राज्यात 1359 गावांना टँकरने पाणी

By Admin | Updated: July 1, 2014 01:26 IST2014-07-01T01:26:03+5:302014-07-01T01:26:03+5:30

वाडय़ांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असल्याने येथील 1 हजार 359 गावांसहित 3 हजार 317 वाडय़ांना तब्बल 1 हजार 464 टँकर्सने पाणीपुरवठा केला जात आहे.

Water supply to 1359 villages in the state | राज्यात 1359 गावांना टँकरने पाणी

राज्यात 1359 गावांना टँकरने पाणी

>पावसाने ओढ दिल्याने टंचाई
मुंबई : राज्यात पावसाने ओढ दिल्याने कानाकोप:यातील गावांसह अनेक वाडय़ांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असल्याने येथील 1 हजार 359 गावांसहित 3 हजार 317 वाडय़ांना तब्बल 1 हजार 464 टँकर्सने पाणीपुरवठा केला जात आहे.
ठाणो आणि रायगड जिल्ह्यातील 87 गावे आणि 193 वाडय़ांना 51 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहमदनगर या जिल्ह्यांतील 435 गावे आणि 1 हजार 43क् वाडय़ांना 469 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पुणो, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांतील 337 गावांसहित 1 हजार 415 वाडय़ांना 314 टँकर्सने पाणीपुरवठा केला जात आहे. औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यांतील 438 गावांना आणि 279 वाडय़ांना 572 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ या जिल्ह्यांतील 42 गावांना 44 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. नागपूर जिल्ह्यातील 2क् गावांना 14 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. दरम्यान, पाणीपुरवठा करणा:या 1 हजार 464 टँकर्सपैकी 215 टँकर्स हे शासनाचे आहेत; तर उर्वरित 1 हजार 249 टँकर्स हे खासगी आहेत. गतवर्षाशी तुलना करता याच कालावधीत राज्यातील 2 हजार 674 गावांसहित 8 हजार 547 वाडय़ांना 3 हजार 476 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. (प्रतिनिधी)

Web Title: Water supply to 1359 villages in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.