शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
2
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
3
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
4
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
5
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
6
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
7
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
8
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
9
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
10
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
11
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
12
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
13
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
14
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
15
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

पाणीबाणी ! लोणावळ्यात 24 तासात 221 मिमी पावसाची नोंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2017 10:44 AM

लोणावळा शहर व परिसरात मंगळवारी (29 ऑगस्ट) धुव्वाधार पाऊस झाला. 24 तासांत शहरात 221 मिमी पावसाची नोंद झाली. बुधवारी सकाळपासून मात्र पावसाचा जोर कमी झाल्याने नागरिकांना सूर्यनारायणाचे दर्शन झाले.

लोणावळा, दि. 30 - लोणावळा शहर व परिसरात मंगळवारी (29 ऑगस्ट) धुव्वाधार पाऊस झाला. 24 तासांत शहरात 221 मिमी पावसाची नोंद झाली. बुधवारी सकाळपासून मात्र पावसाचा जोर कमी झाल्याने नागरिकांना सूर्यनारायणाचे दर्शन झाले. पाऊस थांबल्याने परिसरात साचलेल्या पाण्याचा निचरा झाला असून नागरिकांना काहिसा सुटकेचा निश्वास टाकला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास टाटा कंपनीच्या वळवण धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याचा इशारा देण्यात आला होता. यामुळे ऐन गणेशोत्सवात वळवण, वरसोली, मळवली, जवळकरवस्ती, खत्री फार्म या भागासह मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर पुराचा तडाखा बसणार अशी साधारण शक्यता निर्माण झालेली असताना पावसाने घेतलेली विश्रांती सर्वांकरिता दिलासादायक ठरली आहे.मुसळधार पावसाने मुंबईतील रस्ते बंद झाल्याने मुंबई पुणे द्रुतगती व राष्ट्रीय महामार्गावरुन मुंबईकडे जाणारी सर्व वाहतूक मंगळवारी सायंकाळ बंद करण्यात आली होती. ती रात्री उशिरा पुन्हा सुरू करण्यात आली. वलवण धरणातून डक्ट लाईनच्या माध्यमातून शक्य तेवढे पाणी खोपोली भागात सोडत धरणाची पातळी कमी करण्याचे प्रयत्न टाटा कंपनी प्रशासनाकडून सुरु आहे. पावसाचा जोर वाढल्यास शहराच्या काही भागाला पूर्ण विळखा बसू शकतो, असे असले तरी नागरिकांनी घाबरुन जाण्याचे कारण मात्र सतर्क रहावे असे आवाहन नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी केले आहे.

मावळात ढगफुटी होण्याची अफवा मुंबईमध्ये सुरु असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मावळ तालुक्यात ढगफुटी होऊन अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे संदेश मंगळवारी रात्रभर सोशल मीडियावरुन वायरल झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते.

पवना धरणाचा विसर्ग वाढविला पवन मावळातील पवना धरण 100 टक्के भरले आहे. त्यातच पावसाचा जोर वाढत राहिल्याने मंगळवारी रात्री अकरा वाजता धरणातून 7 हजार 500 क्युसेक्सने पाणी पवना नदीत सोडण्यात आल्याने शिवली पूल पाण्याखाली गेला तर बेबेडोअळ पुलाला पाणी लागले आहे. मावळातील वाडीवळे धरणातून 4 हजार 600, कासारसाई धरणातून 300 तर आंद्रा धरणातून 1 हजार 150 क्युसेक्सने पाणी सोडण्यात आल्याने ग्रामीण भागातील व विशेषतः नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क रहावे असा इशारा मावळचे तहसिलदार रणजित देसाई यांनी दिला आहे. तसेच आपतकालिन स्थितीत मदतीसाठी यंत्रणा सज्ज असल्याचे सांगितले.