शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
4
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
5
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
6
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
7
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
8
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
9
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
10
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
11
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
12
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
13
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
14
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
15
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
16
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
17
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
18
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
19
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
20
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...

Sanjay Raut उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना टाळी?; संजय राऊतांचं सूचक विधान, मनसेला दिला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 12:56 IST

सातत्याने भूमिका बदलणारे अनेक पक्ष महाराष्ट्रात आहेत. आधी त्यांनी भूमिका स्पष्ट करावी असं राऊत यांनी सांगितले.

नवी दिल्ली - भाजपाला मदत होण्यासाठी MIM असेल वा अन्य काही पक्ष असतील, काही आघाड्या असतील त्यांचा गेल्या १० वर्षातील राजकीय कार्यक्रम आहे. हुकुमशाहीविरोधात बोलायचे, केंद्रातील सरकारला शिव्या घालायच्या आणि जेव्हा काही करण्याची, लढण्याची वेळ आली तेव्हा वेगळी भूमिका घ्यायची असं देशातील आणि राज्यातील काही संघटना आणि पक्ष भूमिका घेतात. खरेतर ही वेळ देश वाचविण्याचीलोकशाही वाचविण्याची आहे. अशावेळी सर्व मतभेद विसरून आपण सगळ्यांनी एकत्र यावे आणि लोकशाहीचे रक्षण करावे अशी भूमिका घ्यायला पाहिजे या मताचे आम्ही आहोत असं सांगत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंबाबत विचारलेल्या प्रश्नावर सूचक विधान केले. 

मनसे २२ लोकसभा जागांवर तयारी करत आहे त्यावर पत्रकारांनी राऊतांना प्रश्न विचारला. त्यावर खासदार संजय राऊत म्हणाले की, भाजपा आज जो उभा आहे तो फोडा, झोडा आणि राज्य करा या रणनीतीवर उभा आहे.निदान महाराष्ट्रातील नेत्यांनी शहाणपणाने वागावे ही आमची भूमिका आहे. हुकुमशाहीविरोधात लढण्याची तुमची मानसिक तयारी किती आहे यावर भूमिका स्पष्ट केली पाहिजे. सातत्याने भूमिका बदलणारे अनेक पक्ष महाराष्ट्रात आहेत. आधी त्यांनी भूमिका स्पष्ट करावी. देशात लोकशाही टिकली पाहिजे. महाराष्ट्र अखंड राहिला पाहिजे आणि मुंबईसह महाराष्ट्राची जी काही विक्री, दलाली सुरू आहे त्याविरोधात आम्ही एक मराठी म्हणून ठामपणे उभे राहणार आहोत याबाबत कुणी ठाम भूमिका व्यक्त केली तर आम्ही त्यांच्याकडे आशेने पाहू शकतो असं राज ठाकरेंबाबत संजय राऊत म्हणाले. 

शर्मिला ठाकरेंचे मानले आभार 

दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरेंवर जो आरोप केला जातोय त्यावर राज्य सरकारनं एसआयटी नेमली आहे. यावर आदित्य असं काही करेल वाटत नाही हे विधान राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी केले होते. त्यावर राऊतांनी शर्मिला ठाकरेंचे आभार मानले. आदित्य ठाकरेंवर सगळ्यांचा विश्वास आहे.भाजपाने आमच्यावर आणि आदित्यवर कितीही आरोप केले तरीसुद्धा अशा घाणेरड्या आरोपांवर कुणीही विश्वास ठेवणार नाही. मी शर्मिला ठाकरे यांचा आभारी आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं. 

दरम्यान, धारावीत जो लाखो लोकांचा विराट मोर्चा निघाला त्यात केवळ धारावीतूनच नव्हे तर संपूर्ण मुंबईतून लोक एकटवले होते. कार्यकर्त्यांचा मोर्चा होता अजून जनता रस्त्यावर उतरायची आहे. मुंबईचा सौदा सुरू आहे आणि हा सौदा शिवसेना होऊ देणार नाही. मुंबईसह महाराष्ट्र निर्माण व्हावा यासाठी संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभा राहिला होता. मुंबईचे महाराष्ट्रात रक्षण करण्यासाठी बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली हे ऐतिहासिक सत्य आहे. त्यामुळे कुणी शिवसेना आमच्यापासून ओरबडण्याचा प्रयत्न करत असेल तर शिवसेना महाराष्ट्र धर्म म्हणून रस्त्यावर उतरणारच असंही संजय राऊतांनी स्पष्ट सांगितले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतRaj Thackerayराज ठाकरेBJPभाजपाMNSमनसेUddhav Thackerayउद्धव ठाकरे