शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
2
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
3
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
4
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
5
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
6
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
7
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
8
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
9
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
10
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
11
महापालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला! भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम
12
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
13
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
14
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
15
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
16
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
17
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
18
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
19
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
20
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
Daily Top 2Weekly Top 5

ऐन पाणीटंचाईत शहरात दोन जलवाहिन्या फुटल्या

By admin | Updated: June 10, 2016 02:02 IST

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये जेमतेम १२ टक्के जलसाठा उरला असल्याने पावसाळा येईपर्यंत पाण्याचे संकट कायम आहे़

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये जेमतेम १२ टक्के जलसाठा उरला असल्याने पावसाळा येईपर्यंत पाण्याचे संकट कायम आहे़ अशा वेळी २४ तासांत दोन ठिकाणी जलवाहिन्या फुटण्याच्या घटना घडल्या आहेत़ यामध्ये बुधवारी रात्री असल्फा येथे फुटलेल्या जलवाहिनीचे पाणी स्थानिक नागरिकांच्या घरात शिरले होते़, तर आज जोगेश्वरी येथे जलवाहिनी फुटली़घाटकोपर येथील असल्फामध्ये श्रीधर परब मार्गावर बुधवारी रात्री ११़३० च्या दरम्यान, ७२ इंचांची तानसा जलवाहिनी फुटली़ यामुळे लाखो लीटर पाणी वाहून गेले़ हे पाणी स्थानिक रहिवाशांच्या घरात शिरले़ तसेच रस्त्यावर उभ्या मोटारसायकलही या पाण्याच्या प्रवाहात वाहून जात होत्या़ भाजपा कार्यकर्ते प्रकाश मोरे आणि अनुप राजाळकर यांनी घरदुरूस्तीसाठी रहिवाशांना मदत केली. लाखो लीटर पाणी वाया गेल्याने असल्फा गाव एनएस रोड, खैरानी रोडसह कांदिवलीतील रहेजा संकुलातील पाणीपुरवठ्यावर आज परिणाम झाला़ पालिकेने तत्काळ दुरुस्तीचे काम हाती घेतले खरे, मात्र या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सकाळी १० नंतरच पूर्ण झाले़ मात्र ही जलवाहिनी दुरस्त होत नाही तोच जोगेश्वरी पूर्व येथील बांद्रेकरवाडीत १२ इंचांची जलवाहिनी फुटली़ त्यामुळे पुन्हा हजारो लीटर पाणी वाहून गेले़ या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम तत्काळ हाती घेण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)अधिकारी बेपत्ताअसल्फा येथील जलवाहिनी फुटल्यानंतर ही माहिती स्थानिक विभागातील अधिकाऱ्यांना देण्यासाठी आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला तब्बल दोन तास शोधाशोध करावी लागली़ अधिकारी संपर्क कक्षेच्या बाहेर असल्याने अखेर दोन तासांनंतर जलवाहिनीच्या दुरुस्तीला सुरुवात झाली़