शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

Sanjay Raut उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना टाळी?; संजय राऊतांचं सूचक विधान, मनसेला दिला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 12:56 IST

सातत्याने भूमिका बदलणारे अनेक पक्ष महाराष्ट्रात आहेत. आधी त्यांनी भूमिका स्पष्ट करावी असं राऊत यांनी सांगितले.

नवी दिल्ली - भाजपाला मदत होण्यासाठी MIM असेल वा अन्य काही पक्ष असतील, काही आघाड्या असतील त्यांचा गेल्या १० वर्षातील राजकीय कार्यक्रम आहे. हुकुमशाहीविरोधात बोलायचे, केंद्रातील सरकारला शिव्या घालायच्या आणि जेव्हा काही करण्याची, लढण्याची वेळ आली तेव्हा वेगळी भूमिका घ्यायची असं देशातील आणि राज्यातील काही संघटना आणि पक्ष भूमिका घेतात. खरेतर ही वेळ देश वाचविण्याचीलोकशाही वाचविण्याची आहे. अशावेळी सर्व मतभेद विसरून आपण सगळ्यांनी एकत्र यावे आणि लोकशाहीचे रक्षण करावे अशी भूमिका घ्यायला पाहिजे या मताचे आम्ही आहोत असं सांगत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंबाबत विचारलेल्या प्रश्नावर सूचक विधान केले. 

मनसे २२ लोकसभा जागांवर तयारी करत आहे त्यावर पत्रकारांनी राऊतांना प्रश्न विचारला. त्यावर खासदार संजय राऊत म्हणाले की, भाजपा आज जो उभा आहे तो फोडा, झोडा आणि राज्य करा या रणनीतीवर उभा आहे.निदान महाराष्ट्रातील नेत्यांनी शहाणपणाने वागावे ही आमची भूमिका आहे. हुकुमशाहीविरोधात लढण्याची तुमची मानसिक तयारी किती आहे यावर भूमिका स्पष्ट केली पाहिजे. सातत्याने भूमिका बदलणारे अनेक पक्ष महाराष्ट्रात आहेत. आधी त्यांनी भूमिका स्पष्ट करावी. देशात लोकशाही टिकली पाहिजे. महाराष्ट्र अखंड राहिला पाहिजे आणि मुंबईसह महाराष्ट्राची जी काही विक्री, दलाली सुरू आहे त्याविरोधात आम्ही एक मराठी म्हणून ठामपणे उभे राहणार आहोत याबाबत कुणी ठाम भूमिका व्यक्त केली तर आम्ही त्यांच्याकडे आशेने पाहू शकतो असं राज ठाकरेंबाबत संजय राऊत म्हणाले. 

शर्मिला ठाकरेंचे मानले आभार 

दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरेंवर जो आरोप केला जातोय त्यावर राज्य सरकारनं एसआयटी नेमली आहे. यावर आदित्य असं काही करेल वाटत नाही हे विधान राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी केले होते. त्यावर राऊतांनी शर्मिला ठाकरेंचे आभार मानले. आदित्य ठाकरेंवर सगळ्यांचा विश्वास आहे.भाजपाने आमच्यावर आणि आदित्यवर कितीही आरोप केले तरीसुद्धा अशा घाणेरड्या आरोपांवर कुणीही विश्वास ठेवणार नाही. मी शर्मिला ठाकरे यांचा आभारी आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं. 

दरम्यान, धारावीत जो लाखो लोकांचा विराट मोर्चा निघाला त्यात केवळ धारावीतूनच नव्हे तर संपूर्ण मुंबईतून लोक एकटवले होते. कार्यकर्त्यांचा मोर्चा होता अजून जनता रस्त्यावर उतरायची आहे. मुंबईचा सौदा सुरू आहे आणि हा सौदा शिवसेना होऊ देणार नाही. मुंबईसह महाराष्ट्र निर्माण व्हावा यासाठी संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभा राहिला होता. मुंबईचे महाराष्ट्रात रक्षण करण्यासाठी बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली हे ऐतिहासिक सत्य आहे. त्यामुळे कुणी शिवसेना आमच्यापासून ओरबडण्याचा प्रयत्न करत असेल तर शिवसेना महाराष्ट्र धर्म म्हणून रस्त्यावर उतरणारच असंही संजय राऊतांनी स्पष्ट सांगितले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतRaj Thackerayराज ठाकरेBJPभाजपाMNSमनसेUddhav Thackerayउद्धव ठाकरे