शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

वनस्पतींसह प्राण्यांच्या काही प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 06:26 IST

धिवासावर झालेले आक्रमण, नव्याने प्रचलित झालेल्या प्रजातींचे अतिक्रमण, प्रदूषण, जागतिक स्तरावरील हवामानात होणारे बदल, प्रजातींचे अतिशोषण, वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासातील मानवी हस्तक्षेप आदींमुळे जैवविविधतेची हानी होत आहे.

- सचिन लुंगसेमुंबई : अधिवासावर झालेले आक्रमण, नव्याने प्रचलित झालेल्या प्रजातींचे अतिक्रमण, प्रदूषण, जागतिक स्तरावरील हवामानात होणारे बदल, प्रजातींचे अतिशोषण, वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासातील मानवी हस्तक्षेप आदींमुळे जैवविविधतेची हानी होत आहे. यामुळे येत्या २५ वर्षांत पृथ्वीवरील प्रजातींपैकी २ ते ८ टक्के प्रजाती नामशेष होतील, अशी भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केल्याचे माहिम येथील महाराष्ट्र निसर्ग उद्यानाने केलेल्या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.महाराष्ट्र निसर्ग उद्यानाने जैवविविधतेचा आढावा घेत वनस्पतींसह वन्यप्राणी नामशेष होण्याच्या घटकांचा अभ्यास करीत प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, वाढत्या लोकसंख्येमुळे वने, गवताळ प्रदेश, कुरणे, पाणथळ प्रदेशांचे रूपांतर शेत जमीन व वसाहतींमध्ये वेगाने होत आहे. परिणामी, परिसंस्थांचे क्षेत्र कमी होत असून, प्रजातींच्या संगठनेत बदल होत आहे.वाघांच्या संख्येत घटजमिनीच्या वापरातील बदल हे प्रमुख कारण चित्ता नामशेष होण्याचे आहे.वनक्षेत्राचा वापर अन्य कारणांसाठी होत असल्याने वाघांच्या संख्येत घट होत आहे.दक्षिण भारतातील हत्तींचा अधिवास किमान १० टक्क्यांनी कमी झाला आहे.औषध तयार करीत असलेल्या उद्योगांकडून वाढत्या मागणीमुळे औषधी वनस्पती धोक्यात येत आहेत.विकास प्रकल्प जंगलांच्या मुळावरविकास प्रकल्पांमुळे वने, जंगले नष्ट होत असून, १९५१ ते १९८० या काळात देशात अंदाजे ५ लाख हेक्टर वनक्षेत्राचे रूपांतर नदी प्रकल्पांत करण्यात आले. परिणामी, वनक्षेत्रे पाण्याखाली गेली. नदीच्या पाणलोट क्षेत्रापैकी ६० टक्के क्षेत्र खंडित झाले आहेमानवामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यातग्रामीण आणि नागरी परिसरात होणारे बिबट्याचे हल्ले, रानडुकरे व काळविटांमुळे होणारे पिकांचे नुकसान ही अस्तित्वासाठी प्राण्यांकडून सुरू असलेली धडपड आहे. मानव आणि प्राण्यांमधील हा संघर्ष वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासातील मानवी हस्तक्षेपामुळे उत्पन्न होतो.- युवराज पाटील, साहाय्यक कार्यक्रम अधिकारी, महाराष्ट्र निसर्ग उद्यान, माहिमशहरी विभागातील तलाव किंवा तळी या पाणथळीच्या जागा घरे बांधण्यासह व्यापारी प्रकल्पासाठी वापरण्यात येत आहेत. त्यामुळे पाणथळ क्षेत्र धोक्यात आले आहे. शेती, रस्ते, वसाहती, उद्योगधंदे, जलविद्युत केंद्रांसह अन्य प्रकल्प जैवविविधतेने समृद्ध क्षेत्रात सुरू झाल्याने प्रजातींचे विभाजन होत आहे. इमारतींसाठीचे लाकूड, ठिसूळ लाकूड मिळविण्यासाठी नैसर्गिक वनांचे रूपांतर नीलगिरी, सिल्व्हर ओकच्या एकपीक पद्धतीच्या लागवडीत झाले आहे. माती, पाणी आणि वातावरणातील प्रदूषणामुळे संवेदनशील प्रजातींची संख्या घटत आहे; स्थानिक स्तरावर त्या लोप पावत आहेत.

टॅग्स :wildlifeवन्यजीव