर्ज आहे. ते आपल्या शेतात नागली, तूर, तांदूळ पिकवतात, पण निसर्गाच्या कृपेवरच बरंच काही अवलंबून असतं. त्यामुळे हे छोटंसं कर्ज माफ करावं आणि रेशन कार्ड द्यावं, ही त्यांची प्रातिनिधिक मागणी आहे.

टॅग्स :Kisan Sabha Long Marchकिसान सभा लाँग मार्चMaharashtraमहाराष्ट्र