शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात जलाशयांतील पाण्याची स्थिती गंभीर, वन्यप्राणी, पक्षांसमोरही जलसंकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 17:56 IST

पूर्व व पश्र्चिम विदर्भातील जलाशयाची स्थिती गंभीर असून, जानेवारी महिन्यात काही जलाशयांतील पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात वन्यप्राणी, पक्षांसमोर भीषण जलसंकट उभे राहणार असल्याचे संकेत आतापासून मिळू लागले आहे.

अमरावती - पूर्व व पश्र्चिम विदर्भातील जलाशयाची स्थिती गंभीर असून, जानेवारी महिन्यात काही जलाशयांतील पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात वन्यप्राणी, पक्षांसमोर भीषण जलसंकट उभे राहणार असल्याचे संकेत आतापासून मिळू लागले आहे.

यावर्षी पाऊस अत्यल्प कोसळल्याने जमिनीत पाण्याची पातळी फारच कमी आहे. मात्र, जलाशयांतदेखील पाणीसंकट उभे ठाकले आहे. परिणामी, विदर्भातील जलाशयावर विदेशातून स्थलांतरित होणा-या पक्ष्यांना पाणी समस्येसह खाद्यावरही परिणाम जाणवू लागला आहे. वाशिम जिल्ह्यातील एकपर्णी, यवतमाळ जिल्ह्यातील इसापूर, निभोना, लालखेड, अमरावती जिल्ह्यातील मालखेड तलाव, केकतपूर, कोंडेश्र्वर, छत्री तलाव, फुटका आदी जलाशयांची पाण्याची पातळी कमी असल्याची स्थिती आहे. या जलाशयावर वन्यप्राण्यांसह पक्षांचे थवेच्या थवे दिसून येतात. जलाशयावर मासेमारीसुद्धा जोरात सुरू आहे. त्यामुळे पक्ष्यांचे प्रमुख खाद्य असलेल्या मासेदेखील कमी झाले असून, पक्षीसंवर्धनाची बिकट समस्या उभी झाली आहे. नागपुरातील गोरेवाडा, बुलडाणा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील जलाशयांचीसुद्धा चांगली स्थिती नाही. उन्हाळा सुरू होण्यास अवधी असला तरी जंगलात वन्यप्राण्याची आतापासून पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. जंगलाशेजारील जलाशयांवर वन्यप्राणी, पशू पाण्यासाठी अवलंबून राहतात. मात्र, जानेवारी महिन्यातच  जलाशये आटू लागल्याने एप्रिल, मे महिन्यात जलाशयांमध्ये पाणी कसे राहणार, हा चिंतनाचा विषय आहे. अकोला, अमरावती जिल्ह्यात जलाशयांमध्ये पुरेशे पाणीसाठा नाही. त्यामुळे मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीवांना पाण्यासाठी दाहीदिशा करावी लागेल, असे चित्र आहे.  विशिष्ट जलाशयावर विदेशी पक्षीविदर्भात विशिष्ट जलाशयावर विदेशी पक्षाचे आगमन झाले आहे. भारतात दरवर्षी १५९ प्रजातीचे पक्षी  स्थलांतर करून येतात. यात थापट्या, शेंडीबदक, लालसरी, थोरले व धाकटे मराल, गडवाल, उचाट, सोनटीरवा, कुतवार, राजहंस, मंगोलिया, क्रौंच, सायबेरिया आदी पक्षांचा समावेश आहे. यंदा जलाशयांमध्ये पाणी कमी असल्याने पशू, पक्षाची संख्या रोडावणार, असे संकेत मिळत आहे. राजहंस पक्षी हिमालय पालथा घालून ३ ते ४ चार किमी प्रवास करून येतो.  पक्षांचे खाद्य झाले कमीजलाशयात पाणी नसल्याने पक्ष्यांसमोर खाद्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. यात छोटे कीटक, शिंपले, मासे आदी हे पक्ष्यांचे खाद्य आहे. मात्र, जलाशयात पाण्याची पातळी कमी झाल्याने पक्ष्यांना खाद्यदेखील मिळणे दुरापास्त झाले आहे. विदेशी व जंगल पक्षाची आतापासून पाणी, खाद्यासाठी वनवन भटकंती सुरू झाली आहे. पक्ष्यांचे स्थलांतर ही पर्यावरण संतुलनासाठी अतिशय महत्त्वपूर्ण बाब आहे. परंतु, जलाशयाची अवस्था फारच गंभीर आहे. जलाशयाची पातळी वाढविणे गरजेचेपाणी अडवून जिरवणे ही मानसिकता बंद झाली आहे. शेतात बांदबंधिस्ती प्रथा बंद झाली. पाण्याची भूजल पातळी खोल गेली. तलावातील पाणी शेतीला दिले जाते. विहिरींचा वापर हळूहळू बंद होत आहे. उद्योगासाठी तलावातील पाणी वापर केला जातो. त्यामुळे जलाशयांकडे केवळ राजकारण म्हणून बघितले जाते. मात्र, विदर्भातील जलाशयांची पातळी वाढविण्यासाठी जलयुक्त शिवारमधून तलावातील गाळ काढून तो शेतकºयांना देणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतीला सुपिकता येईल. तलावांचे खोलीकरण झाले पाहिजे. पशू, पक्ष्यांसाठी पाणी उपलब्ध करणे हे मोठे आव्हान आहे. जलाशयांची स्थिती फार गंभीर आहे. शासन, प्रशासन स्तरावरून दखल घेतली नाही तर उन्हाळ्यात पाण्याअभावी पशू, पक्ष्यांना जीव गमवावा लागेल.   - यावद तरटे पाटील,    पक्षी अभ्यासक, अमरावती

टॅग्स :Vidarbhaविदर्भMaharashtraमहाराष्ट्र