शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

वनस्पतींसह प्राण्यांच्या काही प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 06:26 IST

धिवासावर झालेले आक्रमण, नव्याने प्रचलित झालेल्या प्रजातींचे अतिक्रमण, प्रदूषण, जागतिक स्तरावरील हवामानात होणारे बदल, प्रजातींचे अतिशोषण, वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासातील मानवी हस्तक्षेप आदींमुळे जैवविविधतेची हानी होत आहे.

- सचिन लुंगसेमुंबई : अधिवासावर झालेले आक्रमण, नव्याने प्रचलित झालेल्या प्रजातींचे अतिक्रमण, प्रदूषण, जागतिक स्तरावरील हवामानात होणारे बदल, प्रजातींचे अतिशोषण, वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासातील मानवी हस्तक्षेप आदींमुळे जैवविविधतेची हानी होत आहे. यामुळे येत्या २५ वर्षांत पृथ्वीवरील प्रजातींपैकी २ ते ८ टक्के प्रजाती नामशेष होतील, अशी भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केल्याचे माहिम येथील महाराष्ट्र निसर्ग उद्यानाने केलेल्या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.महाराष्ट्र निसर्ग उद्यानाने जैवविविधतेचा आढावा घेत वनस्पतींसह वन्यप्राणी नामशेष होण्याच्या घटकांचा अभ्यास करीत प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, वाढत्या लोकसंख्येमुळे वने, गवताळ प्रदेश, कुरणे, पाणथळ प्रदेशांचे रूपांतर शेत जमीन व वसाहतींमध्ये वेगाने होत आहे. परिणामी, परिसंस्थांचे क्षेत्र कमी होत असून, प्रजातींच्या संगठनेत बदल होत आहे.वाघांच्या संख्येत घटजमिनीच्या वापरातील बदल हे प्रमुख कारण चित्ता नामशेष होण्याचे आहे.वनक्षेत्राचा वापर अन्य कारणांसाठी होत असल्याने वाघांच्या संख्येत घट होत आहे.दक्षिण भारतातील हत्तींचा अधिवास किमान १० टक्क्यांनी कमी झाला आहे.औषध तयार करीत असलेल्या उद्योगांकडून वाढत्या मागणीमुळे औषधी वनस्पती धोक्यात येत आहेत.विकास प्रकल्प जंगलांच्या मुळावरविकास प्रकल्पांमुळे वने, जंगले नष्ट होत असून, १९५१ ते १९८० या काळात देशात अंदाजे ५ लाख हेक्टर वनक्षेत्राचे रूपांतर नदी प्रकल्पांत करण्यात आले. परिणामी, वनक्षेत्रे पाण्याखाली गेली. नदीच्या पाणलोट क्षेत्रापैकी ६० टक्के क्षेत्र खंडित झाले आहेमानवामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यातग्रामीण आणि नागरी परिसरात होणारे बिबट्याचे हल्ले, रानडुकरे व काळविटांमुळे होणारे पिकांचे नुकसान ही अस्तित्वासाठी प्राण्यांकडून सुरू असलेली धडपड आहे. मानव आणि प्राण्यांमधील हा संघर्ष वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासातील मानवी हस्तक्षेपामुळे उत्पन्न होतो.- युवराज पाटील, साहाय्यक कार्यक्रम अधिकारी, महाराष्ट्र निसर्ग उद्यान, माहिमशहरी विभागातील तलाव किंवा तळी या पाणथळीच्या जागा घरे बांधण्यासह व्यापारी प्रकल्पासाठी वापरण्यात येत आहेत. त्यामुळे पाणथळ क्षेत्र धोक्यात आले आहे. शेती, रस्ते, वसाहती, उद्योगधंदे, जलविद्युत केंद्रांसह अन्य प्रकल्प जैवविविधतेने समृद्ध क्षेत्रात सुरू झाल्याने प्रजातींचे विभाजन होत आहे. इमारतींसाठीचे लाकूड, ठिसूळ लाकूड मिळविण्यासाठी नैसर्गिक वनांचे रूपांतर नीलगिरी, सिल्व्हर ओकच्या एकपीक पद्धतीच्या लागवडीत झाले आहे. माती, पाणी आणि वातावरणातील प्रदूषणामुळे संवेदनशील प्रजातींची संख्या घटत आहे; स्थानिक स्तरावर त्या लोप पावत आहेत.

टॅग्स :wildlifeवन्यजीव